शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
2
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
3
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
4
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
5
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
6
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
7
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
8
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
9
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
10
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
11
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
12
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
13
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
14
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
15
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
16
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
17
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
18
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
19
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दौंडचा पूर्व भाग पावसाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 10, 2016 01:16 IST

दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी नैर्ऋत्य मान्सून पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.

राजेगाव : दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी नैर्ऋत्य मान्सून पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. उजनी धरणाचे बॅक वॉटर म्हणजे या भागाला मिळालेले वरदान आहे. या पाण्यावरच हा भाग सुजलाम् सुफलाम् झाला आहे. परंतु, गेल्या ४२ वर्षांत राजेगावमध्ये कधीही न आटणारी भीमा नदीचे पात्र यंदा प्रथमच कोरडे पडले आहे. परिणामी, या परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वाढत्या उन्हामुळे जिवाची तगमग होत असल्याने या भागातील शेतकरी दमदार पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. शनिवार (दि. ४) या परिसरात थोडाफार बिगरमोसमी पाऊस पडला. परंतु, या पावसामुळे शेतीला फारसा काही दिलासा मिळाला नाही. या परिसरातील शेतकरी शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून प्रामुख्याने दुग्धव्यवसाय करत आलेला आहे. परंतु, तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने जनावरांना पाणी आणि चारा देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. दुष्काळामुळे पोटच्या पोरासारखं जीवापाड सांभाळलेले पशुधन मातीमोल किंमतीत विकण्याची दुर्देवी वेळ बळीराजाच्या नशिबी आली आहे. ७ जूनला मृग नक्षत्र सुरू झाले, की पाऊस पडल्यानंतर या परिसरातील कोरडवाहू शेतीत बाजरीचे पीक घेतले जाते. परंतु, गेली तीन-चार वर्षे मृग नक्षत्र कोरडेच गेल्याने या परिसरातील शेतकऱ्याला बाजरी पीक घेता आले नाही. यंदातरी मान्सून वेळेवर येईल आणि बाजरीची लागवड करता येईल, या आशेवर या भागातील शेतकरी आहे. सात दिवसांच्या विलंबाने का होईना, नैर्ऋत्य मान्सून केरळला पोहचला असून मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल वातावरण तयार झाल्याने शेतकरीवर्गाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. हा परिसर ऊस पिकाचे आगार मानला जातो. पाऊस पडल्यानंतर १ जुलैपासून या परिसरात प्रत्येक साखर कारखान्यांच्या धोरणानुसार आडसाली ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु, यंदा भीमा नदीच्या पात्रात पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्याने कृषीपंप गुंडाळून ठेवण्यात आले आहेत. शिवाय विहीरी आणि कुपनलिका हे पाण्याचे स्रोत केव्हाच आटून गेले आहेत. राजेगाव येथील शेतकरी गणेश मोरे आणि दीपक धापटे म्हणाले, की सध्या दुष्काळाने पाण्याचे सर्व जलस्रोत आटले आहेत. जनावरांना पाणी आणि चारा उपलब्ध होत नसल्याने दुग्धव्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे वरुणराजाने दिलासा दिला नाही तर शेतकरी उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.