शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दूध न पाजल्यानेच बछड्यांचा मृत्यू

By admin | Updated: December 30, 2015 00:38 IST

चंद्रपूर जिल्ह्याच्या पाथरी वनक्षेत्रातील चार बछड्यांंचा मृत्यू हा वाघिणीने बछड्यांना दूध न पाजल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी चौकशी अहवालातून समोर आले असल्याची माहिती वनमंत्री

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्याच्या पाथरी वनक्षेत्रातील चार बछड्यांंचा मृत्यू हा वाघिणीने बछड्यांना दूध न पाजल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी चौकशी अहवालातून समोर आले असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मंत्रालयात पत्रकारांना दिली. तसेच त्या वाघिणीचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याबाबत केंद्रीय अन्वेषण विभागाला कळविल्याचे त्यांनी सांगितले. या विशेष तपास पथकामध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाचा एक अधिकारी, वन विभागाचा एक अधिकारी आणि पोलीस दलाचा एक अधिकारी यांचा समावेश असेल. या वाघिणीची शिकार झाली का, पाणी पिण्यासाठी गेली असतांना ती कुठल्या विहिरीत पडली का, या बाबींचा शोध सुरु आहे. ही घटना चंद्रपूर व्याघ्र प्रकल्पाबाहेरची घटना आहे. राज्यातील वाघांची संख्या वाढावी यासाठी वन विभाग विशेष प्रयत्न करत आहे. व्याघ्र प्रकल्पात विशेष व्याघ्र संरक्षण दल स्थापन करण्यात आले आहे. पण बफर क्षेत्राबाहेर घडलेली ही घटना लक्षात घेऊन बफरक्षेत्राबाहेर वाघांचे अस्तित्व असलेल्या प्रदेशातही विशेष व्याघ्र संरक्षण दल नियुक्त करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. वाघांच्या शिकारीस प्रतिबंध करणारा केंद्रीय कायदा अधिक कडक करावा यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे शिफारस पाठवली आहे, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)काँग्रेसचा आरोपचंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या ४ पिल्लांच्या मृत्यूसाठी वन खात्याची निष्क्रि यता कारणीभूत असल्याची टीका टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. मृत पिल्लांची माता अजूनही बेपत्ता आहे. सदरहू परिसरात दोन वाघिण आणि एक वाघ असल्याची माहिती वनखात्याला होती. परंतु, योग्य पद्धतीने देखरेख न झाल्याने त्या दोन वाघिणींपैकी एक गरोदर आहे, हे वन खात्याला कळालेच नाही. तिला चार पिल्ले झाली तरी वन खात्याला कळाले नाही. ही निष्क्रि यतेची परीसीमा असून, आता पिल्ले मरण पावल्यानंतर आणि वाघिण बेपत्ता झाल्यानंतर सरकारला जाग आल्याचे सावंत म्हणाले.