शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

Maharashtra Political Crisis: “बांगर साहेब, मला ५० लाखांची गरज होती, आता तर तुम्हाला ५० कोटी मिळालेत ना!”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 09:34 IST

Maharashtra Political Crisis: शिंदे गटातील बंडखोर आमदार संतोष बांगर आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बैठकांचा सपाटा लावल्याचे दिसत असून, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. निष्ठा आणि शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून  राज्यभर दौरे सुरू केले आहेत. दुसरीकडे शिंदे गटाला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. यातच या सर्व बंडखोरांना कोट्यवधी रुपये मिळाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अगदी शेवटी बंडखोरी करून शिंदे गटात गेलेल्या बंडखोर आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांना एका कार्यकर्त्यांनी केलेल्या फोनची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाल्याचे सांगितले जात आहे. 

शिंदे गटाच्या अनेक आमदारांचे कार्यकर्त्यांसोबतचे फोनवरील संभाषण व्हायरल झाले आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांकडून जाणीवपूर्वक हा फंडा वापरला जात असल्याची चर्चा होती. मात्र, अगोदर कामाला येत असलेला हा फंडा आता याच आमदारांच्या अंगलट येताना दिसत आहे. कारण काही शिवसैनिक हे फोन करून बंडखोर आमदारांचीच फिरकी घेताना दिसत आहेत. शिंदे गटातील हिंगोलीच्या कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्याबाबतही असाच किस्सा घडला आहे. 

आता तर तुम्हाला ५० कोटी मिळालेत ना!

संतोष बांगर यांनी अलीकडेच शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याने फोन केला होता. त्यावेळी हा कार्यकता संतोष बांगर यांच्याकडे उसने पैसे मागत होता. त्याच्या बोलण्याचा एकूण रोख खोचक होता. फोनवरून हा शिवसैनिक संतोष बांगर यांना म्हणाला की, साहेब, मला ५० एक लाखांची अडचण होती. तुम्हाला ५० कोटी भेटले असतील ना. मला खरंच अडचण होती. आता मला ५० लाख रुपये द्या.सहा महिन्यांत पैसे माघारी देतो, असे या कार्यकर्त्याने म्हटले. त्यावर संतोष बांगर हे चांगलेच वैतागले होते. त्यांची ही ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या क्लीपसंदर्भात अद्याप कोणाकडूनही पुष्टी करण्यात आलेली नाही. मात्र, संतोष बांगर यांच्याकडून या सगळ्या प्रकरणावर कोणतेही भाष्य केलेले नाही. 

दरम्यान, दुसऱ्या एका फोन कॉलवर एक शिवसैनिक संतोष बांगर यांना जाब विचारताना ऐकायला मिळत आहे. हा शिवसैनिक संतोष बांगर यांना उद्देशून म्हणाला की, आपल्याला गद्दार बोलणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा, असे तुम्ही शिवसैनिकांना म्हणाला होतात. तुम्ही गोरगरिबांची पोरं असलेल्या कार्यकर्त्यांना दुसऱ्यांच्या कानाखाली आवाज काढायला सांगता. तुम्ही स्वत: गद्दार बोलणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा ना. गोरगरिबांच्या पोरांना कशाला चिथावणी देता, असे या कार्यकर्त्याने म्हटले. यावर संतापलेल्या संतोष बांगर यांनी फोन कॉलच कट केला होता. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना