शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

कोकण वगळता सर्वत्र होऊ शकतात जूनमध्येच निवडणुका, जुलैत मात्र अशक्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 06:20 IST

पावसाच्या जिल्हानिहाय आकडेवारीचा विचार करता, कोकण वगळता राज्यात सर्वत्र जूनमध्ये निवडणुका घेणे शक्य आहे.

नितीन चौधरी, लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ज्या भागांत पावसाचे प्रमाण कमी आहे, अशा जिल्ह्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. पावसाच्या जिल्हानिहाय आकडेवारीचा विचार करता, कोकण वगळता राज्यात सर्वत्र जूनमध्ये निवडणुका घेणे शक्य आहे. जुलैमध्ये मात्र, निवडणुका घेणे शक्य होणार नाही, असे दिसते.

पावसामुळे जूनमध्ये निवडणुका घेणे शक्य नाही, या राज्य निवडणूक आयोगाच्या दाव्याला  गेल्या पाच वर्षांच्या पावसाच्या आकडेवारीने खोटे ठरविले आहे. कोकणव्यतिरिक्त उर्वरित राज्यात जूनमध्ये पावसाचे सरासरी दिवस १५ पेक्षा कमी असल्याचे आकड्यांवरून दिसते. यंदा मान्सून सहा ते सात दिवस लवकर येणार असला तरी जूनमध्ये त्याचे प्रमाण सरासरीइतकेच असेल, असा अंदाज आहे. राज्य निवडणूक आयोगाने खरेच इच्छाशक्ती दाखविल्यास राज्यात निवडणुका होऊ शकतात. जुलैत बहुतांश राज्यात पावसाचे प्रमाण २० ते २५ दिवस असल्याचे दिसते. त्यामुळे जुलैत निवडणुकांसाठी वातावरण योग्य नाही.

आकडेच बोलतात...

कृषी खात्याच्या सांख्यिकी विभागाने उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीच्या आधारे हा निष्कर्ष निघाला आहे. त्यानुसार जूनमध्ये कोकणात गेल्या पाच वर्षांत २०१९ वगळता चारही वर्षांत सरासरी २५ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाऊस झाला आहे. त्यामुळे जूनमध्ये कोकणात निवडणुका घेता येणे शक्य नाही. 

उर्वरित राज्यात २०२० व २०२१ वगळता इतर तीन वर्षांत सरासरी पावसाचे दिवस हे ७ ते १५ इतके आहेत. तर २०२० व २०२१ मध्ये हे दिवस पश्चिम महाराष्ट्र व पूर्व विदर्भात १५ ते १८ इतके आहेत. त्यामुळे येथेही निवडणुका घेणे शक्य असल्याचे दिसते.

- जुलै महिन्यात राज्यात सर्वत्र चांगला पाऊस असल्याचे दिसते. कोकणात संपूर्ण महिना पाऊस पडत असतो. पूर्व विदर्भाच्या जिल्ह्यांत हे प्रमाण सरासरी २० ते २५ दिवस इतके आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भात हा पाऊस १५ ते २२ दिवस इतका पडल्याचे स्पष्ट होत आहे. परिणामी या महिन्यात निवडणुका घेणे शक्य होणार नाही. 

- ऑगस्ट महिन्यातही कोकणात पूर्ण महिनाभर पाऊस पडत असल्याचे स्पष्ट होत आहे. उर्वरित भागात २०२० चा अपवाद वगळता पावसाचे प्रमाण ७ ते १५ दिवस आहे. हीच परिस्थिती साधारण सप्टेंबरमध्येही दिसून येते.

यापूर्वी निवडणुका इतक्या लांबल्याचे दिसत नाही. मात्र, जूनमध्ये निवडणुका झाल्याचे आठवत नाही.  हवामानाच्या अंदाजावर राज्य निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकतो. - जे. एस. सहारिया, माजी निवडणूक आयुक्त

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या पहिल्या टप्प्याच्या अंदाजानुसार देशात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचे वितरण समान असेल. यंदा मान्सून सहा ते सात दिवस लवकर येण्याचा अंदाज आहे. दुसऱ्या टप्प्याच्या अंदाजात चित्र आणखी स्पष्ट होईल. - डॉ. कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान खाते

टॅग्स :ElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMaharashtraमहाराष्ट्र