शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

Gram Panchayat Election Result: शिंदे गट-भाजपाने ३०० हून अधिक ग्रा. पंचायती जिंकल्या; फडणवीसांचा मोठा दावा, पहा जिल्ह्यानुसार आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 19:20 IST

Gram Panchayat Election Result Update: दोन जिल्ह्यांत भाजपाला घवघवीत यश, शिंदे गटाला एकाच जिल्ह्याने तारले... राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेला किती...

राज्यात झालेल्या ५४७ ग्राम पंचायतींमधील निवडणुकांचा आज निकाल हाती आला आहे. यामध्ये भाजपाने ३०० हून अधिक ग्रा. पंचायतींवर वर्चस्व स्थापित केल्याचा दावा केला आहे. हा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच जनतेने शिंदेंची शिवसेना आणि भाजपाच्या युतीला स्वीकारल्याचे ते म्हणाले. 

 आजच्या ग्रामपंचायतीच्या निकालांनी आमच्या शिवसेना भाजप युतीवर शिक्कामोर्तब केले आहे. हा तुम्ही म्हणता तसा शिंदे गट नसून ही शिवसेना आहे. दुसरी जी आहे ती शिल्लक सेना आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना असून ती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी, हिंदुत्वावर चालणारी शिवसेना आहे. आजच्या निकालात साडे पाचशे पैकी ३०० हून अधिक जागांवर आम्ही जिंकलो आहोत. ही भविष्याची नांदी आहे. शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजप यापुढे एकत्रित निवडुका लढवणार आहे. सगळीकडे आमचा विजय होताना तुम्हा सर्वांना दिसेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. 

यानंतर शिंदे यांनी ठाकरे गटाला त्यांचे अडीच वर्षांचे काम पाहून लोकांनी मत दिले, आम्हाला दोन महिन्यांचे काम पाहून मत दिले. यामुळे कोणाचा चांगले यश मिळाले हे तुम्हीच ठरवा, असा टोला लगावला. 

आतापर्यंत हाती आलेले निकाल...

  • नाशिकमध्ये एकूण 88 ग्रामपंचायतींपैकी 41 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळविले आहे. शिवसेनेने 13 तर भाजपा आणि काँग्रेसकडे प्रत्येकी पाच ग्रा. पं. गेल्या आहेत. माकप- 08 आणि शिंदे गटाकडे १ ग्रा. पंचायत गेली आहे. 
  • पुण्यात ६१ पैकी ३० ग्रा. पंचायती या राष्ट्रवादीकडे, सहा बिनविरोध झाल्या आहेत. भाजपाकडे ३, शिवसेना २, शिंदे गट ३ आणि स्थानिक आघाड्यांकडे २३ ग्रामपंचायती गेल्या आहेत.
  • यवतमाळमध्ये ७० पैकी ३३ ग्रा. पंचायती काँग्रेसकडे गेल्या आहेत. शिवसेना 3, भाजप 20, राष्ट्रवादी 09, मनसे 1 आणि स्थानिक आघाड्यांकडे 6 ग्राम पंचायती गेल्या आहेत. 
  • जळगाव जिल्ह्यात 13 पैकी शिवसेना, राष्ट्रवादी आणि शिंदे गटाला प्रत्येकी ३, अपक्षांना ४ आणि भाजपा, काँग्रेसला खातेही खोलता आलेले नाही. 
  • धुळे जिल्ह्यात भाजपाला ३३ ग्रा. पं. पैकी ३२ जागांवर भाजपा जिंकली आहे. एकच ग्रा. पं. राष्ट्रवादीला मिळाली आहे. 
  • अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी २०, भाजपा १६, आणि स्थानिक आघाड्यांना ९ ग्रा. पंचायती मिळाल्या आहेत. 
  • कोल्हापूरमध्ये एकाच ग्रा. पंचायतीची निवडणूक होती. यामध्ये मुश्रीफ गटाने बाजी मारली. 
  • नंदुरबारमध्ये ७५ पैकी ४२ ग्रा. पंचायतींवर भाजपाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. शिंदेगटाला २८, अपक्ष ४ आणि राष्ट्रवादीला १ जागा मिळाली आहे.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसgram panchayatग्राम पंचायतEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस