शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावरही परिणाम; भाजपचे मनोबल वाढले, मविआची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 07:03 IST

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीला करावी लागणार मोर्चेबांधणी

यदु जोशी

मुंबई : चारपैकी तीन राज्यांमध्ये भाजपने मिळविलेली सत्ता लक्षात घेता या पक्षाच्या महाराष्ट्रातील नेते, कार्यकर्त्यांचे मनोबल नक्कीच वाढणार आहे. लोकसभा निवडणुकीत ४२चा आकडा गाठण्यासाठीच्या महाराष्ट्र भाजपच्या प्रयत्नांना त्यामुळे  बळ मिळेल. भाजप आणि मित्रपक्षांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीला ठोस रणनीती आखावी लागणार आहे.

लोकसभा निवडणूक चार महिन्यांवर असताना मिळालेले हे यश महाराष्ट्रातील भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणारे ठरले आहे. मध्य प्रदेशात २०१८ मध्ये काँग्रेसचे सरकार पाडून भाजपने सरकार स्थापन केले होते. यावेळी भाजपचा तेथे पराभव झाला असता तर काँग्रेसचे सरकार पाडण्याचा राग मतदारांनी व्यक्त केला, असा तर्क दिला गेला असता आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही रोष आहे आणि तो लोकसभा व विधानसभा निवडणुकीत व्यक्त होईल, असे म्हटले गेले असते. मात्र, हा तर्क महाराष्ट्रातही लागू होणार नाही असा मुद्दा रेटण्यासाठीचे ठोस कारण महाराष्ट्रातील भाजपला मिळाले आहे. 

माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण यांचा तेलंगणातील यशात वाटाकाँग्रेसने तेलंगणामध्ये मिळविलेल्या मोठ्या विजयाच्या शिल्पकारांपैकी दोन नेते महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे हे अ.भा. काँग्रसचे तेलंगणासाठीचे प्रभारी आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे तेलंगणामध्ये काँग्रेसचे निवडणूक प्रभारी होते. ठाकरे-चव्हाण यांनी आखलेल्या रणनीतीचा मोठा फायदा काँग्रेसला झाला. महाराष्ट्रातील अनेक लहान-मोठ्या नेत्यांना निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.

चार राज्यांच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वाधिक २२ सभा अन् रोड शो आज निकाल जाहीर झालेल्या चार राज्यांपैकी तेलंगणा वगळता इतर तीन ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे स्टार प्रचारक होते. तेलंगणातही त्यांनी प्रचार केला. ४ राज्यांमध्ये त्यांनी २२ सभा घेतल्या आणि रोड शो केले. बहुतेक ठिकाणी भाजपला चांगले यश मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजस्थान आणि तेलंगणामध्ये प्रचाराला गेले होते. भाजपच्या राज्यातील तीस आमदारांना मध्य प्रदेश आणि तेलंगणामधील उमेदवार निश्चित करताना मूल्यांकन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

मोदींचा चेहरा समोर ठेवून फक्त लोकसभा निवडणूक जिंकता येते या समजाला तीन राज्यांमधील भाजपच्या विजयाने छेद दिला आहे.  राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमधून व्यवसाय आणि रोजगारासाठी मुंबईत येणाऱ्यांची  संख्या मोठी आहे. आता मुंबईत भाजपला त्याचा फायदा होऊ शकतो. महाविकास आघाडीसमोरील आव्हाने आता वाढतील. शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्याबाबत जागावाटप वाटाघाटीची भाजपची ताकद वाढली आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत राज्यातील सध्याचे मंत्री, आमदारांना उतरवले जाऊ शकते. भाजपच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे या मध्य प्रदेशच्या सहप्रभारी आहेत. तिथे पक्षाला रेकॉर्डब्रेक यश मिळाले. अनेक घटक महत्त्वाचे होते, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाElectionनिवडणूकMahavikas Aghadiमहाविकास आघाडी