शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

'त्या' ५० कोटींवरून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला; सभागृहात पत्रच दाखवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 09:48 IST

ज्यांना बाळासाहेबांची काही पडली नाही. त्यांच्या विचारधारेशी देणेघेणे नाही. शिवसेना, शिवसैनिकांशी देणेघेणे नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला.

मुंबई – गेल्या वर्षी शिवसेनेतील ५५ पैकी ४० आमदारांनी वेगळी भूमिका घेत भाजपासोबत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांच्या पाऊलामुळे शिवसेनेत २ गट निर्माण झाले. त्यानंतर खरी शिवसेना कोणाची हा वाद कोर्ट, निवडणूक आयोगापर्यंत पोहचला. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना, धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. परंतु शिवसेनेतील रक्कम कुणाला मिळणार हा प्रश्न उभा राहिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत एक पत्र दाखवून उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, एकीकडे आम्हाला रोज शिव्याशाप देता तर दुसरीकडे ५० कोटी आम्हाला द्या असे पत्र पाठवता. शिवसेना खात्यातील हे ५० कोटी आहेत. आता शिवसेना कोणाकडे आहे? आमच्याकडे. आम्हाला गद्दार म्हणायचे, खोकेबाज म्हणायचे मग खरे खोकेबाज कोण? मी १ मिनिटाचाही विचार न करता तात्काळ पैसे देऊन टाका असं सांगितले. कारण आम्हाला तुमची संपत्ती, मालमत्ता काही नको, बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. हे ५० कोटी आम्ही देऊन टाकले असं त्यांनी सांगितले.

तसेच ज्यांना बाळासाहेबांची काही पडली नाही. त्यांच्या विचारधारेशी देणेघेणे नाही. शिवसेना, शिवसैनिकांशी देणेघेणे नाही. त्यांना केवळ पैसे, ५० खोके यावरच केवळ डोळा आहे. इतर आमदारांनी त्यावर नक्की विचार करा. हे सहन करण्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. शिवसैनिक आमचे भोळेभाबडे आहेत. प्रत्येकाच्या वाटेला हे आले आहे. आम्ही घरादारावर तुलसीपत्र ठेऊन संघटनेचे काम केले. त्यातून शिवसेना उभी केलीय. वापरा आणि फेकून द्या असं उद्धव ठाकरे कधी करतील हे कुणालाही कळणार नाही असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला.

दरम्यान, शिवसेनेचे पैसे असतील ते मागितले तर पाप काय? शिवसेना पक्षाला ते पैसे दिले होते. ते मागितले त्यात चुकीचे काय नाही. सरकार मूळप्रश्नापासून पळतंय, जनतेच्या प्रश्नाला उत्तर दिले जात नाही. लक्षवेधी मांडली जाते मंत्री उत्तर द्यायला तयार नाहीत. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना समर्थन देण्याचे काम सरकार करतंय. शासन आपल्या दारी येऊन निवडणुकीचे पत्र देते. शासनाच्या दारात अधिकारी बदल्यांसाठी फिरतात. मोठ्या प्रमाणात बदलीसाठी भ्रष्टाचार होतोय. सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यास कुचकामी ठरतेय. विरोधी पक्षाने सरकारला जाब विचारण्यास यशस्वी ठरले आहे असं प्रत्युत्तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना