शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

संजय राऊत यांना ईडीचे समन्स, चर्चा मात्र ‘टायमिंग’ची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2022 14:50 IST

गोरेगावच्या पत्राचाळ पुनर्विकासामध्ये १,०३९ कोटी ७९ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याच्या आरोप करत २०१८ मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

मुंबई : राजकीय सत्तासंघर्ष एकीकडे तीव्र होत असतानाच सोमवारी दुपारी ईडीने शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी चौकशीसाठी समन्स जारी केले आहे. ईडीने राऊत यांना मंगळवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, आपल्याला अलिबागला जायचे असून ईडीच्या अधिकाऱ्यांकडून आपण पुढील वेळ मागून घेणार असल्याचे राऊत यांनी माध्यमांना सांगितले. गोरेगावच्या पत्राचाळ पुनर्विकासामध्ये १,०३९ कोटी ७९ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याच्या आरोप करत २०१८ मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे माजी संचालक प्रवीण राऊत, राकेश कुमार वाधवान, सारंग कुमार वाधवान यांच्याविरोधात ही तक्रार म्हाडा अधिकाऱ्यांनी दिली होती. या प्रकरणी ईडीने चौकशीची सूत्रे हाती घेतली आणि ईडीने केलेल्या चौकशीदरम्यान त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून आले. या प्रकरणी एचडीआयएल कंपनीने १०० कोटी रुपये प्रवीण राऊत यांच्या खात्यात वळविल्याचे दिसून आले. प्रवीण राऊत यांनी हे पैसे त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि काही व्यावसायिकांच्या खात्यामध्ये फिरवल्याचा ठपका ईडीने ठेवला. याच पैशांतील ८३ लाख रुपयांची रक्कम प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा झाली. मात्र ईडीची चौकशी सुरू झाल्यानंतर वर्षा राऊत यांनी ५५ लाख रुपये माधुरी यांना परत केल्याचे ईडी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे आणि याच पैशांचा वापर करून वर्षा राऊत यांनी त्यांचा दादर येथील फ्लॅट खरेदी केल्याचेही ईडीचे म्हणणे आहे. तसेच, याच कालावधीमध्ये वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटेकर यांच्या नावे किहिम येथे आठ भूखंडांचीही खरेदी झाली. या भूखंड खरेदीतील अनेक व्यवहार हे रोखीने झाल्याचाही ठपका ईडीने ठेवला आहे. दरम्यान, या प्रकरणी ईडीने वर्षा राऊत यांचा दादर येथील फ्लॅट आणि किहिम येथील ८ भूखंड यांची एप्रिल महिन्यात तात्पुरती जप्ती केली आहे. तर प्रवीण राऊत यांना यापूर्वीच ईडीने अटक केली आहे. संजय राऊत ट्विटरवर म्हणतात... -- मला आत्ताच समजले ईडीने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. - मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्वीकारणार नाही. या मला अटक करा (विशेष म्हणजे राऊत यांनी या ट्विटमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.)

उपलब्ध माहितीनुसार गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्विकासाचे काम गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले होते. पत्राचाळीतील ६७२ घरांच्या पुनर्विकासाचे हे काम होते.

१,०३९ कोटी रुपयांचा घोटाळा... -येथील लोकांचे पुनर्विकासाचे काम केल्यानंतर यात अतिरिक्त बांधकाम करत ते बिल्डरने म्हाडाला हस्तांतरित करणे अपेक्षित होते. मात्र, बिल्डरने हे बांधकाम न करता यातील चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) हा नऊ अन्य बिल्डरांना विकला आणि त्यापोटी त्याला ९०१ कोटी ७९ लाख रुपये मिळाले. तसेच, तेथील जागेच्या विक्रीसाठी ग्राहकांकडून बिल्डरने आगाऊ रक्कमही गोळा केली होती. ही रक्कम  १३८ कोटी रुपये इतकी होती. अशा प्रकारे यामध्ये एकूण १,०३९ कोटी ७९ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय