शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

सहिष्णुतेमुळेच मानवी हक्कांचे रक्षण होईल

By admin | Updated: December 11, 2015 01:58 IST

राज्याचा समतोल विकास साधताना समाजातील प्रत्येक घटकाला जगण्याची आणि विकासाची समान संधी मिळायला हवी. प्रत्येकाने एकमेकांशी वागताना सहिष्णुता बाळगली

मुंबई : राज्याचा समतोल विकास साधताना समाजातील प्रत्येक घटकाला जगण्याची आणि विकासाची समान संधी मिळायला हवी. प्रत्येकाने एकमेकांशी वागताना सहिष्णुता बाळगली, तर मानवी हक्कांचे योग्य संरक्षण होईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गुरुवारी केले. मानवी हक्क संरक्षण दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. राज्य मानवी हक्क आयोगाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्यपाल म्हणाले की, ‘मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी मानवी हक्कांची आवश्यकता आहे. मूल्यवर्धीत शिक्षण व्यवस्थेने असा सर्वांगीण विकास साधता येईल. गरिबी हा समाजातील मानवी हक्कांची पायमल्ली करणारा सर्वात मोठा अडथळा आहे. गरिबीचे मुळापासून उच्चाटन करणे, हे आपले प्राथमिक कर्तव्य असले पाहिजे. जेणेकरून प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजा पूर्ण होतील. असंघटित क्षेत्रातील कामगार, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुली आणि महिला यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केल्यास खऱ्या अर्थाने मानवी हक्कांची जोपासना होईल,’ असे सांगून ते पुढे म्हणाले की, ‘जगातील मानवतावादाला सुरक्षा महत्त्वाची असून, मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी संयुक्त नीतीचा वापर करावा लागेल.>>>> हवामानातील अनियमितता, नैसर्गिक आपत्ती, जागतिक वातावरणतील बदल, यांचा मानवी जीवनावर विपरित परिणाम होत आहे. चेन्नईमध्ये होणारी अतिवृष्टी आणि मराठवाड्यातील कोरडा दुष्काळ, यासारख्या नैसर्गिक आपत्ती या मानवासमोरील खूप मोठे आव्हान आहे. या समस्यांना तोड देण्यासाठी मानवी मूल्यांची जोपासना करणे ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मानवी हक्क संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात उपस्थितांनी प्रतिज्ञा करत शपथ घेतली.