शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

भाकरीसाठी भटकंती; चंद्रपूर जिल्ह्यातील गावे ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 11:11 IST

निसर्गाचा कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळाने दरवर्षीच काळवंडलेल्या शेतकऱ्यांना यावर्षीही निसर्गाचा फटका बसला. हिरवीगार झालेली पिके करपून गेली.

ठळक मुद्देदिवाळीपूर्वीच स्थलांतर : भयंकर दुष्काळ तरी यादीत नाव नाही

शंकर चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: निसर्गाचा कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळाने दरवर्षीच काळवंडलेल्या शेतकऱ्यांना यावर्षीही निसर्गाचा फटका बसला. हिरवीगार झालेली पिके करपून गेली. आता शेतीसाठी काढलेले कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांवर ऊसतोड मजूर म्हणून चक्क दिवाळीपूर्वीच गाव सोडण्याची पाळी आली आहे. दरवर्षीच्या तुलनेत ऊसतोडीसाठी जाणाऱ्या मजुराच्या संख्येत वाढ झाली असून दिवाळीला झगमगणारी गावेही दिवाळीपूर्वीच ओसाड दिसत आहे.अतिदुर्गम जिवती तालुक्यात संपूर्ण कोरडवाहू शेतकरी असून निसर्गाच्या भरवशावर शेती करून संसाराचा उदरनिर्वाह करतात. मागील वर्षी उत्पादनात झालेली घट यंदाच्या खरीप हंगामात भरून निघेल, या आशेने मोठ्या जोमाने खरीप हंगामाची लागवड केली. सुरूवातीचा समाधानकारक पाऊस अन नंतर पडलेला उघाड, यामुळे फुलोऱ्यात आलेली पिके करपली. अल्पावधीतच शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. आता करायचे कसे? शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडायचे कसे? यावर्षी सावकरी कर्ज व बॅक कर्ज फेडले नाही तर पुढच्या वर्षी कर्ज मिळणार नाही. या भीतीपोटी शेतकरी ऊसतोड मजूर म्हणून स्थलांतरीत झाले आहेत.दरवर्षी आनंदाने घरी दिवाळी साजरी करून मग रोजगाराच्या शोधात भटकंती करायची. मात्र यावर्षी त्या शेतकऱ्यांना दिवाळी ऊसाच्या फडातच साजरी करावी लागणार आहे. कामाच्या शोधात मराठवाड्यातून स्थलांतरित होऊन जिवती तालुक्यात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचा शोध अजूनही संपलेला दिसत नाही.एकीकडे शासन मागेल त्याला काम व कामानुसार दाम मिळेल, असा नारा वाजवित असले तरी प्रत्यक्षात अजूनही रोजगार हमी योजनेचा श्रीगणेशा झाला नाही. त्यामुळे पहाडावरील मजुरांना वर्षानुवर्षे रोजगाराच्या शोधात गाव सोडण्याची पाळी येते. यावेळी तर ऐन दिवाळीतच शेतकऱ्यांना गाव सोडावे लागत आहे.

भयंकर दुष्काळसुरूवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने पहाडावरील कोरडवाहू शेतकरी आनंदी झाला होता. परंतु नंतरच्या परतीच्या पावसाने सतत उघाड दिल्याने खरीप हंगामातील कापूस पिकावर लाल्या रोग पडून पीक करपले. मागील वर्षीच्या तुलनेत उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. असे असतानाही शासनाने जिवती तालुक्यात पाऊस झाल्याच्या कारणावरून जिवती तालुक्याचे नाव दुष्काळी यादीतून वगळले गेल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी