शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

‘ईआयए २०२०’ मसुदा पर्यावरणाच्या मुळावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 9:23 AM

तज्ज्ञ म्हणतात विकासासाठी निसर्गाचा ऱ्हास करण्याचे सर्व मार्ग खुले होण्याची शक्यता

- श्रीकिशन काळेपुणे : केद्रीय पर्यावरण मंत्रालयातर्फे येऊ घातलेल्या ‘पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन’ (‘ईआयए २०२०’ म्हणजे एन्व्हायर्नमेंट इम्पॅक्ट अ‍ॅनालिसिस) मसुद्यात विकासासाठी निसर्गाचा ऱ्हास करण्याचे मार्ग खुले करून देण्याचा प्रयत्न केला आहे. बेकायदा प्रकल्पाबाबत सर्वसामान्य नागरिक-पर्यावरणप्रेमींना बोलता येणार नाही. या प्रकल्पांना दंड भरून मोकळे होता येईल. जनसुनवाईही होणार नाही. शासनाने ठरविले की कुठलाही प्रकल्प, कुठल्याही जागेत व्हावा, याचीच ही पायाभरणी सुरू आहे.विकासाच्या नावाखाली १९८६ च्या पर्यावरण संरक्षण कायद्याच्या बंधनातून पळवाटा काढण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून या नव्या मसुद्यात केला जात असल्याचा आरोप पर्यावरण तज्ज्ञांनी केला आहे. यावर आक्षेप नोंदविण्याचा शेवटचा दिवस ११ आॅगस्ट आहे.नव्या मसुद्यानुसार एखाद्या बेकायदा प्रकल्पाचे काम सुरू झाल्यास ते सांगण्याचा अधिकार स्थानिकांना किंवा पर्यावरणप्रेमींना राहणार नाही. अनेक प्रकल्पांच्या जनसुनवाईमध्ये महत्त्वाचे मुद्दे समोर येतात. त्यानंतर मार्ग काढला जातो. या नव्या मसुद्यात जनसुनवाईच होणार नाही. अनेक प्रकल्पांचा परिणाम शोधण्यासाठी केला जाणारा अभ्यास यापुढे होणारच नाही. त्यामुळे पर्यावरणाचा ºहास होण्याला या मसुद्यामुळे बळ मिळणार आहे.काय आहेत धोके?एखाद्या प्रकल्पाचे काम विनापरवाना सुरू झाले तर त्याला ५ ते १० हजार रुपये प्रतिदिन दंड सुनावला जाईल. बेकायदा प्रकल्पाची सुरुवात झाली, हे सांगण्याचा अधिकार केवळ शासकीय अधिकाऱ्यांनाच असेल.प्रकल्पाची जनसुनवाई रद्द करण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना असेल.रेल्वेमार्ग, महामार्ग, कालवे, सौरऊर्जा आदी प्रकल्पांना अभ्यास, सर्वेक्षण न करताच परवानगी असेल. अहवाल सादर करण्यापासून त्यांना सूट दिली आहे.एखाद्या प्रदेशातील अनेक प्रकल्पांचा एकत्रित पर्यावरणावर काय परिणाम होणार, हे तपासले जाणार नाही.आधुनिकीकरण शब्दाची स्पष्ट व्याख्या अधिसूचनेत दिलेली नाही.संरक्षित जंगले, व्याघ्र प्रकल्पालगतच्या परिसरातदेखील प्रकल्प प्रस्तावितकेले जाऊ शकतात. त्यांना कोणत्याही अटी असणार नाहीत. २००६ च्या अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे १० कि.मी.चे अंतर बंधनकारक असणार नाही.