शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
5
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
6
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
7
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
8
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
9
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
10
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
11
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
12
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
13
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
14
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
15
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
16
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
17
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
18
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
19
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
20
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण

७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 18:22 IST

केंद्रीय निवडणूक आयोगाने नाना पटोलेंनी मतदानाच्या आकडेवारीवरुन केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

Election Commission of India : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. सर्वाधिक फटका हा महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाला असून त्यांच्या १०१ पैकी केवळ १६ जागा निवडून आल्या आहेत. मतांच्या टक्केवारीवरुन नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारामुळे आयोगाच्या निष्पक्ष व पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोगाने जनतेच्या मतांवर दरोडा टाकल्याचा आरोप नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केला होता. यानंतर आता निवडणूक आयोगाने नाना पटोलेंच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

"महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर व चिंताजनक प्रकार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले, त्याच रात्री ११.३० वाजता ते ६५.०२ टक्के तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के झाल्याचे सांगितले, यात एकूण ७.८३ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तब्बल ७६ लाख मतांची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा वाढला? निवडणूक आयोगाने जिथे मतदान वाढले त्या केंद्राचे व्हिडीओ फुटेज जाहीर करावे. निवडणूक आयोगाने जनतेच्या मतांवर दरोडा टाकला आहे," असा आरोप नाना पटोले यांनी केला होता.

"मतदानाच्या दिवशी ५ वाजल्यानंतर मतांची टक्केवारी वाढल्याचे प्रमाण पाहता मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या असल्या पाहिजेत. राज्यातील किती मतदार संघावर अशा रांगा लागल्या होत्या ते निवडणूक आयोगाने पुराव्यासह दाखवावे. निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावले होते, त्याचे चित्रिकरण दाखवावे. मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन माहिती देत असते. यावेळी आयागाने पत्रकार परिषद का घेतली नाही. वाढीव मतांबद्दल देशभरातील विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींनी शंका उपस्थित केल्या आहेत. यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून राजकीय पक्ष, उमेदवार वा इतरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे," असंही नाना पटोले म्हणाले.

"काँग्रेस पक्षाचा पराभव झाला म्हणून नाही तर लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष मतदानाच्या टक्केवारीतील तफावतीचा मुद्दा लावून धरत आहे. भारतीय जनता पक्ष व निवडणूक आयोगाने संगनमताने लोकशाहीची क्रूर थट्टा केली आहे. विधानसभा निवडणुकीतील मतांच्या तफावतीसंदर्भात काँग्रेस पक्ष न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई लढेल," असा इशाराही नाना पटोले यांनी दिला.

निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

नाना पटोलेंनी पत्रकार परिषदेत आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने याबाबत एक्स पोस्टवरुन स्पष्टीकरण दिलं आहे. "२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, संध्याकाळी ५ वाजता मतदानाची टक्केवारी ५८.२२ टक्के (अंदाजे) होती आणि अंतिम मतदानाची टक्केवारी ६६.०५ टक्के होती. हे सामान्य आहे कारण संध्याकाळी ६ नंतर रांगेत उभ्या असलेल्या शेवटच्या व्यक्तीने मतदान करेपर्यंत मतदान चालूच असते. २०१९ मध्येही, टक्केवारी संध्याकाळी ५ वाजता ५४.४३ टक्के (अंदाजे) आणि अंतिम वेळी ६१.१० टक्के होती. महाराष्ट्रातील शहरी आणि निमशहरी भागात मोठ्या संख्येने मतदार संध्याकाळी येतात," असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

"हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दोन तासांच्या मतदानाची माहिती केवळ तोंडी फोनवरच्या संवादावर आधारित असते. दुसरीकडे, फॉर्म-१७ सी जो पोलिंग एजंटना पोल बंद करताना दिला जातो तो अंतिम टक्केवारी आणि मतांची मोजणी यांच्याशी जुळतो. झारखंडमध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत तर महाराष्ट्रात संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान झालं आहे. झारखंडमध्ये, बहुतेक मतदान केंद्रांवर संध्याकाळी ५ वाजता मतदान संपले होते. महाराष्ट्रात अनेक मतदान केंद्रांवर सायंकाळी ६ वाजता मतदार रांगेत उभे होते. झारखंडमध्ये तीस हजारांहून कमी मतदान केंद्रे आहेत. महाराष्ट्रात एक लाखाहून अधिक मतदान केंद्रे आहेत," असंही निवडणूक आयोगाने म्हटलं. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Nana Patoleनाना पटोलेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग