शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

दरदिवशी आठ शेतकरी लावतात गळ्याला फास, दहा महिन्यांत २,४१४ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले

By अतुल कुलकर्णी | Updated: November 23, 2017 06:41 IST

मुंबई : नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतक-यांनी आत्महत्या करू नयेत, म्हणून राज्य सरकारने कर्जमाफी देऊ केली असली, तरी राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही.

मुंबई : नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतक-यांनी आत्महत्या करू नयेत, म्हणून राज्य सरकारने कर्जमाफी देऊ केली असली, तरी राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. दरदिवशी आठ, याप्रमाणे गत दहा महिन्यांत २,४१४ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले आहे.दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यासारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतीवर आलेली नापिकी, बी-बियाण्यांवरील वाढता खर्च, शेतमालाचे पडलेले भाव, घटलेली उत्पादकता आणि त्यातून आलेला कर्जबाजारीपणा, या कारणांस्तव शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित आहेत. राज्य सरकारने जुलै महिन्यात कर्जमाफीची घोषणा केली. मात्र त्यानंतर, आॅगस्ट, सप्टेंबर ते आॅक्टोबर या काळात ७८८ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.सहा महसूल विभागीय कार्यालयांतील आकडेवारीनुसार जानेवारी ते आॅक्टोबर या दहा महिन्यांत राज्यातील २,४१४ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. पैकी १,२७७ आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांना सरकारी मदत मिळाली आहे. उर्वरित ११३७ शेतकºयांची आत्महत्या शासकीय निकषांस पात्र ठरलेल्या नाहीत. अर्थात, त्यांनी कर्जबाजारीपणा वा नापिकीमुळे नव्हे, तर अन्य कारणांनी मृत्यूला कवटाळले, अशी सरकारची माहिती आहे.>अधिकारी काम करायला तयार नाहीतशेतकºयांना आर्थिक दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी सरकारला उपाययोजना सुचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची स्थापना केली. मात्र, आपण सुचविलेले उपाय व दिलेल्या दिलेलेसल्ले शासकीय अधिकाºयांनी केराच्या टोपलीत टाकले. सगळी यंत्रणा सडलेली आहे. अधिकारी जमिनीवर काम करायलाच तयार नाहीत. सरकारच्या चांगल्या योजना हाणून पाडणाºया अधिकाºयांची जोपर्यंत हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत आत्महत्या थांबणार नाहीत, असे उद्वेगजनक मत या मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.मागच्या वर्षी रोज सरासरी ६ शेतकरी आत्महत्या करत होते. या वर्षी ते प्रमाण ८ वर गेले आहे, यावरून सरकारचा कृषी विकासाचा दावा किती फसवा आहे, हे दिसून येते. कर्जमाफी मिळाली नाही, उलट सक्तीची वीजबिलाचीवसुली चालू आहे.- धनंजय मुंडे, विरोधीपक्ष नेते, विधानपरिषदसरकार जोपर्यंत धोरणांमध्ये बदल करत नाही, तोपर्यंत आत्महत्यांचे सत्र थांबणार नाही. मुख्यमंत्री एकटे काही चांगले करतील, असे म्हणून सगळी बोटे त्यांच्याकडे दाखवून काहीही साध्य होणार नाही.-किशोर तिवारी, अध्यक्ष, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनशेतकºयांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यास हे सरकार कमी पडले. आपले कोणीच नाही असे वाटून शेतकºयांनी हा पर्याय निवडला. सदाभाऊ खोत मंत्री झाले, पण ते काहीही करू शकले नाहीत.- खा. राजू शेट्टी,शेतकरी संघटना

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याGovernmentसरकार