शहरं
Join us  
Trending Stories
1
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
2
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
3
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
4
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
5
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
6
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
7
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
8
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
9
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
10
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
11
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
12
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
13
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
14
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
15
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
16
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
17
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
18
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
19
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
20
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासाचे साक्षीदार रायगडसह १४ किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळविण्याच्या हालचाली, राज्य सरकारचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 05:52 IST

हे प्रयत्न यशस्वी व्हावेत यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री अमित देशमुख हे स्वतः पाठपुरावा करत आहेत. पुरातत्त्व खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, महाराष्ट्रातील रायगड, राजगडसहित १४ किल्ले तसेच महाराष्ट्र, गोव्यातील कातळ शिल्पांना युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा द्यावा, असा प्रयत्न सुरू आहे.

समीर परांजपे -

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी रायगडसहित महाराष्ट्रातील १४ किल्ले तसेच कोकणातील कातळ शिल्पांना जागतिक वारसा दर्जा मिळण्याकरिता युनेस्कोला महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व खाते एक विस्तृत प्रस्ताव पाठविणार आहे. तो प्रस्ताव तयार करण्यासाठी तज्ज्ञांकडून पुरातत्त्व खात्याने निविदा मागविल्या आहेत. त्या प्रक्रियेनंतर विस्तृत प्रस्ताव तयार करण्याचे काम आगामी दीड वर्षांत मार्गी लागेल.हे प्रयत्न यशस्वी व्हावेत यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री अमित देशमुख हे स्वतः पाठपुरावा करत आहेत. पुरातत्त्व खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, महाराष्ट्रातील रायगड, राजगडसहित १४ किल्ले तसेच महाराष्ट्र, गोव्यातील कातळ शिल्पांना युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा द्यावा, असा प्रयत्न सुरू आहे. यासंदर्भात महाराष्ट्राने पाठविलेला प्राथमिक प्रस्ताव युनेस्कोने तत्त्वत: स्वीकारला आहे. मात्र ही सर्व ठिकाणे जागतिक वारसा दर्जा मिळण्यासाठी कशी योग्य आहेत व त्यांचे जतन कसे केले जाईल याचा एक विस्तृत प्रस्ताव तज्ज्ञांकडून तयार करून घ्यावा लागतो. तो युनेस्कोला सादर केल्यानंतर त्यांची तज्ज्ञ मंडळी त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करतात. त्यानंतरच त्या स्थळांना जागतिक वारसा दर्जा देण्याबाबत युनेस्को निर्णय घेते. दरवर्षी १८ एप्रिलला युनेस्कोतर्फे जागतिक वारसा दिन साजरा केला जातो. गेल्या वर्षी महाराष्ट्रातील मराठा लष्करी स्थापत्य व गनिमी कावा या दोन गटांत १४ किल्ल्यांचा समावेश करून तो प्राथमिक प्रस्ताव युनेस्कोकडे पाठविण्यात आला होता. हीच प्रक्रिया महाराष्ट्रातील कातळ शिल्पांबाबतही पार पाडण्यात आली. गोव्यातील फणसईमाळ येथील कातळ शिल्पाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. 

या प्रमुख कातळ शिल्पांचा समावेशमहाराष्ट्रातील कशेळी, बारसू, रुंढेतळी, देवीहसोळ, जांभरुण,अक्षी, कुडोपी व गोव्यातील फणसईमाळ येथील कातळ शिल्पांना जागतिक वारसा दर्जा मिळण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. 

कोणते आहेत १४ किल्ले?-रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, मुल्हेर, रांगणा, अंकाई-टंकाई, कासा, सिंधुदुर्ग, अलिबाग (कुलाबा किल्ला), सुवर्णदुर्ग, खांदेरी

हजारो वर्षांपूर्वी चितारण्यात आलेली महाराष्ट्रातील कातळ शिल्पे हे देशाचे महत्त्वाचे सांस्कृतिक संचित असून ते नीट जतन व्हायला हवे, असे पुरातत्त्व  शास्त्रज्ञांचे मत आहे.

विस्तृत प्रस्ताव तयार करणार -कातळ शिल्पांना आणि किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या प्राथमिक प्रस्तावाला युनेस्कोने तत्त्वतः मंजुरी दिली. पुढील टप्प्यात या ठिकाणांचा विस्तृत प्रस्ताव तज्ज्ञांच्या सहभागातून तयार करून तो युनेस्कोला पाठविला जाईल.     - डॉ. तेजस गर्गे, संचालक, महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभाग 

टॅग्स :FortगडRaigadरायगडsindhudurgसिंधुदुर्गState Governmentराज्य सरकार