शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

भगर खा, फिट रहा !

By admin | Updated: October 17, 2016 00:30 IST

नवा ट्रेण्ड : ‘गुणकारी’ पदार्थांच्या प्रचारासाठी मोहीम

संजय पाठक  नाशिकसामान्यत: उपवासाच्या दिवशी साबुदाण्याच्या खिचडीला पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या भगरीचा देशपातळीवर वापर केवळ दोन टक्के आहे, तोही मोजक्या राज्यात. त्या पार्श्वभूमीवर आता भगरीचा केवळ उपवास नव्हे तर पोषक अन्न म्हणून वापर करण्यासाठी भगर उत्पादक सरसावले असून, भगरीचे आरोग्यदायी गुणांचा प्रचार करीत ‘भगर खा, फिट रहा’ असा सल्ला दिला जात आहे.द्राक्ष, वाइनसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक वायनरी आहेत, परंतु त्याचबरोबर देशात सर्वाधिक भगर उत्पादक नाशिकमध्ये असून, त्याविषयी कोणाला फारशी माहिती नाही. नाशिक मुळातच आदिवासी जिल्हा असून, जिल्ह्यातील आठ तालुके आदिवासीबहुल आहेत. साहजिक त्यांचे प्रमुख पीक असलेल्या वरईला फिनिशिंग करून भगर तयार केली जाते. नाशिकमध्ये ३५ भगर मिल असून, ९० टक्के भगर नाशिकमध्येच तयार होते. उपवासाला वापरली जाणारे हे जुने उत्पादन असले तरी जगन्नाथ-पुरीच्या यात्रेत प्रसाद म्हणून भगरीची खीर चाखणाऱ्या अनेकांना त्याचा उपवासात उपयोग होतो हे माहिती नाही. भगर म्हणजे वरईचा तांदूळ असा समज असल्याने दक्षिणेतील राज्यात भगर उपवसाला चालत नाही. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान हे भगरीचा वापर करणारे प्रमुख राज्य त्या खालोखाल पंजाब, हरियाणा आणि दिल्ली येथे भगर काही प्रमाणात वापरली जाते. अन्यत्र भगरीचा प्रचार-प्रसार झालेला नाही. आदिवासींना हक्काचे आर्थिक बळ देणाऱ्या भगरीचा उपवासाशीच संबंध जोडला जात असल्याने बहुधा भगरीपासून अन्य अनेक पदार्थ तयार करतात हे अनेकांना माहिती नाही. मात्र आता भगरीतील आरोग्यदायी गुण स्पष्ट करून त्याच्या प्रसारासाठी नाशिकची भगर असोसिएशन सरसावली आहे. भगर ग्लुटेनमुक्त असल्याने बेकरीच्या उत्पादनांसारखा ती अपायकारक नाही. तसेच त्यातील ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह आणि लठ्ठपणाची कौटुंबिक पार्श्वभूमी असणाऱ्यांना उपयुक्त ठरते, असे असोसिएशनचे म्हणणे आहे. मुळात भगर ही केवळ उपवासासाठीच वापरली जाते हा गैरसमज आहे. साबुदाण्यापेक्षा कैकपटीने चांगले पदार्थ भगरीपासून तयार केले जातात. त्यात भगरीची इडली, लाह्या, उत्तपा, पॅटिस, ठेपले, ढोकळा, थालीपीठ, लाडू, खीर आणि शिरा असे अनेक पदार्थ तयार होतात. त्याचा आता देशभरात विविध माध्यमांतून प्रसार सुरू आहे, असे नाशिक भगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र छोरिया यांनी सांगितले. ‘भगर खा, फिट’ रहा अशी चळवळ आता सुरू करण्यात आली असून, आहाराविषयी सजग असणाऱ्यांच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब असल्याचे ते म्हणाले.