शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

दैनंदिन आहाराकडे दुर्लक्ष होत असल्याने भारतीयांमध्ये ‘बी १२’ जीवनसत्त्वाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 02:44 IST

घड्याळाच्या काट्यावर चालणारे मुंबईकर आपल्या आहाराच्या बाबतीत गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. केवळ काम, स्पर्धा, यशाच्या मागे धावताना आपल्या दैनंदिन आहाराकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने मुंबईकरांमध्ये ‘बी१२’ जीवनसत्त्व हे केवळ १९.८४ टक्के एवढेच असल्याचे नुकतेच एका अभ्यासातून समोर आले आहे.

मुंबई : घड्याळाच्या काट्यावर चालणारे मुंबईकर आपल्या आहाराच्या बाबतीत गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. केवळ काम, स्पर्धा, यशाच्या मागे धावताना आपल्या दैनंदिन आहाराकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने मुंबईकरांमध्ये ‘बी१२’ जीवनसत्त्व हे केवळ १९.८४ टक्के एवढेच असल्याचे नुकतेच एका अभ्यासातून समोर आले आहे.‘बी१२’ या जीवनसत्त्वाच्या माध्यमातून चेतापेशी आणि रक्तपेशींची निर्मिती करण्यात येते. मेंदू, रोगप्रतिकारक क्षमता आणि चयापचय अशा आरोग्य क्रियांमध्ये या जीवनसत्त्वाची भूमिका महत्त्वाची असते. एका संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार, १५ टक्क्यांहून अधिक भारतीय लोकसंख्येत जीवनसत्त्व ‘बी१२’ची कमतरता असते. आश्चर्याची बाब म्हणजे लिंगआधारे केलेल्या विश्लेषणात महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये ‘बी१२’चा अभाव अधिक दिसून येतो आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला पूरक आहार घेत असल्याने त्यांचे शरीर ‘बी१२’ची पातळी राखते.प्रतिबंधात्मक उपाय म्हणून योग्य अन्नपदार्थ आहारात समाविष्ट करावेत. गरजेनुसार पूरक आहार घ्यावा. एखाद्याला आपल्या शरीरातील ‘बी१२’ अभावाची तपासणी करायची असल्यास डॉक्टर सहज निदान करू शकतात. तसेच पूरक आहार किंवा इंजेक्शनदेखील सुचवतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये जीवनसत्व ‘बी१२’ची कमतरता आणि संबंधित लक्षणांची तपासणी सर्वसाधारण चिकित्सकाकडे करून घेणे उत्तम ठरते.‘जीवनसत्त्व बी १२’च्या अभावाची कारणेअ‍ॅट्रोफिक गॅस्ट्राइटीसमुळे पोटातील अंतर्गत अस्तर पातळ होतंगंभीर स्वरूपाच्या रक्ताक्षय, रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित आजार होतातक्रोनज डीसीज, सेलीयाक डीसीज किंवा जीवाणूंची वाढ झाल्याने छोट्या आतड्याच्या सुरळीत कार्यवहनात अडथळा आल्याने जाणवणारा अशक्तपणावाढत्या वयासोबत जीवनसत्त्व ‘बी१२’ शोषण्याची शरीराची शक्ती संपून जाते. जर एखाद्याने वजन कमी करण्याची वा पोटाची शस्त्रक्रिया केली असल्यास हे कठीण होऊन जाते. मद्यपान मोठ्या प्रमाणावर करत असल्यास किंवा बराच काळ अ‍ॅसिड कमी करणारे औषध घेत असल्यास हे जीवनसत्त्व शोषण्यास शरीराला अडथळे निर्माण होतात.- डॉ. कीर्ती चढ्ढा।शहर ‘बी१२’चाअभावअहमदाबाद २७.९४दिल्ली २६.५८पुणे २२.६६कोलकाता २०.७३मुंबई १९.८४कोचीन ९.१८