शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
5
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
6
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
7
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
8
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
9
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
10
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
11
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
12
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
13
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
14
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
15
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
16
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
17
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
18
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
19
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...

धरणे असूनही दुष्काळाचे सावट

By admin | Updated: April 28, 2016 02:17 IST

आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांमध्ये अवघा ५.९६ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पुढील काळात पिण्याची पाण्याची परिस्थिती गंभीर होणार आहे.

नारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांमध्ये अवघा ५.९६ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पुढील काळात पिण्याची पाण्याची परिस्थिती गंभीर होणार आहे. या दोनही तालुक्यांना प्रथमच दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साडेआठ टक्के पाणी कमी झाले आहे़. सध्या पुणे, नगर, सोलापूर, बीड या जिल्ह्यांसाठी सोडण्यात आलेले पाणी अद्यापही सुरू असून, ३ ते ४ मेपर्यंत हे पाणी कुकडी डावा कालव्यामधून सुरू राहणार आहे़ जुन्नर तालुक्यात येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगा, तर आंबेगाव तालुक्यातील डिंभा धरण ही पाच धरणे आहेत़ या पाच धरणांच्या पाणीसाठ्यावर जुन्नर, आंबेगावसह पारनेर, श्रीगोंदा, करमाळा, कर्जत या तालुक्यांचे नियोजन अवलंबून आहे. जुन्नर व आंबेगाव तालुक्याला पहिल्यांदाच दुष्काळ सदृश परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे़ पहिल्यांदाच अवघा ५.९६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे़ या पाणीसाठ्या पैकी बहुतांश पाणी बाष्पिभवनात जाणार आहे. त्याचाही परिणाम या साठ्यावर होणार आहे़ पिंपळगाव जोगा धरणातील मृतसाठ्यातील पाणी दरवर्षी सर्वांना दिलासा देणार ठरते, मात्र यावर्षी मृतसाठ्यातून २.३ टीएमसी पाणी चार जिल्ह्यांसाठी सोडण्यात येणार आहे़ त्यात आज अखेर १४०० दलघफूट पाणी कुकडी डावा कालव्याद्वारे सोडण्यात आले आहे़ हे पाणी ६ ते ७ मे पर्यंत सुरू राहणार आहे़ पिंपळगाव जोगा धरणातील मृतसाठा कमी झाला असून, सध्या २५०३ दलघफूट पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्ऱ १ चे कार्यकारी अभियंता जी़ बी़ नन्नोर यांनी दिली़ सद्य:स्थितीत सर्व धरणे मिळून अवघे १५१५ दलघफूट (४.९६ टक्के) साठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी आजमितीस ७३५७ दलघफूट (१३.५१ टक्के) साठा होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत साडेआठ टक्के साठा कमी आहे. पाच धरणांपैकी आंबेगाव तालुक्यातील डिंभा धरणाची परिस्थितीदेखील यावेळी अत्यंत गंभीर आहे. (वार्ताहर)>४माणिकडोह धरणमार्गे घाटघर रस्त्यावरील सर्वच आदिवासी गावांतील पाणीपुरवठा योजना बंद पडलेल्या आहेत. राजूर नं. १, राजूर नं. २, पेठेचीवाडी, निमगिरी, देवळे, अंजनावळे ही गावे अगदी माणिकडोह धरणाच्या बॅकवॉटरलगत वसलेली आहेत. ही सर्व गावे कुकडी नदीच्या खोऱ्यात मोडतात. >४परंतु उन्हाळ्यात मात्र या गावात चांगलेच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. मुळात पाणीसाठा असताना तांत्रिक अडचणी, निकृष्ट काम, यामुळे कशाबशा अवस्थेत रडतकढत सुरू असणाऱ्या पाणीपुरवठा योजना प्रामुख्याने बंद पडलेल्या आहेत. आदिवासी भागातील जवळपास सर्वच गावे खासगी पाण्याच्या स्रोतांवरच आता प्रामुख्याने अवलंबून आहेत. >४येडगाव धरणालगत बहुतांश गावांच्या नळपाणी योजना असल्यानेहे पाणीपुरवठ्यासाठी प्रमुख धरण मानले जाते़ या धरणामध्ये आजमितीस १०६२ दलघफूट (३७.९१ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे़ माणिकडोह धरणामध्ये आजमितीस ३१ दलघफूट (०.३१ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे़ वडज धरणामध्ये आजमितीस ९४ दलघफूट (७.९९ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे़ पिंपळगाव जोगा धरणामध्ये ० टक्के साठा शिल्लक आहे़