शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' ५० कोटींवरून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला; सभागृहात पत्रच दाखवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 09:48 IST

ज्यांना बाळासाहेबांची काही पडली नाही. त्यांच्या विचारधारेशी देणेघेणे नाही. शिवसेना, शिवसैनिकांशी देणेघेणे नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला.

मुंबई – गेल्या वर्षी शिवसेनेतील ५५ पैकी ४० आमदारांनी वेगळी भूमिका घेत भाजपासोबत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांच्या पाऊलामुळे शिवसेनेत २ गट निर्माण झाले. त्यानंतर खरी शिवसेना कोणाची हा वाद कोर्ट, निवडणूक आयोगापर्यंत पोहचला. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना, धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. परंतु शिवसेनेतील रक्कम कुणाला मिळणार हा प्रश्न उभा राहिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत एक पत्र दाखवून उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, एकीकडे आम्हाला रोज शिव्याशाप देता तर दुसरीकडे ५० कोटी आम्हाला द्या असे पत्र पाठवता. शिवसेना खात्यातील हे ५० कोटी आहेत. आता शिवसेना कोणाकडे आहे? आमच्याकडे. आम्हाला गद्दार म्हणायचे, खोकेबाज म्हणायचे मग खरे खोकेबाज कोण? मी १ मिनिटाचाही विचार न करता तात्काळ पैसे देऊन टाका असं सांगितले. कारण आम्हाला तुमची संपत्ती, मालमत्ता काही नको, बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. हे ५० कोटी आम्ही देऊन टाकले असं त्यांनी सांगितले.

तसेच ज्यांना बाळासाहेबांची काही पडली नाही. त्यांच्या विचारधारेशी देणेघेणे नाही. शिवसेना, शिवसैनिकांशी देणेघेणे नाही. त्यांना केवळ पैसे, ५० खोके यावरच केवळ डोळा आहे. इतर आमदारांनी त्यावर नक्की विचार करा. हे सहन करण्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. शिवसैनिक आमचे भोळेभाबडे आहेत. प्रत्येकाच्या वाटेला हे आले आहे. आम्ही घरादारावर तुलसीपत्र ठेऊन संघटनेचे काम केले. त्यातून शिवसेना उभी केलीय. वापरा आणि फेकून द्या असं उद्धव ठाकरे कधी करतील हे कुणालाही कळणार नाही असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला.

दरम्यान, शिवसेनेचे पैसे असतील ते मागितले तर पाप काय? शिवसेना पक्षाला ते पैसे दिले होते. ते मागितले त्यात चुकीचे काय नाही. सरकार मूळप्रश्नापासून पळतंय, जनतेच्या प्रश्नाला उत्तर दिले जात नाही. लक्षवेधी मांडली जाते मंत्री उत्तर द्यायला तयार नाहीत. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना समर्थन देण्याचे काम सरकार करतंय. शासन आपल्या दारी येऊन निवडणुकीचे पत्र देते. शासनाच्या दारात अधिकारी बदल्यांसाठी फिरतात. मोठ्या प्रमाणात बदलीसाठी भ्रष्टाचार होतोय. सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यास कुचकामी ठरतेय. विरोधी पक्षाने सरकारला जाब विचारण्यास यशस्वी ठरले आहे असं प्रत्युत्तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना