शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आरटीई प्रवेश नाकारणाऱ्या शाळांची मान्यता होणार रद्द – शिक्षणाधिकारी मीना यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 15:10 IST

राज्यात तसेच जिल्हामध्ये सध्या आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरु असून काही शाळा बालकांना प्रवेश देण्यास आडकाठी करत असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनात आले असून, प्रवेश देण्यास मनमानी करणाऱ्या शाळांच्या शाळा मान्यता काढण्यात येणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी मीना यादव यांनी एका बैठकी दरम्यान दिली.

ठाणे : राज्यात तसेच जिल्हामध्ये सध्या आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरु असून काही शाळा बालकांना प्रवेश देण्यास आडकाठी करत असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनात आले असून, प्रवेश देण्यास मनमानी करणाऱ्या शाळांच्या शाळा मान्यता काढण्यात येणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी मीना यादव यांनी एका बैठकी दरम्यान दिली.

आरटीई 25 टक्के अधिसुचना नुसार शाळेचे मुख्याध्यापक हे शाळा रजिस्ट्रेशन साठी पूर्णत: जबाबदार आहेत. पालकांनी पाल्यांचे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर सोडत पध्दतीने ज्या बालंकाचे प्रवेश शाळांमध्ये झालेले आहेत त्या संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी  बालकांना प्रवेश देणे अधिसूचनेनुसार बंधनकारक आहे. प्रवेशाची अंतिम दिनांक 24 मार्च 2018 असल्याने तात्काळ कार्यवाही करुन बालकाचे प्रवेश होतील यासाठी त्वरीत कार्यवाही करण्याचे आदेश  शिक्षणाधिकारी यांनी सर्व शाळांना दिले आहेत. *शाळांना कोणत्याही प्रकराचे शुल्क आकारता येणार नाही

शाळांना कोणत्याही विदयार्थ्यांकडुन प्रवेश नोंदणी शुल्क, माहिती पुस्तिका शुल्क, शिक्षण शुल्क अथवा कोणत्याही प्रकारचे शुल्क किंवा निधी पालंकाकडुन किंवा विदयार्थ्यांकडुन प्रवेश घेताना आकारता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले