शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

कारवायांचा सुकाळ... शिक्षा अनिश्चित

By admin | Updated: July 5, 2015 01:37 IST

गेल्या दोन महिन्यांत केंद्र व राज्य शासनाच्या अंतर्गत येणारे सर्वच विभाग अहोरात्र काम करीत असल्याचे तूर्तास तरी चित्र आहे. पण या कामगिरीनंतर पुढे काय, या प्रश्नाचे उत्तर केवळ ‘वाट बघा’

- अमर मोहिते

गेल्या दोन महिन्यांत केंद्र व राज्य शासनाच्या अंतर्गत येणारे सर्वच विभाग अहोरात्र काम करीत असल्याचे तूर्तास तरी चित्र आहे. पण या कामगिरीनंतर पुढे काय, या प्रश्नाचे उत्तर केवळ ‘वाट बघा’ असे असू शकेल. कारण मॅगी असो वा माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या घरावरील छापे किंवा बेबी पाटणकर प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांची अटक, या सर्व कामगिरीने प्रत्येक विभागाने आपली पाठ थोपटून घेतली. मात्र यातील प्रत्येक आरोपीला शिक्षा होईल का? व झाली तरी किती वर्षांची असेल; की शिक्षा होणारच नाही, याचा दावा करण्याइतपत धाडस किंवा आत्मविश्वास सध्यातरी कोणत्याच विभागाकडे नाही. इतकेच काय मुख्यमंत्री, गृहमंत्रीही शिक्षेचे भाकीत करू शकणार नाहीत.गेली ३० वर्षे झोपडीपासून बंगल्यापर्यंत प्रत्येक किचनमध्ये दोन मिनिटांत तयार होणारी मॅगी मानवी शरीरासाठी हानिकारक असल्याचा शोध एका अन्न निरीक्षक अधिकाऱ्याने दीड वर्षाच्या अथक परिश्रमाने लावला; आणि त्यानंतर तो अधिकारी पडद्यावर आलाच नाही. तशी खंतही त्याने जाहीरपणे व्यक्त केली. पण अन्न दर्जा व सुरक्षा प्राधिकरण तत्परतेने कामाला लागले. याआधी हे प्राधिकरण नेमके कशासाठी आहे व काय करते हेही कोणाला माहिती नसेल. असे असेल तरी या विभागाने मॅगीवर बंदी आणण्यापासून नेस्ले कंपनीविरोधात केंद्रीय ग्राहक पंचायतकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ भाजपा प्रणीत राज्यांनी मॅगीवर बंदी आणून पाठ थोपटवून घेतली. पण या कारवाईचे पुढे काय, हा प्रश्न सध्या अनुत्तरितच आहे. कारण अद्याप ग्राहक पंचायतकडे मॅगीची रीतसर तक्रार दाखल झालेली नाही. तक्रार झालीच तरी नैसर्गिक न्यायदान प्रणालीने याचा निकाल किती वर्षांत येईल व नेस्लेला किती दंड ठोठावला जाईल, हे अनिश्चितच आहे. हे प्रकरण तातडीने निकाली काढले जाईल, अशी घोषणा करायची तसदी सरकारने घेतली नाही.अशाच एका प्रकरणाने मुंबई पोलीस खाते हादरले. ही कारवाई होती गुन्हे शाखेची... ड्रगमाफिया बेबी पाटणकरची अटक टाळण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी मदत केल्याचा गंभीर आरोप करत गुन्हे शाखेने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास गोखले, पोलीस निरीक्षक गौतम गायकवाड व इतर तीन अधिकाऱ्यांना अटक केली. मात्र हे सर्व प्रकरण ज्या मुख्य कारवाईने उघडकीस आले, त्यात पोलिसांच्या हाती लागलेली पांढरी भुकटी एमडी नसल्याचा अहवाल मुंबई फॉरेन्सिक लॅबने दिला. त्यामुळे गुन्हे शाखेची चांगलीच फजिती झाली. आता यावर सारवासारव करत गुन्हे शाखेने या पांढऱ्या भुकटीचे नमुने हैदराबाद येथील फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी मुंबईतील फॉरेन्सिक लॅबचा रोषही ओढवून घेतला. आता पहिल्याच कारवाईत गुन्हे शाखा तोंडघशी पडल्याने या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे शाखेने केलेले आरोप भविष्यात सिद्ध होतील की नाही, असा प्रश्न आहे. आणि गुन्हे शाखाही केवळ आमच्याकडे पुरावे आहेत, असाच दावा करत आहे. हे पुरावे म्हणजे हे अधिकारी बेबीच्या संपर्कात होते, याला पुष्टी देणारे कॉल रेकॉर्ड्स. त्यामुळे गुन्हे शाखा या अधिकाऱ्यांचा गुन्हा सिद्ध करू शकेल का, हे आत्ताच सांगणे कठीण आहे.यापुढील कारवाई म्हणजे माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या मालमत्तेवर एसीबीने टाकलेले छापे. इतक्या जलदगतीने हे छापे पडले की स्वत: भुजबळही आश्चर्यचकित झाले. पण आपल्या मालमत्तेची मोजणी करण्यात एसीबीने केलेली एकच चूक पकडून त्यांनी सगळी कारवाईच उधळून लावल्याचे नाटक सफाईदारपणे केले. ही कारवाई जलदगतीने झाली असली तरी प्रत्यक्षात याचा खटला कधी सुरू होईल व भुजबळांना शिक्षा होईल का? असा दावा ना या विभागाने केला, ना सत्ताधाऱ्यांनी. त्यामुळे भुजबळांवरील कारवाईचे भवितव्य अनिश्चित म्हणावे लागेल. या यादीत विद्यमान मंत्री पंकजा मुंडेही यांचीही वर्णी लागण्याची शक्यता आहे. या यादीतील नावे वाढतील, असा दावा सध्या सत्ताधारी करीत आहेत. याआधीच्या कारवाईचा आलेख बघितला तर मालेगाव बॉम्ब ब्लास्टचा खटला किंवा आदर्श घोटाळा यांसारखे बहुचर्चित खटले अजून सुरूच झालेले नाहीत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत झालेल्या कारवाईचीही अशीच अवस्था भविष्यात होईल, यात शंका नसावी.