शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

अवकाळी पावसाने आशेवर पाणी

By admin | Updated: March 17, 2017 01:06 IST

पोषक वातावरण व मुबलक पाणीसाठ्यामुळे रब्बी हंगामातील पिके जोमात असतानाच बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले

लातूर/उस्मानाबाद/बीड : पोषक वातावरण व मुबलक पाणीसाठ्यामुळे रब्बी हंगामातील पिके जोमात असतानाच बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले. या पावसात बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांतील रब्बीतील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांसह आंबा, द्राक्षांच्या फळबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. या नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम गुरुवारी सुरू झाले. लातूर जिल्ह्यातील औसा, लातूर, निलंगा, उदगीर, देवणी, रेणापूर तालुक्यांतील अनेक गावांत रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. लातूर तालुक्यात ३ हजार ६०० हेक्टर, तर औसा तालुक्यात १९ हजार ८४० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत, असा प्राथमिक अंदाज आहे. लातूर तालुक्यात उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार संजय वारकड तसेच तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवकाने नुकसानीची पाहणी केली. पंचनामा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांची समिती गठित केली आहे. आठ दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी या समित्यांना दिले आहेत. शेत, गाव आणि पीकनिहाय याद्या तयार करून पंचनामे केले जाणार आहेत. गावचा ग्रामसेवक तसेच तलाठी, मंडळ अधिकारी आणि शेतकरी पंचनाम्यादरम्यान उपस्थित राहतील आणि पंचनाम्याचा अहवाल तहसीलदारांकडे प्रारंभी सादर होईल. तहसीलदारांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर झाल्यानंतर तो शासनाकडे पाठविला जाणार आहे. तसे आदेश या समित्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात रब्बी पिकांसह फळबागाही उद्ध्वस्त झाल्या आहेत. प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार, सुमारे ६ हजार ५७२ हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका बसला आहे. सुमारे ३ हजार ६२५ हेक्टरवरील ज्वारी आडवी झाली आहे. तसेच काढणीला आलेल्या गव्हाची लोळवण झाली आहे. दीड हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील हरभऱ्याचे नुकसान झाले आहे. तुळजापूर तालुक्यात द्राक्ष बागांचे प्रमाण इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक प्रमाण असून, जवळपास सोळा हेक्टवरील द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे आंबा चोवीस, कांदा बारा, टरबूज-खरबूज तीस आणि २१ हेक्टवरील भाजीपाल्याचेही नुकसान झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. बीड जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा तब्बल १२ हजार हेक्टरवरील पिकांना बसला आहे. बुधवारी जिल्ह्यात ६०.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये बीड तालुक्यात १०.४५, पाटोदा १०.००, अंबाजोगाई २.२०, माजलगाव १.५०, केज १५.७१, धारूर १०.६७, परळी १०.०० अशी नोंद आहे. मंडळानुसार पावसामध्ये तफावत असली तरी वादळी वाऱ्याने ज्वारीची पडझड झाली आहे. फळबागांमध्ये आंबा व द्राक्षांच्या बागा कोलमडल्या आहेत. धारूर तालुक्यातील २८ गावशिवारातील १३४० हेक्टर, केज तालुक्यातील ३५०० हेक्टर, परळी तालुक्यातील ५००० हेक्टर असे जिल्हाभरातील जवळपास १५ हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. परळी तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी जिल्हाधिकारी राम यांनी गुरुवारी केली.