शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 18:22 IST

केंद्रीय निवडणूक आयोगाने नाना पटोलेंनी मतदानाच्या आकडेवारीवरुन केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

Election Commission of India : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. सर्वाधिक फटका हा महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाला असून त्यांच्या १०१ पैकी केवळ १६ जागा निवडून आल्या आहेत. मतांच्या टक्केवारीवरुन नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारामुळे आयोगाच्या निष्पक्ष व पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोगाने जनतेच्या मतांवर दरोडा टाकल्याचा आरोप नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केला होता. यानंतर आता निवडणूक आयोगाने नाना पटोलेंच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

"महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर व चिंताजनक प्रकार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले, त्याच रात्री ११.३० वाजता ते ६५.०२ टक्के तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के झाल्याचे सांगितले, यात एकूण ७.८३ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तब्बल ७६ लाख मतांची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा वाढला? निवडणूक आयोगाने जिथे मतदान वाढले त्या केंद्राचे व्हिडीओ फुटेज जाहीर करावे. निवडणूक आयोगाने जनतेच्या मतांवर दरोडा टाकला आहे," असा आरोप नाना पटोले यांनी केला होता.

"मतदानाच्या दिवशी ५ वाजल्यानंतर मतांची टक्केवारी वाढल्याचे प्रमाण पाहता मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या असल्या पाहिजेत. राज्यातील किती मतदार संघावर अशा रांगा लागल्या होत्या ते निवडणूक आयोगाने पुराव्यासह दाखवावे. निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावले होते, त्याचे चित्रिकरण दाखवावे. मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन माहिती देत असते. यावेळी आयागाने पत्रकार परिषद का घेतली नाही. वाढीव मतांबद्दल देशभरातील विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींनी शंका उपस्थित केल्या आहेत. यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून राजकीय पक्ष, उमेदवार वा इतरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे," असंही नाना पटोले म्हणाले.

"काँग्रेस पक्षाचा पराभव झाला म्हणून नाही तर लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष मतदानाच्या टक्केवारीतील तफावतीचा मुद्दा लावून धरत आहे. भारतीय जनता पक्ष व निवडणूक आयोगाने संगनमताने लोकशाहीची क्रूर थट्टा केली आहे. विधानसभा निवडणुकीतील मतांच्या तफावतीसंदर्भात काँग्रेस पक्ष न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई लढेल," असा इशाराही नाना पटोले यांनी दिला.

निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

नाना पटोलेंनी पत्रकार परिषदेत आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने याबाबत एक्स पोस्टवरुन स्पष्टीकरण दिलं आहे. "२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, संध्याकाळी ५ वाजता मतदानाची टक्केवारी ५८.२२ टक्के (अंदाजे) होती आणि अंतिम मतदानाची टक्केवारी ६६.०५ टक्के होती. हे सामान्य आहे कारण संध्याकाळी ६ नंतर रांगेत उभ्या असलेल्या शेवटच्या व्यक्तीने मतदान करेपर्यंत मतदान चालूच असते. २०१९ मध्येही, टक्केवारी संध्याकाळी ५ वाजता ५४.४३ टक्के (अंदाजे) आणि अंतिम वेळी ६१.१० टक्के होती. महाराष्ट्रातील शहरी आणि निमशहरी भागात मोठ्या संख्येने मतदार संध्याकाळी येतात," असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

"हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दोन तासांच्या मतदानाची माहिती केवळ तोंडी फोनवरच्या संवादावर आधारित असते. दुसरीकडे, फॉर्म-१७ सी जो पोलिंग एजंटना पोल बंद करताना दिला जातो तो अंतिम टक्केवारी आणि मतांची मोजणी यांच्याशी जुळतो. झारखंडमध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत तर महाराष्ट्रात संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान झालं आहे. झारखंडमध्ये, बहुतेक मतदान केंद्रांवर संध्याकाळी ५ वाजता मतदान संपले होते. महाराष्ट्रात अनेक मतदान केंद्रांवर सायंकाळी ६ वाजता मतदार रांगेत उभे होते. झारखंडमध्ये तीस हजारांहून कमी मतदान केंद्रे आहेत. महाराष्ट्रात एक लाखाहून अधिक मतदान केंद्रे आहेत," असंही निवडणूक आयोगाने म्हटलं. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Nana Patoleनाना पटोलेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग