शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

दरदिवशी आठ शेतकरी लावतात गळ्याला फास, दहा महिन्यांत २,४१४ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले

By अतुल कुलकर्णी | Updated: November 23, 2017 06:41 IST

मुंबई : नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतक-यांनी आत्महत्या करू नयेत, म्हणून राज्य सरकारने कर्जमाफी देऊ केली असली, तरी राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही.

मुंबई : नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतक-यांनी आत्महत्या करू नयेत, म्हणून राज्य सरकारने कर्जमाफी देऊ केली असली, तरी राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. दरदिवशी आठ, याप्रमाणे गत दहा महिन्यांत २,४१४ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले आहे.दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यासारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतीवर आलेली नापिकी, बी-बियाण्यांवरील वाढता खर्च, शेतमालाचे पडलेले भाव, घटलेली उत्पादकता आणि त्यातून आलेला कर्जबाजारीपणा, या कारणांस्तव शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित आहेत. राज्य सरकारने जुलै महिन्यात कर्जमाफीची घोषणा केली. मात्र त्यानंतर, आॅगस्ट, सप्टेंबर ते आॅक्टोबर या काळात ७८८ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.सहा महसूल विभागीय कार्यालयांतील आकडेवारीनुसार जानेवारी ते आॅक्टोबर या दहा महिन्यांत राज्यातील २,४१४ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. पैकी १,२७७ आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांना सरकारी मदत मिळाली आहे. उर्वरित ११३७ शेतकºयांची आत्महत्या शासकीय निकषांस पात्र ठरलेल्या नाहीत. अर्थात, त्यांनी कर्जबाजारीपणा वा नापिकीमुळे नव्हे, तर अन्य कारणांनी मृत्यूला कवटाळले, अशी सरकारची माहिती आहे.>अधिकारी काम करायला तयार नाहीतशेतकºयांना आर्थिक दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी सरकारला उपाययोजना सुचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची स्थापना केली. मात्र, आपण सुचविलेले उपाय व दिलेल्या दिलेलेसल्ले शासकीय अधिकाºयांनी केराच्या टोपलीत टाकले. सगळी यंत्रणा सडलेली आहे. अधिकारी जमिनीवर काम करायलाच तयार नाहीत. सरकारच्या चांगल्या योजना हाणून पाडणाºया अधिकाºयांची जोपर्यंत हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत आत्महत्या थांबणार नाहीत, असे उद्वेगजनक मत या मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.मागच्या वर्षी रोज सरासरी ६ शेतकरी आत्महत्या करत होते. या वर्षी ते प्रमाण ८ वर गेले आहे, यावरून सरकारचा कृषी विकासाचा दावा किती फसवा आहे, हे दिसून येते. कर्जमाफी मिळाली नाही, उलट सक्तीची वीजबिलाचीवसुली चालू आहे.- धनंजय मुंडे, विरोधीपक्ष नेते, विधानपरिषदसरकार जोपर्यंत धोरणांमध्ये बदल करत नाही, तोपर्यंत आत्महत्यांचे सत्र थांबणार नाही. मुख्यमंत्री एकटे काही चांगले करतील, असे म्हणून सगळी बोटे त्यांच्याकडे दाखवून काहीही साध्य होणार नाही.-किशोर तिवारी, अध्यक्ष, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनशेतकºयांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यास हे सरकार कमी पडले. आपले कोणीच नाही असे वाटून शेतकºयांनी हा पर्याय निवडला. सदाभाऊ खोत मंत्री झाले, पण ते काहीही करू शकले नाहीत.- खा. राजू शेट्टी,शेतकरी संघटना

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याGovernmentसरकार