शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मिरज पूर्वमध्ये द्राक्षघडांची गळ वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2016 04:47 IST

यावर्षी झालेल्या सततच्या हवामान बदलाचा परिणाम द्राक्ष उत्पादनावर झाला आहे.

संजय माने,टाकळी- यावर्षी झालेल्या सततच्या हवामान बदलाचा परिणाम द्राक्ष उत्पादनावर झाला आहे. मिरज पूर्व भागातील सुमारे आठशे एकरमधील पूर्ण वाढ न झालेले द्राक्ष घड गळून पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखोचे नुकसान सहन करावे लागत आहे. एप्रिल व मे महिन्यामध्ये उन्हाळ्याची तीव्रता जास्त होती व त्यानंतर महिनाभर संततधार पाऊस झाल्यामुळे हवामानात अचानक होणाऱ्या बदलाने खरड छाटणीनंतर द्राक्ष काडीमध्ये तयार होणाऱ्या घडांना वाढीसाठी पोषक वातावरण मिळाले नाही. परिणामी येणारे द्राक्ष घड कुपोषित राहिले. फळ छाटणीनंतर येणाऱ्या द्राक्षघडांची पूर्ण वाढ न झाल्याने व कुपोषित राहिल्याने ते गळून पडत आहेत. एका वेलीस मार्केटिंगसाठी ५० ते ५५ द्राक्ष घड ठेवले जातात, तर बेदाण्यासाठी ७० ते ८० घड ठेवले जातात. मात्र यावर्षी खरड छाटणीपासून वातावरणात सततच्या होणाऱ्या बदलामुळे घडांची वाढ पूर्ण झाली नाही. त्यामुळे घड गळून पडत असल्याचे चित्र पूर्व भागातील सुमारे ८०० एकरामध्ये दिसत आहे. द्राक्ष घड गळून पडत असल्याने त्याची संख्या कमी होऊन झाडास केवळ १० ते १५ घड राहात आहेत. केवळ काडी हलवली तरी घड गळून पडत आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादनातही घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घड गळून पडू नयेत यासाठी शेतकऱ्यांकडून विविध उपाययोजना व औषधांची फवारणी सुरू आहे. मात्र त्याचाही उपयोग होताना दिसत नाही. उन्हाळ्यात उन्हाचे प्रमाण जास्त असल्याने व सततच्या होणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याच्या समस्येमुळे द्राक्ष वेलीची मूळकुज झाल्याने द्राक्ष घडांचे योग्य पोषण झाले नसल्याचे टाकळीतील द्राक्ष बागायतदार संजय पाटील यांनी सांगितले. याबाबत कृषी विभागाकडे योग्य मार्गदर्शन करणारी यंत्रणा नसल्याने द्राक्षबागायतदार चिंतेत आहे. >द्राक्ष उत्पादनात घट होण्याची शक्यतासतत अस्मानी संकटात सापडत असलेल्या द्राक्ष उत्पादकांची आर्थिक कोंडी होत आहे. अवकाळी पाऊस, रोगांचा प्रादुर्भाव, पाण्याची कमतरता अशा विविध संकटांत शेतकरी सापडत असतो, मात्र द्राक्ष घड गळून पडत असल्याने आणखी एका समस्येची भर पडली आहे. त्यामुळे येणाऱ्या हंगामात द्राक्ष उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.