शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

भाकरीसाठी भटकंती; चंद्रपूर जिल्ह्यातील गावे ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 11:11 IST

निसर्गाचा कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळाने दरवर्षीच काळवंडलेल्या शेतकऱ्यांना यावर्षीही निसर्गाचा फटका बसला. हिरवीगार झालेली पिके करपून गेली.

ठळक मुद्देदिवाळीपूर्वीच स्थलांतर : भयंकर दुष्काळ तरी यादीत नाव नाही

शंकर चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: निसर्गाचा कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळाने दरवर्षीच काळवंडलेल्या शेतकऱ्यांना यावर्षीही निसर्गाचा फटका बसला. हिरवीगार झालेली पिके करपून गेली. आता शेतीसाठी काढलेले कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांवर ऊसतोड मजूर म्हणून चक्क दिवाळीपूर्वीच गाव सोडण्याची पाळी आली आहे. दरवर्षीच्या तुलनेत ऊसतोडीसाठी जाणाऱ्या मजुराच्या संख्येत वाढ झाली असून दिवाळीला झगमगणारी गावेही दिवाळीपूर्वीच ओसाड दिसत आहे.अतिदुर्गम जिवती तालुक्यात संपूर्ण कोरडवाहू शेतकरी असून निसर्गाच्या भरवशावर शेती करून संसाराचा उदरनिर्वाह करतात. मागील वर्षी उत्पादनात झालेली घट यंदाच्या खरीप हंगामात भरून निघेल, या आशेने मोठ्या जोमाने खरीप हंगामाची लागवड केली. सुरूवातीचा समाधानकारक पाऊस अन नंतर पडलेला उघाड, यामुळे फुलोऱ्यात आलेली पिके करपली. अल्पावधीतच शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. आता करायचे कसे? शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडायचे कसे? यावर्षी सावकरी कर्ज व बॅक कर्ज फेडले नाही तर पुढच्या वर्षी कर्ज मिळणार नाही. या भीतीपोटी शेतकरी ऊसतोड मजूर म्हणून स्थलांतरीत झाले आहेत.दरवर्षी आनंदाने घरी दिवाळी साजरी करून मग रोजगाराच्या शोधात भटकंती करायची. मात्र यावर्षी त्या शेतकऱ्यांना दिवाळी ऊसाच्या फडातच साजरी करावी लागणार आहे. कामाच्या शोधात मराठवाड्यातून स्थलांतरित होऊन जिवती तालुक्यात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचा शोध अजूनही संपलेला दिसत नाही.एकीकडे शासन मागेल त्याला काम व कामानुसार दाम मिळेल, असा नारा वाजवित असले तरी प्रत्यक्षात अजूनही रोजगार हमी योजनेचा श्रीगणेशा झाला नाही. त्यामुळे पहाडावरील मजुरांना वर्षानुवर्षे रोजगाराच्या शोधात गाव सोडण्याची पाळी येते. यावेळी तर ऐन दिवाळीतच शेतकऱ्यांना गाव सोडावे लागत आहे.

भयंकर दुष्काळसुरूवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने पहाडावरील कोरडवाहू शेतकरी आनंदी झाला होता. परंतु नंतरच्या परतीच्या पावसाने सतत उघाड दिल्याने खरीप हंगामातील कापूस पिकावर लाल्या रोग पडून पीक करपले. मागील वर्षीच्या तुलनेत उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. असे असतानाही शासनाने जिवती तालुक्यात पाऊस झाल्याच्या कारणावरून जिवती तालुक्याचे नाव दुष्काळी यादीतून वगळले गेल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी