शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

दूध न पाजल्यानेच बछड्यांचा मृत्यू

By admin | Updated: December 30, 2015 00:38 IST

चंद्रपूर जिल्ह्याच्या पाथरी वनक्षेत्रातील चार बछड्यांंचा मृत्यू हा वाघिणीने बछड्यांना दूध न पाजल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी चौकशी अहवालातून समोर आले असल्याची माहिती वनमंत्री

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्याच्या पाथरी वनक्षेत्रातील चार बछड्यांंचा मृत्यू हा वाघिणीने बछड्यांना दूध न पाजल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी चौकशी अहवालातून समोर आले असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मंत्रालयात पत्रकारांना दिली. तसेच त्या वाघिणीचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याबाबत केंद्रीय अन्वेषण विभागाला कळविल्याचे त्यांनी सांगितले. या विशेष तपास पथकामध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाचा एक अधिकारी, वन विभागाचा एक अधिकारी आणि पोलीस दलाचा एक अधिकारी यांचा समावेश असेल. या वाघिणीची शिकार झाली का, पाणी पिण्यासाठी गेली असतांना ती कुठल्या विहिरीत पडली का, या बाबींचा शोध सुरु आहे. ही घटना चंद्रपूर व्याघ्र प्रकल्पाबाहेरची घटना आहे. राज्यातील वाघांची संख्या वाढावी यासाठी वन विभाग विशेष प्रयत्न करत आहे. व्याघ्र प्रकल्पात विशेष व्याघ्र संरक्षण दल स्थापन करण्यात आले आहे. पण बफर क्षेत्राबाहेर घडलेली ही घटना लक्षात घेऊन बफरक्षेत्राबाहेर वाघांचे अस्तित्व असलेल्या प्रदेशातही विशेष व्याघ्र संरक्षण दल नियुक्त करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. वाघांच्या शिकारीस प्रतिबंध करणारा केंद्रीय कायदा अधिक कडक करावा यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे शिफारस पाठवली आहे, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)काँग्रेसचा आरोपचंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या ४ पिल्लांच्या मृत्यूसाठी वन खात्याची निष्क्रि यता कारणीभूत असल्याची टीका टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. मृत पिल्लांची माता अजूनही बेपत्ता आहे. सदरहू परिसरात दोन वाघिण आणि एक वाघ असल्याची माहिती वनखात्याला होती. परंतु, योग्य पद्धतीने देखरेख न झाल्याने त्या दोन वाघिणींपैकी एक गरोदर आहे, हे वन खात्याला कळालेच नाही. तिला चार पिल्ले झाली तरी वन खात्याला कळाले नाही. ही निष्क्रि यतेची परीसीमा असून, आता पिल्ले मरण पावल्यानंतर आणि वाघिण बेपत्ता झाल्यानंतर सरकारला जाग आल्याचे सावंत म्हणाले.