शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

आणखी २-३ दिवस आम्ही विरोधी पक्षात; नाराजीनाट्यात रावसाहेब दानवेंचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 14:01 IST

मुख्यमंत्री असताना २ वर्ष मंत्रालयात गेले नाहीत. आमदारांना भेटत नव्हते. निधी राष्ट्रवादीला मिळत होता असं दानवे म्हणाले.

जालना - आज मी केंद्रात मंत्री आहे, टोपे राज्यात मंत्री आहेत. मला अडीच वर्ष झाले तर टोपे यांना १४ वर्ष झाली. तुमच्या कारकिर्दीत आणखी काही कामे करायची असतील तर लवकर करून घ्या, वेळ निघून चालली आहे. आम्ही २-३ दिवस विरोधी पक्षात आहोत असं सूचक विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथील कार्यक्रमात बोलताना केले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात भाजपा पुन्हा सत्तेत येणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. 

दानवे आणि टोपे यांच्या उपस्थितीत जालना शहरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि अन्न आणि औषधी प्रशासन विभागाच्या कार्यालयाच भूमिपूजन करण्यात आलं. त्यावेळी दानवे म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना एकत्र सामोरे गेले. जनतेने युतीला बहुमत दिले. प्रचारात मोदी-शाह व्यासपीठावर बोलले देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील. तेव्हा शिवसेना आणि शिवसैनिक काहीही बोलले नाही. परंतु जेव्हा निकालानंतर आमच्याशिवाय सरकार बनत नाही असं लक्षात आल्यानंतर असंगाशी संगत केली. ज्यांच्यावर टीका केली त्यांच्यासोबत सरकार बनवले. सरकार बनवल्यानंतरही चांगले चालवायला पाहिजे होते असं त्यांनी सांगितले. 

परंतु मुख्यमंत्री असताना २ वर्ष मंत्रालयात गेले नाहीत. आमदारांना भेटत नव्हते. निधी राष्ट्रवादीला मिळत होता, काँग्रेसला मिळत होता पण शिवसेनेच्या आमदारांना मिळत नव्हता ही त्यांची तक्रार आहे. राज्याच्या प्रश्नाकडे तिन्ही पक्षाच्या लोकांनी दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम शिवसेनेत असंतोष वाढला. आज शिवसेनेचे ४० आमदारांनी बंड केले. सरकार आम्ही पाडणार नाही असं आम्ही नेहमीच सांगितले. भाजपाचा याच्याशी काहीही संबंध नाही. आम्ही वेट अँन्ड वॉचच्या भूमिकेत आहोत असंही रावसाहेब दानवे म्हणाले. 

शिंदे-फडणवीस यांची भेट नाही एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांची भेट झाली नाही. आमच्या बैठका सुरूच असतात. आम्ही बैठका घेतो, राज्याच्या राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. नाराज गटाने आमच्याकडे प्रस्ताव दिला नाही. प्रस्ताव आल्यास पक्षाचे नेते एकत्र बसून ठरवतील. राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही असं सांगत रावसाहेब दानवेंनी अधिक भाष्य करणं टाळलं. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा