शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

धरणे असूनही दुष्काळाचे सावट

By admin | Updated: April 28, 2016 02:17 IST

आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांमध्ये अवघा ५.९६ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पुढील काळात पिण्याची पाण्याची परिस्थिती गंभीर होणार आहे.

नारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांमध्ये अवघा ५.९६ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पुढील काळात पिण्याची पाण्याची परिस्थिती गंभीर होणार आहे. या दोनही तालुक्यांना प्रथमच दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साडेआठ टक्के पाणी कमी झाले आहे़. सध्या पुणे, नगर, सोलापूर, बीड या जिल्ह्यांसाठी सोडण्यात आलेले पाणी अद्यापही सुरू असून, ३ ते ४ मेपर्यंत हे पाणी कुकडी डावा कालव्यामधून सुरू राहणार आहे़ जुन्नर तालुक्यात येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगा, तर आंबेगाव तालुक्यातील डिंभा धरण ही पाच धरणे आहेत़ या पाच धरणांच्या पाणीसाठ्यावर जुन्नर, आंबेगावसह पारनेर, श्रीगोंदा, करमाळा, कर्जत या तालुक्यांचे नियोजन अवलंबून आहे. जुन्नर व आंबेगाव तालुक्याला पहिल्यांदाच दुष्काळ सदृश परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे़ पहिल्यांदाच अवघा ५.९६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे़ या पाणीसाठ्या पैकी बहुतांश पाणी बाष्पिभवनात जाणार आहे. त्याचाही परिणाम या साठ्यावर होणार आहे़ पिंपळगाव जोगा धरणातील मृतसाठ्यातील पाणी दरवर्षी सर्वांना दिलासा देणार ठरते, मात्र यावर्षी मृतसाठ्यातून २.३ टीएमसी पाणी चार जिल्ह्यांसाठी सोडण्यात येणार आहे़ त्यात आज अखेर १४०० दलघफूट पाणी कुकडी डावा कालव्याद्वारे सोडण्यात आले आहे़ हे पाणी ६ ते ७ मे पर्यंत सुरू राहणार आहे़ पिंपळगाव जोगा धरणातील मृतसाठा कमी झाला असून, सध्या २५०३ दलघफूट पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्ऱ १ चे कार्यकारी अभियंता जी़ बी़ नन्नोर यांनी दिली़ सद्य:स्थितीत सर्व धरणे मिळून अवघे १५१५ दलघफूट (४.९६ टक्के) साठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी आजमितीस ७३५७ दलघफूट (१३.५१ टक्के) साठा होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत साडेआठ टक्के साठा कमी आहे. पाच धरणांपैकी आंबेगाव तालुक्यातील डिंभा धरणाची परिस्थितीदेखील यावेळी अत्यंत गंभीर आहे. (वार्ताहर)>४माणिकडोह धरणमार्गे घाटघर रस्त्यावरील सर्वच आदिवासी गावांतील पाणीपुरवठा योजना बंद पडलेल्या आहेत. राजूर नं. १, राजूर नं. २, पेठेचीवाडी, निमगिरी, देवळे, अंजनावळे ही गावे अगदी माणिकडोह धरणाच्या बॅकवॉटरलगत वसलेली आहेत. ही सर्व गावे कुकडी नदीच्या खोऱ्यात मोडतात. >४परंतु उन्हाळ्यात मात्र या गावात चांगलेच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. मुळात पाणीसाठा असताना तांत्रिक अडचणी, निकृष्ट काम, यामुळे कशाबशा अवस्थेत रडतकढत सुरू असणाऱ्या पाणीपुरवठा योजना प्रामुख्याने बंद पडलेल्या आहेत. आदिवासी भागातील जवळपास सर्वच गावे खासगी पाण्याच्या स्रोतांवरच आता प्रामुख्याने अवलंबून आहेत. >४येडगाव धरणालगत बहुतांश गावांच्या नळपाणी योजना असल्यानेहे पाणीपुरवठ्यासाठी प्रमुख धरण मानले जाते़ या धरणामध्ये आजमितीस १०६२ दलघफूट (३७.९१ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे़ माणिकडोह धरणामध्ये आजमितीस ३१ दलघफूट (०.३१ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे़ वडज धरणामध्ये आजमितीस ९४ दलघफूट (७.९९ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे़ पिंपळगाव जोगा धरणामध्ये ० टक्के साठा शिल्लक आहे़