शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' ५० कोटींवरून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला; सभागृहात पत्रच दाखवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 09:48 IST

ज्यांना बाळासाहेबांची काही पडली नाही. त्यांच्या विचारधारेशी देणेघेणे नाही. शिवसेना, शिवसैनिकांशी देणेघेणे नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला.

मुंबई – गेल्या वर्षी शिवसेनेतील ५५ पैकी ४० आमदारांनी वेगळी भूमिका घेत भाजपासोबत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांच्या पाऊलामुळे शिवसेनेत २ गट निर्माण झाले. त्यानंतर खरी शिवसेना कोणाची हा वाद कोर्ट, निवडणूक आयोगापर्यंत पोहचला. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना, धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. परंतु शिवसेनेतील रक्कम कुणाला मिळणार हा प्रश्न उभा राहिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत एक पत्र दाखवून उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, एकीकडे आम्हाला रोज शिव्याशाप देता तर दुसरीकडे ५० कोटी आम्हाला द्या असे पत्र पाठवता. शिवसेना खात्यातील हे ५० कोटी आहेत. आता शिवसेना कोणाकडे आहे? आमच्याकडे. आम्हाला गद्दार म्हणायचे, खोकेबाज म्हणायचे मग खरे खोकेबाज कोण? मी १ मिनिटाचाही विचार न करता तात्काळ पैसे देऊन टाका असं सांगितले. कारण आम्हाला तुमची संपत्ती, मालमत्ता काही नको, बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. हे ५० कोटी आम्ही देऊन टाकले असं त्यांनी सांगितले.

तसेच ज्यांना बाळासाहेबांची काही पडली नाही. त्यांच्या विचारधारेशी देणेघेणे नाही. शिवसेना, शिवसैनिकांशी देणेघेणे नाही. त्यांना केवळ पैसे, ५० खोके यावरच केवळ डोळा आहे. इतर आमदारांनी त्यावर नक्की विचार करा. हे सहन करण्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. शिवसैनिक आमचे भोळेभाबडे आहेत. प्रत्येकाच्या वाटेला हे आले आहे. आम्ही घरादारावर तुलसीपत्र ठेऊन संघटनेचे काम केले. त्यातून शिवसेना उभी केलीय. वापरा आणि फेकून द्या असं उद्धव ठाकरे कधी करतील हे कुणालाही कळणार नाही असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला.

दरम्यान, शिवसेनेचे पैसे असतील ते मागितले तर पाप काय? शिवसेना पक्षाला ते पैसे दिले होते. ते मागितले त्यात चुकीचे काय नाही. सरकार मूळप्रश्नापासून पळतंय, जनतेच्या प्रश्नाला उत्तर दिले जात नाही. लक्षवेधी मांडली जाते मंत्री उत्तर द्यायला तयार नाहीत. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना समर्थन देण्याचे काम सरकार करतंय. शासन आपल्या दारी येऊन निवडणुकीचे पत्र देते. शासनाच्या दारात अधिकारी बदल्यांसाठी फिरतात. मोठ्या प्रमाणात बदलीसाठी भ्रष्टाचार होतोय. सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यास कुचकामी ठरतेय. विरोधी पक्षाने सरकारला जाब विचारण्यास यशस्वी ठरले आहे असं प्रत्युत्तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना