शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

भाकरीसाठी भटकंती; चंद्रपूर जिल्ह्यातील गावे ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 11:11 IST

निसर्गाचा कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळाने दरवर्षीच काळवंडलेल्या शेतकऱ्यांना यावर्षीही निसर्गाचा फटका बसला. हिरवीगार झालेली पिके करपून गेली.

ठळक मुद्देदिवाळीपूर्वीच स्थलांतर : भयंकर दुष्काळ तरी यादीत नाव नाही

शंकर चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: निसर्गाचा कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळाने दरवर्षीच काळवंडलेल्या शेतकऱ्यांना यावर्षीही निसर्गाचा फटका बसला. हिरवीगार झालेली पिके करपून गेली. आता शेतीसाठी काढलेले कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांवर ऊसतोड मजूर म्हणून चक्क दिवाळीपूर्वीच गाव सोडण्याची पाळी आली आहे. दरवर्षीच्या तुलनेत ऊसतोडीसाठी जाणाऱ्या मजुराच्या संख्येत वाढ झाली असून दिवाळीला झगमगणारी गावेही दिवाळीपूर्वीच ओसाड दिसत आहे.अतिदुर्गम जिवती तालुक्यात संपूर्ण कोरडवाहू शेतकरी असून निसर्गाच्या भरवशावर शेती करून संसाराचा उदरनिर्वाह करतात. मागील वर्षी उत्पादनात झालेली घट यंदाच्या खरीप हंगामात भरून निघेल, या आशेने मोठ्या जोमाने खरीप हंगामाची लागवड केली. सुरूवातीचा समाधानकारक पाऊस अन नंतर पडलेला उघाड, यामुळे फुलोऱ्यात आलेली पिके करपली. अल्पावधीतच शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. आता करायचे कसे? शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडायचे कसे? यावर्षी सावकरी कर्ज व बॅक कर्ज फेडले नाही तर पुढच्या वर्षी कर्ज मिळणार नाही. या भीतीपोटी शेतकरी ऊसतोड मजूर म्हणून स्थलांतरीत झाले आहेत.दरवर्षी आनंदाने घरी दिवाळी साजरी करून मग रोजगाराच्या शोधात भटकंती करायची. मात्र यावर्षी त्या शेतकऱ्यांना दिवाळी ऊसाच्या फडातच साजरी करावी लागणार आहे. कामाच्या शोधात मराठवाड्यातून स्थलांतरित होऊन जिवती तालुक्यात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचा शोध अजूनही संपलेला दिसत नाही.एकीकडे शासन मागेल त्याला काम व कामानुसार दाम मिळेल, असा नारा वाजवित असले तरी प्रत्यक्षात अजूनही रोजगार हमी योजनेचा श्रीगणेशा झाला नाही. त्यामुळे पहाडावरील मजुरांना वर्षानुवर्षे रोजगाराच्या शोधात गाव सोडण्याची पाळी येते. यावेळी तर ऐन दिवाळीतच शेतकऱ्यांना गाव सोडावे लागत आहे.

भयंकर दुष्काळसुरूवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने पहाडावरील कोरडवाहू शेतकरी आनंदी झाला होता. परंतु नंतरच्या परतीच्या पावसाने सतत उघाड दिल्याने खरीप हंगामातील कापूस पिकावर लाल्या रोग पडून पीक करपले. मागील वर्षीच्या तुलनेत उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. असे असतानाही शासनाने जिवती तालुक्यात पाऊस झाल्याच्या कारणावरून जिवती तालुक्याचे नाव दुष्काळी यादीतून वगळले गेल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी