शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

मिरज पूर्वमध्ये द्राक्षघडांची गळ वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2016 04:47 IST

यावर्षी झालेल्या सततच्या हवामान बदलाचा परिणाम द्राक्ष उत्पादनावर झाला आहे.

संजय माने,टाकळी- यावर्षी झालेल्या सततच्या हवामान बदलाचा परिणाम द्राक्ष उत्पादनावर झाला आहे. मिरज पूर्व भागातील सुमारे आठशे एकरमधील पूर्ण वाढ न झालेले द्राक्ष घड गळून पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखोचे नुकसान सहन करावे लागत आहे. एप्रिल व मे महिन्यामध्ये उन्हाळ्याची तीव्रता जास्त होती व त्यानंतर महिनाभर संततधार पाऊस झाल्यामुळे हवामानात अचानक होणाऱ्या बदलाने खरड छाटणीनंतर द्राक्ष काडीमध्ये तयार होणाऱ्या घडांना वाढीसाठी पोषक वातावरण मिळाले नाही. परिणामी येणारे द्राक्ष घड कुपोषित राहिले. फळ छाटणीनंतर येणाऱ्या द्राक्षघडांची पूर्ण वाढ न झाल्याने व कुपोषित राहिल्याने ते गळून पडत आहेत. एका वेलीस मार्केटिंगसाठी ५० ते ५५ द्राक्ष घड ठेवले जातात, तर बेदाण्यासाठी ७० ते ८० घड ठेवले जातात. मात्र यावर्षी खरड छाटणीपासून वातावरणात सततच्या होणाऱ्या बदलामुळे घडांची वाढ पूर्ण झाली नाही. त्यामुळे घड गळून पडत असल्याचे चित्र पूर्व भागातील सुमारे ८०० एकरामध्ये दिसत आहे. द्राक्ष घड गळून पडत असल्याने त्याची संख्या कमी होऊन झाडास केवळ १० ते १५ घड राहात आहेत. केवळ काडी हलवली तरी घड गळून पडत आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादनातही घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घड गळून पडू नयेत यासाठी शेतकऱ्यांकडून विविध उपाययोजना व औषधांची फवारणी सुरू आहे. मात्र त्याचाही उपयोग होताना दिसत नाही. उन्हाळ्यात उन्हाचे प्रमाण जास्त असल्याने व सततच्या होणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याच्या समस्येमुळे द्राक्ष वेलीची मूळकुज झाल्याने द्राक्ष घडांचे योग्य पोषण झाले नसल्याचे टाकळीतील द्राक्ष बागायतदार संजय पाटील यांनी सांगितले. याबाबत कृषी विभागाकडे योग्य मार्गदर्शन करणारी यंत्रणा नसल्याने द्राक्षबागायतदार चिंतेत आहे. >द्राक्ष उत्पादनात घट होण्याची शक्यतासतत अस्मानी संकटात सापडत असलेल्या द्राक्ष उत्पादकांची आर्थिक कोंडी होत आहे. अवकाळी पाऊस, रोगांचा प्रादुर्भाव, पाण्याची कमतरता अशा विविध संकटांत शेतकरी सापडत असतो, मात्र द्राक्ष घड गळून पडत असल्याने आणखी एका समस्येची भर पडली आहे. त्यामुळे येणाऱ्या हंगामात द्राक्ष उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.