शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

मीरा-भाईंदरमध्ये ईको फ्रेंडली बाप्पाची प्रतिष्ठापना, देखाव्यात सामाजिक संदेशावर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 20:20 IST

भाईंदर पूर्वेच्या नर्मदा नगरमधील श्रद्धा-सबुरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा युरोपमधील साडेसहाशे वर्षापूर्वी एका झाडातील स्वयंभू गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. ही मूर्ती एका वृक्षातून प्रगट झाल्याची माहिती असून त्याची प्रतिकृती मातीद्वारे साकारण्यात आली आहे.

राजू काळे/ भार्इंदर, दि. 31 - भाईंदर पूर्वेच्या नर्मदा नगरमधील श्रद्धा-सबुरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा युरोपमधील साडेसहाशे वर्षापूर्वी एका झाडातील स्वयंभू गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. ही मूर्ती एका वृक्षातून प्रगट झाल्याची माहिती असून त्याची प्रतिकृती मातीद्वारे साकारण्यात आली आहे. देखाव्यात चलचित्राद्वारे शहरातील समस्यांची तीव्रता दर्शविण्यात आली असून त्या सुधारण्यासाठी सामान्य नागरिक प्रशासन व राजकारण्यांकडे मागणी करीत असल्याचे दाखविण्यात आले आहे. 

मंडळाचे यंदा ७ वे वर्ष असून प्रत्येक वर्षी मातीच्याच मूर्तीची प्रतिष्ठापना मंडळाने केली असली तरी जगातील वेगवेगळ्या देशातील गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना, हे मंडळाचे आकर्षण ठरत असल्याचे अध्यक्ष प्रदीप जंगम यांनी सांगितले. तसेच केबीन रोडवरील जय अंबे नगर गणेश मित्र मंडळाने यंदा मातीच्याच मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून गतवर्षी या मंडळाने जेम्स या सुमारे २५ हजार चॉकलेटच्या गोळ्यांनी तयार केलेली मूर्ती साकारली होती. मंडळाने यंदा देशाच्या सीमारेषेचे रक्षण करणा-या सैनिकांच्या जीवनावर आधारीत देखावा चलचित्राद्वारे दाखविला आहे.  

मीरारोड येथील म्हाडा गृहसंकुल क्लस्टर तीनमधील स्वस्तिक संकुल सार्वजनिक गणेश मंडळाने यंदाही कागदापासून बनविलेली सुमारे ५ फुटी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. देखाव्यासाठी प्रदुषणाचा विषय निवडण्यात आला असून प्लास्टिक मुक्त संकल्पना राबविण्यात आली आहे. प्लास्टिकऐवजी कापड व कागदाच्या वस्तू वापरण्याची जनजागृती गणेशभक्तांत केली जात असल्याचे मंडळाचे पदाधिकारी अविनाश देगासकर यांनी सांगितले. भार्इंदर पश्चिमेकडील सिद्धी विनायक यंग स्टार गणेश मंडळ, विनायकनगर गणेश मंडळ, मोदी पटेल मार्ग गणेश मंडळ आदी मंडळांनी देखील शाडूच्या मातीपासून तयार करण्यात आलेल्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. यातील विनायक नगर गणेश मंडळाचे यंदा ४१ वे वर्ष असून प्रत्येक वर्षी मंडळाने इको फ्रेन्डली गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केल्याचे पदाधिकारी केहुल शाह यांनी सांगितले. अशा प्रकारच्या इको फ्रेन्डली मूर्ती आणखी काही सार्वजनिक गणेश मंडळांकडून प्रतिष्ठापित केल्या असून काही घरगुती गणेशमूर्तीही शाडूच्या मातीपासून तयार करण्यात आल्याचे दिसून आले. यंदाच्या गणेशोत्सवात सुमारे 25 हून अधिक गणेश मंडळांनी इको फ्रेन्डली गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केल्याचे मूर्तीकारांकडून सांगण्यात येत आहे. शाडूच्या मातीपासून मूर्ती बनविणारे काही मोजकेच मूर्तीकार शहरात असून ते सुद्धा ऑर्डरखेरीज मातीच्या मूर्ती बनवत नसल्याचे शाडूच्या मूर्ती घडविणारे गौतम बापट यांच्याकडून सांगण्यात आले. केवळ दोन फुटापर्यंतच्याच मूर्ती घरगुती गणेशोत्सवासाठी तयार करण्यात येत असून मोठ्या मूर्तींसाठी मात्र गणेशभक्तांना शहराबाहेरील मूर्तीकारांकडे ऑर्डर द्यावी लागत असल्याचे बापट यांनी सांगितले. याचप्रमाणे यंदाच्या गणेशोत्सवात अनेक गणेश मंडळांनी सामाजिक संदेशांवर भर देत भक्तांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. याखेरीज शहरात प्लास्टर ऑफ पॅरीस (पीओपी)च्या मूर्तींपासून जलप्रदुषण होत असतानाच गणेशमूर्तींना रत्नखड्यांची आभुषणांनी मढवल्याचे दिसून आले. विसर्जनानंतर पीओपी मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने जलप्रदुषण होत असताना त्यावरील रत्नखडेही पाण्यातील जलचरांच्या जीवावर बेतते. त्यामुळे अशा मूर्तींची प्रतिष्ठापना न करता शाडूची माती, कागद, हिरवळ, गवत, खाद्यपदार्थ वा अन्नधान्यांपासून तयार करण्यात आलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन पर्यावरणप्रेमी अ‍ॅड. किशोर सामंत यांनी गणेशभक्तांना केले आहे.  

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव