शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

दसरा मेळाव्याला बीकेसीत ३ लाख गर्दी जमेल; मंत्री दीपक केसरकरांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 13:14 IST

दसरा मेळाव्यात कुठलाही अनुसुचित प्रकार घडणार नाही याबाबत पोलीस काळजी घेतील असं केसरकर म्हणाले.

मुंबई - कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. हायकोर्टानं दिलेल्या निर्देशाचं पालन होईल यासाठी पोलीस तत्पर असतील. अडीच ते ३ लाखापेक्षा जास्त लोक बीकेसीत दसरा मेळाव्याला येतील. खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा, बाळासाहेबांचा जो विचार होतो त्याचं संबोधन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील. असंख्य नागरिक एकनाथ शिंदे यांचे स्वागत करण्यासाठी जमतील असा विश्वास मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. 

दीपक केसरकर म्हणाले की, दसरा मेळाव्याला कोल्हापूरात महालक्ष्मीची पालखी निघते, जुन्या राजवाड्यातून शाही घराण्याची मिरवणूक निघून दसरा साजरा केला जातो. कोल्हापूरच्या दसरा प्रथेला राज्याचा दर्जा घेऊन शाही घराण्यासोबत मिळून राज्य सरकार साजरा करेल. संपूर्ण भारतासमोर आणि जगात हा मेळावा साजरा होईल यासाठी प्रयत्न आहे. छत्रपती शिवरायांनी सुरू केलेली परंपरा कायम राहील असंही त्यांनी सांगितले. 

तसेच दसरा मेळाव्यात कुठलाही अनुसुचित प्रकार घडणार नाही याबाबत पोलीस काळजी घेतील. सर्वांनी लवकर सभास्थानी पोहचणं गरजेचे आहे. पार्किंगला वाहनं लावून ५-१० मिनिटे चालत सभास्थानी पोहचता येणार आहे. बीकेसीतील मेळावा अतिविराट होईल. बाळासाहेबांच्या विचारांचं सोनं सभेत लुटलं जाईल. राज्यातील जनता आशेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे बघतेय. एकनाथ शिंदेंचे विचार ऐकण्यासाठी लोकं जमतील असं दीपक केसरकर म्हणाले. 

दसरा मेळाव्यात विचार नाही तर...दसरा मेळाव्यात आता पहिल्यांदा कुणाकडे डोकी जास्त आहेत त्यावरून खरी सेना कुणाची हे ठरणार. यंदाच्या दसरा मेळाव्यात विचार ऐकायला मिळणार नाही. एकमेकांचे वस्त्रहरण करणार आहेत. सोनं लुटण्याऐवजी अंगावरच्या चिंध्या गोळा कराव्या लागतील. मेळावे यशस्वी होण्याऐवजी यामागे असणारी जी शक्ती आहे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवतीर्थावरील मेळावा यशस्वी झाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा जाणार आहे. यशस्वी झाला तर राहिलेल्या शिवसैनिकांचे मनोध्यैर्य वाढणार आहे त्याचसोबत बीकेसीतील मेळावा यशस्वी झाला नाही तर भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागेल. त्यामुळे मेळावे यशस्वी करण्याची गरज संयोजक, आयोजकांपेक्षा इतरांना जास्त आहे अशा शब्दात मनसेने शिंदे-ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यावर टीकास्त्र सोडलं आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे