शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

काँग्रेसमुळं लोकांचे केस गेले, फिल्टरच्या पाण्यामुळे मी वाचलो; पाणीपुरवठा मंत्र्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 13:18 IST

कचरा करणारं काँग्रेस हवं की, फिल्टरचं पाणी देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हवेत, हे जनतेनं ठरवायंच आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आशीर्वाद द्यायचा आहे, असंही लोणीकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाजनादेश यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जात असून चांगलीच गाजत आहे. परंतु, आता ही यात्रा पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या अजब दाव्यामुळे चर्चेत आली आहे.

परभणी जिल्ह्यातील सेलू येथे आयोजित जाहीर सभेत लोणीकर यांनी काँग्रेसवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, पुर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने मराठवाड्याला नदीचं, ओढ्या, डबक्याचं, दुषित बोरच पाणी पाजलं. आमच्या मराठवाड्याला आधीच्या सरकारने शाहू, फुले, आंबेडकरांच नाव सांगितले. परंतु, आम्हाला केवळ दुषित पाणीपुरवठा केला. या दुषित पाणीपुरवठ्यामुळे गरिब लोकांच्या किडनी खराब झाल्या, लिव्हर, वॉल्व्हस खराब झाले. याच पाण्यामुळे येथे उपस्थित अर्ध्या लोकांच्या डोक्यावरचे केस गेले. याला राष्ट्रवादी-काँग्रेसच जबाबदार आहे. मात्र फिल्टरच्या पाण्याने केस धुतल्यामुळे मी वाचलो असून माझे केस सुरक्षीत असल्याचा अजब दावा लोणीकर यांनी केला.

दरम्यान कचरा करणारं काँग्रेस हवं की, फिल्टरचं पाणी देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हवेत, हे जनतेनं ठरवायंच आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आशीर्वाद द्यायचा आहे, असंही लोणीकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.