शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

“हिंदू धर्माचे सण आल्यानंतरच उद्धव ठाकरे यांना ही नाटकं का सुचतात?”

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 7:13 PM

उबाठा गटाचे काही लोक बिल्डिंग मटेरियलचा धंदा थाटून बसले होते. शाखा भाड्याने दिली होती. शाखा भाड्याने देणे हे आईच दूध विकून खाण्याचा प्रकार आहे असं शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे म्हणाल्या.

मुंबई –  हिंदू धर्माचे सण उत्सव आल्यानंतरच उद्धव ठाकरे यांना ही नाटकं का सुचतात? हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार आणि तत्वांना बुलडोझर लावून उद्धव ठाकरे यांनी सत्ता मिळवली. अनेक सण उत्सवावर निर्बंध लागले होते आणि आता निर्बंध मुक्त सण उत्सव साजरे होत आहेत. आज दिवाळी सारखा अत्यंत मोठा सण होताना दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी होऊ नये असे उद्धव ठाकरे यांना वाटते का? प्रत्येक वेळी हिंदूंच्या सण उत्सवाला गालबोट लावण्याचे काम ते का करतात असा सवाल शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांनी विचारला आहे.

ज्योती वाघमारे म्हणाल्या की, मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात केवळ अडीच दिवस मंत्रालयात उपस्थिती दर्शवली हा विश्वविक्रम उद्धव ठाकरे यांनी केला. सत्तेवर असताना त्यांना शिवसेना शाखा व कार्यकर्ता दिसला नाही. आज मुंब्रा शाखेला भेट द्यायला निघालेत मात्र आज उशीर झाला आहे. वेळीच हे काम केलं असतं तर आज घर का ना घाट का अशी स्थिती झाली नसती. संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे, अशा परिस्थितीत राजकीय चिखल फेकीचे वातावरण महाराष्ट्रात निर्माण केले गेले आहे. अत्यंत दुर्दैवी हा प्रकार आहे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत मुंब्रा शाखा ही धर्मवीर आनंद दिघे यांनी घेतली होती. त्या शाखेचे जे प्रमुख आहेत, त्यांचे वय ७५ वर्षापेक्षा अधिक आहे. ते जगताप हे शिवसेना शिंदे गटासोबत आहेत. ही शाखा शिवसेनेची आत्मा आहे. या शाखेत अनेक वर्ष समाजकारण आणि सेवा घडायचे. मात्र आज तिथे उबाठा गटाचे काही लोक बिल्डिंग मटेरियलचा धंदा थाटून बसले होते. शाखा भाड्याने दिली होती. शाखा भाड्याने देणे हे आईच दूध विकून खाण्याचा प्रकार आहे. तुम्ही तुमचा पक्ष शरद पवार यांना भाड्याने दिला. मुंबई महापालिका कॉन्ट्रॅक्टरला भाड्याने दिली. तुमचं सरकार काँग्रेसला भाड्याने दिले आणि अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी भाड्याने देऊन जगण्याचे राजकारण तुम्ही करत आहात. असा घणाघाती आरोप शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केला.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला आमदार जितेंद्र आव्हाड, खा. संजय राऊत हे यापूर्वी जातीय दंगली घडविण्याची भाषा करीत होते. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सामाजिक धार्मिक समता धोक्यात आणून महाराष्ट्रात राजकारणाची पोळी भाजणार आहात का? खासदार संजय राऊत यांनी आता पिंजरा व पोपट घेऊन सगळ्यांचे भविष्य सांगत बसावे. तेवढेच काम आता त्यांना उरले आहे. वास्तविक पाहता त्यांनी स्वतःच्या भविष्याची चिंता करावी असं वाघमारे यांनी राऊतांना म्हटलं आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना