शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

२२० बाजार समित्यांच्या निवडणुका; हवेत ३०० कोटी

By राजाराम लोंढे | Updated: August 4, 2022 06:03 IST

उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसेना : निर्णयावर फेरविचार करण्याचे प्रयत्न

- राजाराम लोंढेलोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : बाजार समित्यांच्या निवडणुकांत कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना मताचा अधिकार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने राज्यातील प्रलंबित २२० समित्यांच्या निवडणुकांसाठी किमान ३०० कोटींचा निधी लागणार आहे. समित्यांचे उत्पन्न व खर्च पाहता राज्यातील एकही समिती खर्च करू शकत नसल्याने महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघाने त्याला विरोध केला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबत फेरविचार करण्याची मागणी केली जाणार आहे.  

 बाजार समित्यांवर शेतकऱ्यांचे वर्चस्व राहावे, यासाठी कार्यक्षेत्रातील गावात शेतकऱ्यांनी निवडून दिलेले विकास संस्थांचे संचालक, ग्रामपंचायतींच्या सदस्यांना मताचा अधिकार दिला. त्याशिवाय समितीशी संबंधित व्यापारी, अडते, हमाल, तोलाईदार यांचे प्रतिनिधीही संचालक मंडळात असतात. राज्यात तत्कालीन फडणवीस सरकारने २०१८ मध्ये कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला. मात्र, महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय रद्द केला. आता एकनाथ शिंदे सरकारने पुन्हा निर्णय फिरवत सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठवाड्यासारख्या भागात बाजार समित्यांच्या कर्मचाऱ्यांना ६-६ महिने पगार नाहीत. त्या समित्या निवडणुकांवर कोट्यवधींचा खर्च कसा करणार? सरकारला निवडणूक निधी द्यावा लागेल, त्यामुळे सरकार याबाबत फेरविचार करेल, अशी आशा आहे.- प्रवीणकुमार नाहाटा (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघ).

सोलापूर, बार्शी बाजार समित्यांचे कंबरडे मोडले महायुतीने निर्णय घेतल्यानंतर २०१८ मध्ये कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना मताचा अधिकार देत सोलापूर व बार्शी बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्यात आल्या. यासाठी सोलापूरला १ कोटी १४ लाख तर बार्शी समितीला ७४ लाख ५० हजार रुपये खर्च आला होता. या खर्चाने त्यांचे कंबरडे मोडले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीEknath Shindeएकनाथ शिंदे