शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

महाद्वार काल्याने पंढरपुरातील आषाढी वारीची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 14:51 IST

दहीहंडी फोडून भाविकांना वाटला प्रसाद; ज्ञानेश्वर माउलींची पालखी आळंदीकडे रवाना 

ठळक मुद्देकाल्याचे मानकरी असणाºया ह. भ. प. मदन महाराज हरिदास यांनी खांद्यावर पादुका घेऊन पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्याअनिल महाराज हरिदास यांनी काल्याचा अभंग म्हणून दहीहंडी फोडली व हंडीतील काला भाविकांना वाटलामंदिरातून हा सोहळा महाव्दार घाटावरून चंद्रभागा नदीवर गेला येथे नदीचे पाणी पादुकांवर अर्पण

पंढरपूर : श्री विठ्ठलाच्या सभामंडपात कुंकू बुक्क्यासह लाह्यांची उधळण करीत हजारो भक्तांच्या उपस्थितीत महाव्दार काल्याचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी परंपरेने दहीहंडी फोडून भाविकांना काल्याचा प्रसाद वाटण्यात आला. खºया अर्थाने या काल्याने आता आषाढी यात्रेची सांगता झाली.  दरम्यान, मंगळवारी ग्रहणामुळे मुक्कामी असलेली ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज महाद्वार काल्यानंतर आळंदीकडे रवाना झाली.

पंढरीत अनेक संतांच्या विविध परंपरा असून यामध्ये महाद्वार काल्याचाही समावेश आहे. येथील हरिदास घराण्यात जवळपास ४०० वर्षांपूर्वी संत पांडुरंग महाराज यांना प्रत्यक्ष विठ्ठलाने आपल्या खडावा अर्थात पादुका दिल्याची आख्यायिका आहे. तेव्हापासून या घराण्यात या खडावा डोक्यावर घेऊन काला करण्याची परंपरा आहे. 

सभामंडप येथे काल्याचे मानकरी असणाºया ह. भ. प. मदन महाराज हरिदास यांनी खांद्यावर पादुका घेऊन पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्या. यानंतर अनिल महाराज हरिदास यांनी काल्याचा अभंग म्हणून दहीहंडी फोडली व हंडीतील काला भाविकांना वाटला. मंदिरातून हा सोहळा महाव्दार घाटावरून चंद्रभागा नदीवर गेला येथे नदीचे पाणी पादुकांवर अर्पण केले. यानंतर कुंभार घाटमार्गे माहेश्वरी धर्मशाळा, आराध्ये गल्ली, हरिदास वेस येथे दहीहंडी फोडून हा सोहळा वाड्यात विसावला. येथे येणाºया हजारो भाविकांना काल्याचा प्रसाद वाटण्यात आला. महाव्दार काल्यानंतर खºया अर्थाने आषाढी वारीची सांगता झाली. या काल्यासाठी शेकडो वारकरी पंढरीत थांबले होते.

पालखी सोहळा आळंदीकडे रवानाज्ञानेश्वर मंदिरातून आषाढी यात्रेचा सोहळा पार पाडून कैवल्य सम्राट श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा सजविलेला रथ  बुधवारी दुपारी चार वाजता श्री क्षेत्र आळंदीकडे रवाना झाला.  गोपाळपूरचा गोपाळकाला झाल्यानंतर सर्व संतांचे पालखी सोहळे परतीच्या प्रवासासाठी मार्गस्थ होतात. गेल्यावर्षी आणि यंदा असे सलग दोन वर्षे पौर्णिमेला गोपाळकाल्यादिवशीच चंद्रग्रहण आल्यामुळे यंदाही माउलींच्या पालखीचा पंढरपुरातील मुक्काम वाढला होता. बुधवारी दुपारी ४ वाजता संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. सोबत २ हजार वारकºयांसह वीणेकरी, पखवाज, तुळशीवाले, हंडेवाले व दिंड्या सहभागी झाल्या होत्या़ पहिला मुक्काम वाखरी येथे होणार आहे़ संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतील माउलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. भाविक रांग करून शिस्तीने दर्शन घेत होते़

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा