शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

निवडणूक काश्मीरची नाही, महाराष्ट्राची आहे! : सचिन सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 19:12 IST

शहा यांनी आज मुंबईत केलेल्या 34 मिनिटांच्या भाषणावेळी 51 वेळा काश्मीरचा उल्लेख केला. यावरून काँग्रेसने टीका केली आहे.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच देशाचे गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या नेत्यांकडून काश्मीरचा राग आलापला जात आहे. शाह यांनी काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाबद्दल मुंबईत येऊन व्याख्यान देण्याचा प्रयत्न केला. याची खिल्ली उडवत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना ही निवडणूक महाराष्ट्राची आहे, काश्मीरची नव्हे, याची आठवण करून दिली. 

शहा यांनी आज मुंबईत केलेल्या 34 मिनिटांच्या भाषणावेळी 51 वेळा काश्मीरचा उल्लेख केला. यावरून काँग्रेसने टीका केली आहे. कलम ३७० हटवल्याबद्दलचे व्याख्यान अमित शाह यांनी काश्मीरमध्ये जाऊन द्यावे महाराष्ट्रात नव्हे, महाराष्ट्रामध्ये कलम ३७० नसून कलम ३७१ आहे, याची आठवण सचिन सावंत यांनी करून दिली.

यासंदर्भात सावंत म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रावरील कर्जात दुप्पट वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये तिप्पट वाढ झाली आहे. राज्यातील लघू व मध्यम उद्योग बंद होण्याची संख्या चौपट झाली आहे. बेरोजगारी दहापट वाढली आहे. भ्रष्टाचार शतपटीने वाढला आहे. या सरकारची थापेबाजी हजार पटीने वाढली आहे. यासंदर्भात भाजप नेत्यांनी बोलावे. राज्यातील भाजपच्या अनैतिक राज्य कारभारावर, फोडाफोडीच्या राजकारणावर बोलावे, किंबहुना विकासाच्या गमजा मारणाऱ्या भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या रथाचे चाक चिखलात का रूतले? यावर बोलावे असे जाहीर आव्हान सावंत यांनी दिले. 

भाजपने या निवडणुकीत मुद्दे भरकटवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला भेडसवणाऱ्या मूळ प्रश्नांवरून लक्ष भरकटू देणार नाही, असेही सावंत म्हणाले.

टॅग्स :Sachin sawantसचिन सावंतAmit Shahअमित शहाArticle 370कलम 370Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019