शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
3
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
4
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
5
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
6
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
7
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
8
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
9
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
10
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले
11
Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
12
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
13
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
14
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
15
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
16
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
17
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक
18
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
19
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
20
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!

दुष्काळप्रश्नी मोदी-पवार भेट

By admin | Updated: September 15, 2015 01:58 IST

महाराष्ट्रातल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेल भरो आंदोलन सुरू असताना दिल्लीत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र

नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेल भरो आंदोलन सुरू असताना दिल्लीत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि राज्यातल्या दुष्काळाच्या समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले. जवळपास ३० मिनिटांच्या या भेटीत पवारांचे म्हणणे ऐकून त्यातल्या प्रमुख मागण्यांत लक्ष घालण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले मात्र कोणतीही ठोस घोषणा केली नाही.पंतप्रधानांच्या भेटीत पवारांनी मुख्यत्वे खरीपाची पिके नष्ट झाल्यामुळे निर्माण झालेली स्थिती, चारा वाटपाचा प्रश्न इत्यादी विषय मांडले. याखेरीज साखर निर्यातीचा प्रश्न मुख्यत्वे उपस्थित केला. पवार म्हणाले, राज्यात साखरेचे साठे पडून आहेत. राज्यातून ३0 हजार टन साखर निर्यात झाल्यास हा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो. त्यासाठी केंद्राने अनुदान द्यावे, डाळिंब, संत्री व द्राक्षबागांचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यांनाही केंद्र व राज्य सरकारने मदत करावी, अशी मागणी पवार यांनी केली. मुंबईत सीआरझेड कायद्यामुळे होत असलेल्या दुष्परिणामांकडेही पवारांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले.दुष्काळग्रस्त भागाच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादीच्या जेल भरो आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले, ‘हे जेल भरो आंदोलन नसून जेलसे रोको आंदोलन आहे’. त्यावर भाष्य करण्यास नकार देत पवार इतकेच म्हणाले, शेलारांना दुष्काळचे गांभीर्य कळते का? मराठवाड्यात प्रत्यक्ष जाऊ न दुष्काळ म्हणजे नेमके काय, ते कधी त्यांनी पाहिले काय? आंदोलनापूर्वी राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना भेटून दुष्काळी उपाययोजनांची माहिती दिली होती. मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिले नाही म्हणून रस्त्यावर उतरावे लागले. शेलार यांच्या पोरकट विधानांमुळेच १० महिन्यांत लोकांचा सरकारवरचा विश्वास उडाला, हे त्यांनी लक्षात घ्यावे. विखे-पाटील यांना कोपरखळीपंतप्रधानांच्या भेटीनंतर आपल्या निवासस्थानी या भेटीची सविस्तर माहिती पवारांनी पत्रकारांना दिली. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना, बाळासाहेब विखेंच्या ‘दुष्काळ पवारांमुळेच पडला’, या टीकेला थेट उत्तर न देता, पवार म्हणाले, गेली कित्येक वर्षे मी राज्याचा मुख्यमंत्री नाही, ही बाब सर्वांनाच ठाऊ क आहे, तरीही काही लोक मलाच सर्व गोष्टींसाठी जबाबदार ठरवतात. बहुदा वयामुळे त्यांना असे प्रश्न पडत असावेत.