शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

सहिष्णुतेमुळेच मानवी हक्कांचे रक्षण होईल

By admin | Updated: December 11, 2015 01:58 IST

राज्याचा समतोल विकास साधताना समाजातील प्रत्येक घटकाला जगण्याची आणि विकासाची समान संधी मिळायला हवी. प्रत्येकाने एकमेकांशी वागताना सहिष्णुता बाळगली

मुंबई : राज्याचा समतोल विकास साधताना समाजातील प्रत्येक घटकाला जगण्याची आणि विकासाची समान संधी मिळायला हवी. प्रत्येकाने एकमेकांशी वागताना सहिष्णुता बाळगली, तर मानवी हक्कांचे योग्य संरक्षण होईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गुरुवारी केले. मानवी हक्क संरक्षण दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. राज्य मानवी हक्क आयोगाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्यपाल म्हणाले की, ‘मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी मानवी हक्कांची आवश्यकता आहे. मूल्यवर्धीत शिक्षण व्यवस्थेने असा सर्वांगीण विकास साधता येईल. गरिबी हा समाजातील मानवी हक्कांची पायमल्ली करणारा सर्वात मोठा अडथळा आहे. गरिबीचे मुळापासून उच्चाटन करणे, हे आपले प्राथमिक कर्तव्य असले पाहिजे. जेणेकरून प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजा पूर्ण होतील. असंघटित क्षेत्रातील कामगार, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुली आणि महिला यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केल्यास खऱ्या अर्थाने मानवी हक्कांची जोपासना होईल,’ असे सांगून ते पुढे म्हणाले की, ‘जगातील मानवतावादाला सुरक्षा महत्त्वाची असून, मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी संयुक्त नीतीचा वापर करावा लागेल.>>>> हवामानातील अनियमितता, नैसर्गिक आपत्ती, जागतिक वातावरणतील बदल, यांचा मानवी जीवनावर विपरित परिणाम होत आहे. चेन्नईमध्ये होणारी अतिवृष्टी आणि मराठवाड्यातील कोरडा दुष्काळ, यासारख्या नैसर्गिक आपत्ती या मानवासमोरील खूप मोठे आव्हान आहे. या समस्यांना तोड देण्यासाठी मानवी मूल्यांची जोपासना करणे ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मानवी हक्क संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात उपस्थितांनी प्रतिज्ञा करत शपथ घेतली.