शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

पावसाने ओढ दिल्याने नाशकात पेरण्या संकटात

By admin | Updated: July 6, 2014 01:05 IST

अगदी 7 जूनलाच नियमाने हजेरी लावण्याची नाशिकला परंपरा असलेल्या पावसाने गेल्या वर्षापासून ‘हजेरीत’ बदल केल्याने जिल्ह्यातील बळीराजाची चिंता काहीशी वाढली आहे.

गणोश  धुरी - नाशिक
अगदी 7 जूनलाच नियमाने हजेरी लावण्याची नाशिकला परंपरा असलेल्या पावसाने गेल्या वर्षापासून ‘हजेरीत’ बदल केल्याने जिल्ह्यातील बळीराजाची चिंता काहीशी वाढली आहे. यंदा तर जून संपून जुलै उजाडला तरी तुरळक अपवाद वगळता मान्सूनने दडी मारल्याने खरिपाच्या साडेसहा लाख हेक्टरवरील पेरण्या संकटात सापडल्या असून, भात-नागली पिके हातची जाण्याची भीती व्यक्त आहे, तर तूर, भुईमुगाची पिके पावसाअभावी जळाल्याने या हंगामात या पिकांचे उत्पादन नगण्य राहण्याचा धोका वाढला आहे. 
गंगापूर धरणाचा अपवाद वगळता अन्य धरणांमध्ये 1क् ते 15 टक्क्यांच्या आतच जलसाठा असून, नाशिक शहरात आता पाणीकपात सुरू होणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षीच्या पर्जन्यमानाची आकडेवारी पाहिल्यास 2 जुलैर्पयत मागील वर्षी 249 मिलिमीटर पाऊस झाला होता, यावर्षी तो अवघा 28.75 मि.मी. इतकाच झाला आहे. 
   पाऊस लांबल्याने खतांच्या विक्रीवरही प्रतिकूल परिणाम होऊन 4क् हजार मेट्रिक टनांहून जादा खते विक्रीअभावी पडून आहेत. लांबलेल्या पावसाने कापूस, मका या पिकांचे क्षेत्र घटून बाजरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागातील सूत्रंनी व्यक्त केली आहे. 
 
खरिपाच्या पेरण्यांवर संकट
जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र सहा लाख 34 हजार 6क्क् हेक्टर असून, यावर्षी पाऊस लांबल्याने पेरण्याही लांबल्या आहेत. ज्या काही 444 हेक्टर क्षेत्रवरील नाममात्र पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत, त्यात मका, तूर, कापूस या पिकांसह ऊसाचा समावेश आहे. 
धरणो कोरडीठाक
हवामान खात्याचा अंदाज पावसाने यावेळी खरा ठरविला आहे. जिल्ह्यातील धरणांची स्थिती बिकट झाली असून, यांतील जलसाठय़ाचे प्रमाण नऊ टक्के इतके अत्यल्प राहिले आहे. गौतमी गोदावरी, तीसगाव, कश्यपी, मुकणो, कडवा, भोजापूर, हरणबारी व नागासाक्या या आठ धरणांनी तळ गाठला आहे.
 
कमी झालेली सरासरी
 गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाची सरासरी 1 जून ते 2 जुलैदरम्यान अत्यंत नाममात्र म्हणजेच 284 मिलिमीटर इतकी कमी राहिलेली आहे. यावर्षी 1 जून ते 2 जुलै यादरम्यान अवघा 431.3 मि़मी़ पाऊस झालेला आह़े  
वार्षिक सरासरीच्या 28 } 
जिल्ह्याची वार्षिक सरासरी 1क्13.39 इतकी असताना, 2 जुलै 2क्13 ला 249.37 मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद नोंदविण्यात आली होती. यावर्षी वार्षिक सरासरीच्या 1 जून ते 2 जुलै दरम्यान पावसाची अवघी 28.75 मि़मी़ इतकी नाममात्र नोंद झाली आहे.
टॅँकरचे दीड शतक
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पाण्याची टंचाई जाणवत असून, त्यासाठी जूनअखेर 541 गावे व वाडय़ांना 161 टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात सर्वाधिक सिन्नर - 71, बागलाण- 28, सुरगाणा- 14, त्र्यंबकेश्वर, चांदवड व देवळा प्रत्येकी- 1क्, दिंडोरी- 2, पेठ- 4, येवला- 1, मालेगाव- 1, कळवण-1, नांदगाव- 2 व भगूर- 2 टँकरचा समावेश आह़े 
कापूस, मका घटणार
पाऊस लांबल्याने खरिपात लागवड केलेली भुईमूग व तूर पिके जळाली असून, या पश्चिम भागातील भात व नागलीच्या पेरण्या उशिरा होण्याची शक्यता आहे.