शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने ओढ दिल्याने नाशकात पेरण्या संकटात

By admin | Updated: July 6, 2014 01:05 IST

अगदी 7 जूनलाच नियमाने हजेरी लावण्याची नाशिकला परंपरा असलेल्या पावसाने गेल्या वर्षापासून ‘हजेरीत’ बदल केल्याने जिल्ह्यातील बळीराजाची चिंता काहीशी वाढली आहे.

गणोश  धुरी - नाशिक
अगदी 7 जूनलाच नियमाने हजेरी लावण्याची नाशिकला परंपरा असलेल्या पावसाने गेल्या वर्षापासून ‘हजेरीत’ बदल केल्याने जिल्ह्यातील बळीराजाची चिंता काहीशी वाढली आहे. यंदा तर जून संपून जुलै उजाडला तरी तुरळक अपवाद वगळता मान्सूनने दडी मारल्याने खरिपाच्या साडेसहा लाख हेक्टरवरील पेरण्या संकटात सापडल्या असून, भात-नागली पिके हातची जाण्याची भीती व्यक्त आहे, तर तूर, भुईमुगाची पिके पावसाअभावी जळाल्याने या हंगामात या पिकांचे उत्पादन नगण्य राहण्याचा धोका वाढला आहे. 
गंगापूर धरणाचा अपवाद वगळता अन्य धरणांमध्ये 1क् ते 15 टक्क्यांच्या आतच जलसाठा असून, नाशिक शहरात आता पाणीकपात सुरू होणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षीच्या पर्जन्यमानाची आकडेवारी पाहिल्यास 2 जुलैर्पयत मागील वर्षी 249 मिलिमीटर पाऊस झाला होता, यावर्षी तो अवघा 28.75 मि.मी. इतकाच झाला आहे. 
   पाऊस लांबल्याने खतांच्या विक्रीवरही प्रतिकूल परिणाम होऊन 4क् हजार मेट्रिक टनांहून जादा खते विक्रीअभावी पडून आहेत. लांबलेल्या पावसाने कापूस, मका या पिकांचे क्षेत्र घटून बाजरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागातील सूत्रंनी व्यक्त केली आहे. 
 
खरिपाच्या पेरण्यांवर संकट
जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र सहा लाख 34 हजार 6क्क् हेक्टर असून, यावर्षी पाऊस लांबल्याने पेरण्याही लांबल्या आहेत. ज्या काही 444 हेक्टर क्षेत्रवरील नाममात्र पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत, त्यात मका, तूर, कापूस या पिकांसह ऊसाचा समावेश आहे. 
धरणो कोरडीठाक
हवामान खात्याचा अंदाज पावसाने यावेळी खरा ठरविला आहे. जिल्ह्यातील धरणांची स्थिती बिकट झाली असून, यांतील जलसाठय़ाचे प्रमाण नऊ टक्के इतके अत्यल्प राहिले आहे. गौतमी गोदावरी, तीसगाव, कश्यपी, मुकणो, कडवा, भोजापूर, हरणबारी व नागासाक्या या आठ धरणांनी तळ गाठला आहे.
 
कमी झालेली सरासरी
 गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाची सरासरी 1 जून ते 2 जुलैदरम्यान अत्यंत नाममात्र म्हणजेच 284 मिलिमीटर इतकी कमी राहिलेली आहे. यावर्षी 1 जून ते 2 जुलै यादरम्यान अवघा 431.3 मि़मी़ पाऊस झालेला आह़े  
वार्षिक सरासरीच्या 28 } 
जिल्ह्याची वार्षिक सरासरी 1क्13.39 इतकी असताना, 2 जुलै 2क्13 ला 249.37 मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद नोंदविण्यात आली होती. यावर्षी वार्षिक सरासरीच्या 1 जून ते 2 जुलै दरम्यान पावसाची अवघी 28.75 मि़मी़ इतकी नाममात्र नोंद झाली आहे.
टॅँकरचे दीड शतक
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पाण्याची टंचाई जाणवत असून, त्यासाठी जूनअखेर 541 गावे व वाडय़ांना 161 टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात सर्वाधिक सिन्नर - 71, बागलाण- 28, सुरगाणा- 14, त्र्यंबकेश्वर, चांदवड व देवळा प्रत्येकी- 1क्, दिंडोरी- 2, पेठ- 4, येवला- 1, मालेगाव- 1, कळवण-1, नांदगाव- 2 व भगूर- 2 टँकरचा समावेश आह़े 
कापूस, मका घटणार
पाऊस लांबल्याने खरिपात लागवड केलेली भुईमूग व तूर पिके जळाली असून, या पश्चिम भागातील भात व नागलीच्या पेरण्या उशिरा होण्याची शक्यता आहे.