शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

सहिष्णुतेमुळेच मानवी हक्कांचे रक्षण होईल

By admin | Updated: December 11, 2015 01:58 IST

राज्याचा समतोल विकास साधताना समाजातील प्रत्येक घटकाला जगण्याची आणि विकासाची समान संधी मिळायला हवी. प्रत्येकाने एकमेकांशी वागताना सहिष्णुता बाळगली

मुंबई : राज्याचा समतोल विकास साधताना समाजातील प्रत्येक घटकाला जगण्याची आणि विकासाची समान संधी मिळायला हवी. प्रत्येकाने एकमेकांशी वागताना सहिष्णुता बाळगली, तर मानवी हक्कांचे योग्य संरक्षण होईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गुरुवारी केले. मानवी हक्क संरक्षण दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. राज्य मानवी हक्क आयोगाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्यपाल म्हणाले की, ‘मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी मानवी हक्कांची आवश्यकता आहे. मूल्यवर्धीत शिक्षण व्यवस्थेने असा सर्वांगीण विकास साधता येईल. गरिबी हा समाजातील मानवी हक्कांची पायमल्ली करणारा सर्वात मोठा अडथळा आहे. गरिबीचे मुळापासून उच्चाटन करणे, हे आपले प्राथमिक कर्तव्य असले पाहिजे. जेणेकरून प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजा पूर्ण होतील. असंघटित क्षेत्रातील कामगार, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुली आणि महिला यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केल्यास खऱ्या अर्थाने मानवी हक्कांची जोपासना होईल,’ असे सांगून ते पुढे म्हणाले की, ‘जगातील मानवतावादाला सुरक्षा महत्त्वाची असून, मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी संयुक्त नीतीचा वापर करावा लागेल.>>>> हवामानातील अनियमितता, नैसर्गिक आपत्ती, जागतिक वातावरणतील बदल, यांचा मानवी जीवनावर विपरित परिणाम होत आहे. चेन्नईमध्ये होणारी अतिवृष्टी आणि मराठवाड्यातील कोरडा दुष्काळ, यासारख्या नैसर्गिक आपत्ती या मानवासमोरील खूप मोठे आव्हान आहे. या समस्यांना तोड देण्यासाठी मानवी मूल्यांची जोपासना करणे ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मानवी हक्क संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात उपस्थितांनी प्रतिज्ञा करत शपथ घेतली.