शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

काँग्रेसमुळं लोकांचे केस गेले, फिल्टरच्या पाण्यामुळे मी वाचलो; पाणीपुरवठा मंत्र्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 13:18 IST

कचरा करणारं काँग्रेस हवं की, फिल्टरचं पाणी देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हवेत, हे जनतेनं ठरवायंच आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आशीर्वाद द्यायचा आहे, असंही लोणीकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाजनादेश यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जात असून चांगलीच गाजत आहे. परंतु, आता ही यात्रा पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या अजब दाव्यामुळे चर्चेत आली आहे.

परभणी जिल्ह्यातील सेलू येथे आयोजित जाहीर सभेत लोणीकर यांनी काँग्रेसवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, पुर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने मराठवाड्याला नदीचं, ओढ्या, डबक्याचं, दुषित बोरच पाणी पाजलं. आमच्या मराठवाड्याला आधीच्या सरकारने शाहू, फुले, आंबेडकरांच नाव सांगितले. परंतु, आम्हाला केवळ दुषित पाणीपुरवठा केला. या दुषित पाणीपुरवठ्यामुळे गरिब लोकांच्या किडनी खराब झाल्या, लिव्हर, वॉल्व्हस खराब झाले. याच पाण्यामुळे येथे उपस्थित अर्ध्या लोकांच्या डोक्यावरचे केस गेले. याला राष्ट्रवादी-काँग्रेसच जबाबदार आहे. मात्र फिल्टरच्या पाण्याने केस धुतल्यामुळे मी वाचलो असून माझे केस सुरक्षीत असल्याचा अजब दावा लोणीकर यांनी केला.

दरम्यान कचरा करणारं काँग्रेस हवं की, फिल्टरचं पाणी देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हवेत, हे जनतेनं ठरवायंच आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आशीर्वाद द्यायचा आहे, असंही लोणीकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.