शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 05:16 IST

हवामान खात्याने उत्तर मध्य महाराष्ट्राला शुक्रवारीही दिलेला थंडीच्या लाटेचा इशारा कायम आहे. 

मुंबई - उत्तर पूर्व दिशेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यासह मुंबईत किमान तापमानाचा पारा घसरला आहे. डिसेंबरमध्ये हुडहुडी भरविणारी थंडी पडते. मात्र, यंदा नोव्हेंबरमध्येच थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. तीन दिवसांपासून अनेक शहरांचे किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या खाली नोंदविले जात आहे. पुढील दोन दिवस किमान तापमान खाली राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.

गेल्या दोन दिवसांपासून उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात बऱ्यापैकी घट झाली आहे. तेथील बऱ्याच जिल्ह्यांचे किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली नोंदविण्यात येत आहे. हवामान खात्याने उत्तर मध्य महाराष्ट्राला शुक्रवारीही दिलेला थंडीच्या लाटेचा इशारा कायम आहे. 

चक्रीवादळामुळे वाढ?

मुंबईच्या किमान तापमानात दोन दिवसांनी वाढ होण्यास सुरुवात होईल. दक्षिण भारतात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून ही वाढ नोंदवली जाईल. या काळात थंडीचा जोर ओसरेल. ७ डिसेंबरनंतर पुन्हा खाली घसरण्यास सुरुवात होईल आणि एकदा थंडीचा जोर वाढेल, अशी माहिती हवामान अभ्यासक अथ्रेया शेट्टी यांनी दिली.

कुठे किती तापमान?

  • अहिल्यानगर     ९.५o
  • पुणे     ९.८o
  • बारामती     १०.२o
  • नाशिक     १०.५o
  • उदगीर     १०.५o
  • जळगाव     ११.२o
  • महाबळेश्वर     ११.५o
  • परभणी     ११.५o
  • धाराशिव     १२.४o
  • सातारा     १२.५o
  • सोलापूर     १४.६o
  • सांगली     १४.९o
  • कोल्हापूर     १५.१o
  • माथेरान     १५.२o
  • डहाणू     १७.३o
  • मुंबई     १८.७o
  • रत्नागिरी     २०.२o 
  • ठाणे     २१.४o
टॅग्स :weatherहवामानTemperatureतापमान