शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
8
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
9
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळप्रश्नी मोदी-पवार भेट

By admin | Updated: September 15, 2015 01:58 IST

महाराष्ट्रातल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेल भरो आंदोलन सुरू असताना दिल्लीत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र

नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेल भरो आंदोलन सुरू असताना दिल्लीत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि राज्यातल्या दुष्काळाच्या समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले. जवळपास ३० मिनिटांच्या या भेटीत पवारांचे म्हणणे ऐकून त्यातल्या प्रमुख मागण्यांत लक्ष घालण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले मात्र कोणतीही ठोस घोषणा केली नाही.पंतप्रधानांच्या भेटीत पवारांनी मुख्यत्वे खरीपाची पिके नष्ट झाल्यामुळे निर्माण झालेली स्थिती, चारा वाटपाचा प्रश्न इत्यादी विषय मांडले. याखेरीज साखर निर्यातीचा प्रश्न मुख्यत्वे उपस्थित केला. पवार म्हणाले, राज्यात साखरेचे साठे पडून आहेत. राज्यातून ३0 हजार टन साखर निर्यात झाल्यास हा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो. त्यासाठी केंद्राने अनुदान द्यावे, डाळिंब, संत्री व द्राक्षबागांचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यांनाही केंद्र व राज्य सरकारने मदत करावी, अशी मागणी पवार यांनी केली. मुंबईत सीआरझेड कायद्यामुळे होत असलेल्या दुष्परिणामांकडेही पवारांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले.दुष्काळग्रस्त भागाच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादीच्या जेल भरो आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले, ‘हे जेल भरो आंदोलन नसून जेलसे रोको आंदोलन आहे’. त्यावर भाष्य करण्यास नकार देत पवार इतकेच म्हणाले, शेलारांना दुष्काळचे गांभीर्य कळते का? मराठवाड्यात प्रत्यक्ष जाऊ न दुष्काळ म्हणजे नेमके काय, ते कधी त्यांनी पाहिले काय? आंदोलनापूर्वी राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना भेटून दुष्काळी उपाययोजनांची माहिती दिली होती. मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिले नाही म्हणून रस्त्यावर उतरावे लागले. शेलार यांच्या पोरकट विधानांमुळेच १० महिन्यांत लोकांचा सरकारवरचा विश्वास उडाला, हे त्यांनी लक्षात घ्यावे. विखे-पाटील यांना कोपरखळीपंतप्रधानांच्या भेटीनंतर आपल्या निवासस्थानी या भेटीची सविस्तर माहिती पवारांनी पत्रकारांना दिली. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना, बाळासाहेब विखेंच्या ‘दुष्काळ पवारांमुळेच पडला’, या टीकेला थेट उत्तर न देता, पवार म्हणाले, गेली कित्येक वर्षे मी राज्याचा मुख्यमंत्री नाही, ही बाब सर्वांनाच ठाऊ क आहे, तरीही काही लोक मलाच सर्व गोष्टींसाठी जबाबदार ठरवतात. बहुदा वयामुळे त्यांना असे प्रश्न पडत असावेत.