शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक काश्मीरची नाही, महाराष्ट्राची आहे! : सचिन सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 19:12 IST

शहा यांनी आज मुंबईत केलेल्या 34 मिनिटांच्या भाषणावेळी 51 वेळा काश्मीरचा उल्लेख केला. यावरून काँग्रेसने टीका केली आहे.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच देशाचे गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या नेत्यांकडून काश्मीरचा राग आलापला जात आहे. शाह यांनी काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाबद्दल मुंबईत येऊन व्याख्यान देण्याचा प्रयत्न केला. याची खिल्ली उडवत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना ही निवडणूक महाराष्ट्राची आहे, काश्मीरची नव्हे, याची आठवण करून दिली. 

शहा यांनी आज मुंबईत केलेल्या 34 मिनिटांच्या भाषणावेळी 51 वेळा काश्मीरचा उल्लेख केला. यावरून काँग्रेसने टीका केली आहे. कलम ३७० हटवल्याबद्दलचे व्याख्यान अमित शाह यांनी काश्मीरमध्ये जाऊन द्यावे महाराष्ट्रात नव्हे, महाराष्ट्रामध्ये कलम ३७० नसून कलम ३७१ आहे, याची आठवण सचिन सावंत यांनी करून दिली.

यासंदर्भात सावंत म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रावरील कर्जात दुप्पट वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये तिप्पट वाढ झाली आहे. राज्यातील लघू व मध्यम उद्योग बंद होण्याची संख्या चौपट झाली आहे. बेरोजगारी दहापट वाढली आहे. भ्रष्टाचार शतपटीने वाढला आहे. या सरकारची थापेबाजी हजार पटीने वाढली आहे. यासंदर्भात भाजप नेत्यांनी बोलावे. राज्यातील भाजपच्या अनैतिक राज्य कारभारावर, फोडाफोडीच्या राजकारणावर बोलावे, किंबहुना विकासाच्या गमजा मारणाऱ्या भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या रथाचे चाक चिखलात का रूतले? यावर बोलावे असे जाहीर आव्हान सावंत यांनी दिले. 

भाजपने या निवडणुकीत मुद्दे भरकटवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला भेडसवणाऱ्या मूळ प्रश्नांवरून लक्ष भरकटू देणार नाही, असेही सावंत म्हणाले.

टॅग्स :Sachin sawantसचिन सावंतAmit Shahअमित शहाArticle 370कलम 370Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019