शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘ईआयए २०२०’ मसुदा पर्यावरणाच्या मुळावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 09:23 IST

तज्ज्ञ म्हणतात विकासासाठी निसर्गाचा ऱ्हास करण्याचे सर्व मार्ग खुले होण्याची शक्यता

- श्रीकिशन काळेपुणे : केद्रीय पर्यावरण मंत्रालयातर्फे येऊ घातलेल्या ‘पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन’ (‘ईआयए २०२०’ म्हणजे एन्व्हायर्नमेंट इम्पॅक्ट अ‍ॅनालिसिस) मसुद्यात विकासासाठी निसर्गाचा ऱ्हास करण्याचे मार्ग खुले करून देण्याचा प्रयत्न केला आहे. बेकायदा प्रकल्पाबाबत सर्वसामान्य नागरिक-पर्यावरणप्रेमींना बोलता येणार नाही. या प्रकल्पांना दंड भरून मोकळे होता येईल. जनसुनवाईही होणार नाही. शासनाने ठरविले की कुठलाही प्रकल्प, कुठल्याही जागेत व्हावा, याचीच ही पायाभरणी सुरू आहे.विकासाच्या नावाखाली १९८६ च्या पर्यावरण संरक्षण कायद्याच्या बंधनातून पळवाटा काढण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून या नव्या मसुद्यात केला जात असल्याचा आरोप पर्यावरण तज्ज्ञांनी केला आहे. यावर आक्षेप नोंदविण्याचा शेवटचा दिवस ११ आॅगस्ट आहे.नव्या मसुद्यानुसार एखाद्या बेकायदा प्रकल्पाचे काम सुरू झाल्यास ते सांगण्याचा अधिकार स्थानिकांना किंवा पर्यावरणप्रेमींना राहणार नाही. अनेक प्रकल्पांच्या जनसुनवाईमध्ये महत्त्वाचे मुद्दे समोर येतात. त्यानंतर मार्ग काढला जातो. या नव्या मसुद्यात जनसुनवाईच होणार नाही. अनेक प्रकल्पांचा परिणाम शोधण्यासाठी केला जाणारा अभ्यास यापुढे होणारच नाही. त्यामुळे पर्यावरणाचा ºहास होण्याला या मसुद्यामुळे बळ मिळणार आहे.काय आहेत धोके?एखाद्या प्रकल्पाचे काम विनापरवाना सुरू झाले तर त्याला ५ ते १० हजार रुपये प्रतिदिन दंड सुनावला जाईल. बेकायदा प्रकल्पाची सुरुवात झाली, हे सांगण्याचा अधिकार केवळ शासकीय अधिकाऱ्यांनाच असेल.प्रकल्पाची जनसुनवाई रद्द करण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना असेल.रेल्वेमार्ग, महामार्ग, कालवे, सौरऊर्जा आदी प्रकल्पांना अभ्यास, सर्वेक्षण न करताच परवानगी असेल. अहवाल सादर करण्यापासून त्यांना सूट दिली आहे.एखाद्या प्रदेशातील अनेक प्रकल्पांचा एकत्रित पर्यावरणावर काय परिणाम होणार, हे तपासले जाणार नाही.आधुनिकीकरण शब्दाची स्पष्ट व्याख्या अधिसूचनेत दिलेली नाही.संरक्षित जंगले, व्याघ्र प्रकल्पालगतच्या परिसरातदेखील प्रकल्प प्रस्तावितकेले जाऊ शकतात. त्यांना कोणत्याही अटी असणार नाहीत. २००६ च्या अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे १० कि.मी.चे अंतर बंधनकारक असणार नाही.