शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मिरज पूर्वमध्ये द्राक्षघडांची गळ वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2016 04:47 IST

यावर्षी झालेल्या सततच्या हवामान बदलाचा परिणाम द्राक्ष उत्पादनावर झाला आहे.

संजय माने,टाकळी- यावर्षी झालेल्या सततच्या हवामान बदलाचा परिणाम द्राक्ष उत्पादनावर झाला आहे. मिरज पूर्व भागातील सुमारे आठशे एकरमधील पूर्ण वाढ न झालेले द्राक्ष घड गळून पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखोचे नुकसान सहन करावे लागत आहे. एप्रिल व मे महिन्यामध्ये उन्हाळ्याची तीव्रता जास्त होती व त्यानंतर महिनाभर संततधार पाऊस झाल्यामुळे हवामानात अचानक होणाऱ्या बदलाने खरड छाटणीनंतर द्राक्ष काडीमध्ये तयार होणाऱ्या घडांना वाढीसाठी पोषक वातावरण मिळाले नाही. परिणामी येणारे द्राक्ष घड कुपोषित राहिले. फळ छाटणीनंतर येणाऱ्या द्राक्षघडांची पूर्ण वाढ न झाल्याने व कुपोषित राहिल्याने ते गळून पडत आहेत. एका वेलीस मार्केटिंगसाठी ५० ते ५५ द्राक्ष घड ठेवले जातात, तर बेदाण्यासाठी ७० ते ८० घड ठेवले जातात. मात्र यावर्षी खरड छाटणीपासून वातावरणात सततच्या होणाऱ्या बदलामुळे घडांची वाढ पूर्ण झाली नाही. त्यामुळे घड गळून पडत असल्याचे चित्र पूर्व भागातील सुमारे ८०० एकरामध्ये दिसत आहे. द्राक्ष घड गळून पडत असल्याने त्याची संख्या कमी होऊन झाडास केवळ १० ते १५ घड राहात आहेत. केवळ काडी हलवली तरी घड गळून पडत आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादनातही घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घड गळून पडू नयेत यासाठी शेतकऱ्यांकडून विविध उपाययोजना व औषधांची फवारणी सुरू आहे. मात्र त्याचाही उपयोग होताना दिसत नाही. उन्हाळ्यात उन्हाचे प्रमाण जास्त असल्याने व सततच्या होणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याच्या समस्येमुळे द्राक्ष वेलीची मूळकुज झाल्याने द्राक्ष घडांचे योग्य पोषण झाले नसल्याचे टाकळीतील द्राक्ष बागायतदार संजय पाटील यांनी सांगितले. याबाबत कृषी विभागाकडे योग्य मार्गदर्शन करणारी यंत्रणा नसल्याने द्राक्षबागायतदार चिंतेत आहे. >द्राक्ष उत्पादनात घट होण्याची शक्यतासतत अस्मानी संकटात सापडत असलेल्या द्राक्ष उत्पादकांची आर्थिक कोंडी होत आहे. अवकाळी पाऊस, रोगांचा प्रादुर्भाव, पाण्याची कमतरता अशा विविध संकटांत शेतकरी सापडत असतो, मात्र द्राक्ष घड गळून पडत असल्याने आणखी एका समस्येची भर पडली आहे. त्यामुळे येणाऱ्या हंगामात द्राक्ष उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.