शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

वीजग्राहकांना आता मिळणार अचूक बिल, अडीच लाख नादुरुस्त मीटर बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 05:33 IST

महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागांतर्गत जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत, विजेच्या प्रत्येक युनिटचे पैसे वसूल करण्याकामी अडसर ठरणाऱ्या नादुरुस्त असे दोन लाख ६२ हजार सिंगल फेज मीटर बदलण्यात आले आहेत. परिणामी, ग्राहकांना त्यांच्या विजेच्या वापराबाबतचे अचूक बिल देणे शक्य होणार असून, नादुरुस्त मीटरमुळे महावितरणचा होणारा आर्थिक तोटा थांबणार आहे.

मुंबई - महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागांतर्गत जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत, विजेच्या प्रत्येक युनिटचे पैसे वसूल करण्याकामी अडसर ठरणाऱ्या नादुरुस्त असे दोन लाख ६२ हजार सिंगल फेज मीटर बदलण्यात आले आहेत. परिणामी, ग्राहकांना त्यांच्या विजेच्या वापराबाबतचे अचूक बिल देणे शक्य होणार असून, नादुरुस्त मीटरमुळे महावितरणचा होणारा आर्थिक तोटा थांबणार आहे.महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागांतर्गत आजघडीस भांडुप, कल्याण, कोकण व नाशिक असे चार झोन येतात. यामध्ये सुमारे ७० लाख इतक्या ग्राहकांना महावितरण सेवा पुरवत आहे. यातील काही ग्राहकांना नादुरुस्त मीटरमुळे कधी कमी, तर कधी वाढीव बिल जात होते. त्यामुळे वाढीव बिल आल्यास ग्राहकांना बिल दुरुस्त करून घेण्याचा मनस्ताप होत होता, तर वापरलेल्या युनिटपेक्षा कमी बिल गेल्यास महावितरणला आर्थिक फटका बसण्याची शक्यता होती.परिणामी, ग्राहकांकडून प्राप्त होणाºया तक्रारी व आयटी विभागाच्या अहवालानुसार, मागील तीन महिन्यांत कोकण प्रादेशिक विभागांतर्गत सुमारे दोन लाख ६२ हजार सिंगल फेज मीटर बदलण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने बंद वीजमीटर, डिस्प्ले खराब झालेले मीटर, तसेच नादुरुस्त मीटर (वीजबिलाची कमी-अधिक नोंद) बदलण्यात आले आहेत. यामध्ये विजेच्या वापराबाबतच्या नोंदीकरिता गोल चक्र असणारे, तसेच जुन्या प्रकारचे इलेक्ट्रो मग्नेटिक मीटरही बदलण्यात आले आहे.२७ मार्च अखेर बदलण्यात आलेल्या नादुरुस्त मीटरची आकडेवारीभांडुप परिमंडळ - सुमारे ८६ हजार (ठाणे शहर व परिसर, मुलुंड, भांडुप, नवी मुंबई, पनवेल शहर)कल्याण परिमंडळ - सुमारे १ लाख ७ हजार (कल्याण, पालघर, पेण, वसई)कोकण परिमंडळ - सुमारे १८,८०० (रत्नागिरी व सिंधुदुर्ग)नाशिक परिमंडळ - सुमारे ४९ हजार (नाशिक, अहमदनगर, मालेगाव)२७ मार्चअखेरबदललेले नादुरुस्त मीटरपनवेल विभाग - २३,३०० नेरूळ विभाग - ८,३०० वाशी विभाग - १३,८००भांडुप विभाग - ५,२०० मुलुंड विभाग - ४,९०० ठाणे १ विभाग - ५,८००ठाणे २ विभाग - ८,००० ठाणे ३ विभाग - ४,२०० वागळे इस्टेट - १२,४००नादुरुस्त मीटर बदलण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित ग्राहकांना योग्य बिले मिळणार आहे. यापूर्वी वाढीव बिले गेलेल्या ग्राहकांना त्यांच्या बिलात समायोजन (अ‍ॅडजेस्टमेंट) करून बिल देण्यात येईल. सदोष मीटरमुळे कमी बिले गेलेल्या ग्राहकांना नवीन मीटर बसविल्यानंतर प्रत्यक्ष विजेचा वापर आणि पूर्वीचे नादुरुस्त/स्लो मीटर यांच्या वापरातील मागील तीन महिन्यांच्या बिलांचे समायोजन पुढील बिलात करण्यात येईल.- सतीश करपे, संचालक, महावितरण प्रादेशिक.

टॅग्स :mahavitaranमहावितरणMaharashtraमहाराष्ट्र