शहरं
Join us  
Trending Stories
1
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, दुबार मतदारावरही उचललं पाऊल
2
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
3
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
4
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
5
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
6
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
7
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
8
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
10
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
11
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
12
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
13
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
14
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
15
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
16
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
17
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
18
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
19
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
20
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर

डुंगीपाड्यामध्ये दुसऱ्या दिवशीही पाडकाम

By admin | Updated: May 21, 2016 04:04 IST

सरकारी व आदिवासी जमीनीवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत अतिक्रमणा विरोधातीलआली मोहीम शुक्रवारी दुसऱ्या दिवशी ही तिव्र केली

पालघर : पालघर नगरपरिषदेने सरकारी व आदिवासी जमीनीवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत अतिक्रमणा विरोधातीलआली मोहीम शुक्रवारी दुसऱ्या दिवशी ही तिव्र केली आहे. डुंगीपाडयातील सुमारे दिडचशेच्यावर चाळीतील रूम जमीनदोस्त करण्यात आले. मागील दोन वर्षापासून नगरपरिषद हद्दीत अतिक्रमणे जोरात वाढत असताना त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करणाऱ्या नगर पालिकेने उच्चन्यायालयाच्या आदेशानंतर या कारवाया सुरू केल्या आहेत.पालघर नगरपरिषद हद्दीतील डुंगीपाडा येथील आदिवासींच्या जमीनीवर बेकायेदेशीरपणे उभारलेल्या सात चाळीमधील खोल्यावर नगरपरिषदेने गुरुवारी बुलडोझर फिरविल्यानंतर सेंटजॉर्ज कॉलेजच्या मागे उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर जेसीबी फिरवून तेथील साधारणपणे दोनशे खोल्या जमीदोस्त करण्यात आल्याची माहीती नगरपरिषद प्रशासनाने दिली. गुरुवारी डुंगीपाडयामध्ये गरीबांच्या बांधकामावर कुठलीही पुर्व कल्पना न देता कारवाई करण्यात आल्याने सामान बाहेर काढण्याची संधीही काहिंना मिळाली नव्हती. यावेळी सर्वत्र एकच आक्रोश रडारड, पळापळ सुरू होती. यावेळी कारवाई करताना आमची घरे जर अनधिकृत असती तर नगरपरिषद प्रशासनाने ती बांधण्यापूर्वीच कारवाई करायला हवी होती. यावर त्यांनी दहा हजार रूपये स्विकारून अनधिकृतपणाचा शिक्का, घरपट्टीच्या पावतीवर देऊन या अनधिकृत बांधकामान एकाप्रकारे पाठबळच दिल्याच्या प्रतिक्रया या वेळी लोकामधुन उमटत होत्या. यावेळी आपल्या घरावर कारवाई होत असेत तर सेंट जॉर्ज कॉलेजच्या मागे असलेल्या चाळीवर कारवाई करण्याची मागणी मान्य करुन नगरपरिषदेने गुरुवारी संध्याकाळी त्या चाळीही जमीनदोस्त केल्या.गुरुवारी झालेल्या कारवाई दरम्यान, पोलीसांनी हुज्जत घालुन दगडफेक करण्याच्या पावित्र्यात उभ्या असलेल्या जमावाला पांगवुन तीघांना ताब्यात घेतले होते. शुक्रवारी पुन्हा दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास डुंगीपाडयातील सुमारे दिडशे खोल्या सहा जेसीबीच्या सहाय्याने जमीन दोस्त करण्यात आल्या यावेळी पालघर पोलीस स्टशनचे प्रभारी अधिकारी दिपक साहुंखे, अजय जगताप यांच्यासह शेकडो पोलीस व दंगलग्रस्त नियंत्रण पथकाचे कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)>जिल्हाधिकाऱ्यांना नागरिक ांचा सवाल या कारवाईमध्ये पाणीपुरी, वडापाव, भाजीपाला विक्रेते, कारखान्यातील कामगार यांनी आयुष्यभरची कमाई लाऊन घेतलेली घरे कोसळत असतांना होणारा आक्रोश मन सुन्न करीत होता. एका ठिकाणी ही घरे अनधिकृत बांधकामे ठरवून तोडली जात असताना ज्यांच्या आशिर्वादाने ही अनधिकृत बांधकामे राजरोजपणे उभी आहेत त्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे धाडस जिल्हाधिकारी बांगर दाखवणार आहेत काय? असा सवाल होत आहे.