शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दरदिवशी आठ शेतकरी लावतात गळ्याला फास, दहा महिन्यांत २,४१४ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले

By अतुल कुलकर्णी | Updated: November 23, 2017 06:41 IST

मुंबई : नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतक-यांनी आत्महत्या करू नयेत, म्हणून राज्य सरकारने कर्जमाफी देऊ केली असली, तरी राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही.

मुंबई : नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतक-यांनी आत्महत्या करू नयेत, म्हणून राज्य सरकारने कर्जमाफी देऊ केली असली, तरी राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. दरदिवशी आठ, याप्रमाणे गत दहा महिन्यांत २,४१४ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले आहे.दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यासारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतीवर आलेली नापिकी, बी-बियाण्यांवरील वाढता खर्च, शेतमालाचे पडलेले भाव, घटलेली उत्पादकता आणि त्यातून आलेला कर्जबाजारीपणा, या कारणांस्तव शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित आहेत. राज्य सरकारने जुलै महिन्यात कर्जमाफीची घोषणा केली. मात्र त्यानंतर, आॅगस्ट, सप्टेंबर ते आॅक्टोबर या काळात ७८८ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.सहा महसूल विभागीय कार्यालयांतील आकडेवारीनुसार जानेवारी ते आॅक्टोबर या दहा महिन्यांत राज्यातील २,४१४ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. पैकी १,२७७ आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांना सरकारी मदत मिळाली आहे. उर्वरित ११३७ शेतकºयांची आत्महत्या शासकीय निकषांस पात्र ठरलेल्या नाहीत. अर्थात, त्यांनी कर्जबाजारीपणा वा नापिकीमुळे नव्हे, तर अन्य कारणांनी मृत्यूला कवटाळले, अशी सरकारची माहिती आहे.>अधिकारी काम करायला तयार नाहीतशेतकºयांना आर्थिक दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी सरकारला उपाययोजना सुचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची स्थापना केली. मात्र, आपण सुचविलेले उपाय व दिलेल्या दिलेलेसल्ले शासकीय अधिकाºयांनी केराच्या टोपलीत टाकले. सगळी यंत्रणा सडलेली आहे. अधिकारी जमिनीवर काम करायलाच तयार नाहीत. सरकारच्या चांगल्या योजना हाणून पाडणाºया अधिकाºयांची जोपर्यंत हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत आत्महत्या थांबणार नाहीत, असे उद्वेगजनक मत या मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.मागच्या वर्षी रोज सरासरी ६ शेतकरी आत्महत्या करत होते. या वर्षी ते प्रमाण ८ वर गेले आहे, यावरून सरकारचा कृषी विकासाचा दावा किती फसवा आहे, हे दिसून येते. कर्जमाफी मिळाली नाही, उलट सक्तीची वीजबिलाचीवसुली चालू आहे.- धनंजय मुंडे, विरोधीपक्ष नेते, विधानपरिषदसरकार जोपर्यंत धोरणांमध्ये बदल करत नाही, तोपर्यंत आत्महत्यांचे सत्र थांबणार नाही. मुख्यमंत्री एकटे काही चांगले करतील, असे म्हणून सगळी बोटे त्यांच्याकडे दाखवून काहीही साध्य होणार नाही.-किशोर तिवारी, अध्यक्ष, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनशेतकºयांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यास हे सरकार कमी पडले. आपले कोणीच नाही असे वाटून शेतकºयांनी हा पर्याय निवडला. सदाभाऊ खोत मंत्री झाले, पण ते काहीही करू शकले नाहीत.- खा. राजू शेट्टी,शेतकरी संघटना

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याGovernmentसरकार