शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ; भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाकडून चौकशी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 08:54 IST

Election Commission of India : उद्धव ठाकरेंनी मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषदेतून केलेल्या आरोपांची केंद्रीय निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे.

Uddhav Thackeray : मुंबईत सोमवारी लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या संथ मतदानामुळे विरोधकांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरलं होतं. मुंबईतल्या सहा मतदारसंघामध्ये यंदा कमी प्रमाणात मतदान झाल्याचे पाहायला मिळालं. ईव्हीएम मशीन्स बंद पडल्याने अनेक मतदारांमधील मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे शिवसेन बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाचे अधिकारी पक्षपातीपणे वागले असल्याचा आरोप केला होता. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगासह भाजपला टार्गेट केल्याची तक्रार भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

भारतय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात मुंबई भाजपने केलेल्या तक्रारीची दखल घेतली आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंनी सोमवारी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्याचा अनुवाद मागवला आहे. मुंबईतील मतदानाच्या संथ गतीवर ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली होती. निवडणूक आयोग उद्धव ठाकरेंची संपूर्ण पत्रकार परिषद तपासून पाहणार आहे.

हे ही वाचा -  "एवढा आत्मविश्वास कुठून येतो"; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीची बोचरी टीका

उद्धव ठाकरे काय म्हणाले आणि त्यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केला आहे का, याची तपासणी करण्यासाठी निवडणूक आयोगाने त्यांच्या विधानांचे मराठीत भाषांतर मागितल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. सोमवारी मुंबईत संथ मतदानाची अनेक उदाहरणे समोर आल्याने उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि निवडणूक आयोगवर टीका केली. सरकार लोकांना मतदानापासून परावृत्त करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. उद्धव ठाकरेंनी निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे आणि निवडणूक अधिकाऱ्यांना धमकावले आहे, असे आशिष शेलार यांनी म्हटलं होतं.

"या संपूर्ण प्रकरणाची तपासणी कोण करणार आणि उद्धव ठाकरे जे बोलले ते आचारसंहितेचे उल्लंघन आहे की शेलार यांच्या आरोपानुसार लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत कारवाईसाठी जबाबदार आहे हे निवडणूक आयोग ठरवेल. ठाकरे यांनी सोमवारी जे सांगितले त्याचा अनुवाद आम्हाला पाठवण्यास सांगण्यात आले आहे," असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपा