शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

‘ला-निनो’च्या प्रभावामुळे आंबा हंगाम लांबणार? हवामान बदलाचा परिणाम; काजू पिकालाही बसणार फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 06:55 IST

‘ऑक्टोबर हीट’मुळे जमीन कोरडी होते. त्याचा झाडांच्या मुळांवर नैसर्गिक ताण येतो. त्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये थंडी सुरू झाल्यानंतर आंबा, काजूच्या झाडांना मोहोर येण्यास प्रारंभ होतो. मात्र ‘ला-निनो’च्या प्रभावामुळे वादळी पाऊस अधूनमधून सुरूच आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा अद्याप कायम आहे. जर हा ओलावा कमी झाला नाही तर आंबा हंगाम लांबणीवर पडणार, हे निश्चित.

रत्नागिरी : पॅसिफिक महासागरात ‘ला-निनो’चा प्रभाव मे महिन्यापासून राहिल्याने यावर्षी पावसाळा लांबला आहे. हेच वातावरण कायम राहिल्यास हवामानातील बदलाचा परिणाम आंबा, काजू या पिकांवर होण्याची भीती आहे. परिणामी, आंब्याचा हंगाम यंदा लांबणीवर पडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. ‘ऑक्टोबर हीट’मुळे जमीन कोरडी होते. त्याचा झाडांच्या मुळांवर नैसर्गिक ताण येतो. त्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये थंडी सुरू झाल्यानंतर आंबा, काजूच्या झाडांना मोहोर येण्यास प्रारंभ होतो. मात्र ‘ला-निनो’च्या प्रभावामुळे वादळी पाऊस अधूनमधून सुरूच आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा अद्याप कायम आहे. जर हा ओलावा कमी झाला नाही तर आंबा हंगाम लांबणीवर पडणार, हे निश्चित.

काय आहे ‘ला-निनो’?पॅसिफिक महासागरामध्ये विषुववृत्तीय प्रदेशातील पाण्याचे तापमान अचानक कमी होते. यामुळे आशिया व पॅसिफिक महासागराच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. पॅसिफिक महासागरात मे महिन्यापासून शून्य ते उणे ०.५ एवढे तापमान राहिले आहे. सध्या हे तापमान उणे १ इतके झाले आहे. त्यामुळे या स्थितीला नॉर्मल ‘ला-निनो’ असे संबोधले जाते. सध्या नॉर्मल ‘ला-निनो’चा प्रभाव आहे. त्याच्या प्रभावामुळे जागतिक थंडीचीही लाट येऊ शकते.

असा आहे ‘अल्-निनो’ -‘अल्-निनो’ म्हणजे विषुववृत्तीय प्रदेशातील पॅसिफिक महासागरात पाण्याचे तापमान अचानक वाढणे. यामुळे आशिया व प्रशांत महासागराच्या प्रदेशात पाऊस कमी होऊन दुष्काळी स्थिती उद्भवते व दक्षिण अमेरिका खंडात अतिवृष्टी होऊन पुराचा सामना करावा लागतो. सध्या पाऊस थांबण्यासाठी ‘अल्-निनो’चा प्रभाव वाढण्याची आवश्यकता आहे. ‘अल-निनो’ चा प्रभाव वाढला तर उबदार वातावरण किंवा उष्णतेची लाट येऊ शकते.

भारतीय हवामान विभागाने मार्चपर्यंत ‘ला निनो’ नॉर्मल राहण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे हवेत गारठा राहण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर निम्मा अधिक संपला तरी पाऊस रेंगाळला आहे. ऑक्टोबर हीट जाणवली नसल्याने झाडांच्या मुळांना नैसर्गिक ताण न बसल्याने गारठा वाढला तरी त्याचा प्रभाव झाडांवर होणार नाही. परिणामी यावर्षी आंबा हंगाम लांबण्याची शक्यता आहे. -डॉ. व्ही. जी. मोरे, हवामान शास्त्रज्ञ, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.

टॅग्स :Mangoआंबाweatherहवामान