शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
4
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
5
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
6
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
7
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
8
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
9
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
10
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
11
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
12
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
13
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
15
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
16
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
17
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
18
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
19
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
20
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती

दुष्काळी भागाची केंद्रीय दुष्काळी पथकांकडून पाहणी

By admin | Updated: June 2, 2016 21:50 IST

जिल्ह्यातील दुष्काळी भागाची गुरुवारी केंद्रीय पथकाने पाहणी करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला.

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 2-  जिल्ह्यातील दुष्काळी भागाची गुरुवारी केंद्रीय पथकाने पाहणी करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला. गुरुवारी केंद्रीय पथकाने अक्कलकोट तालुक्यातील जेऊर, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, माळशिरस आदी भागातील दुष्काळी भागाची पाहणी केली़. यावेळी बंद पडलेले पाणीपुरवठा स्रोत, जळालेल्या बागा, कोरडा पडलेला धुबधुबी प्रकल्प, पडीक पडलेल्या जमिनी पाहताच दुष्काळी दाहकतेची खात्री या पथकाला पटली. यामध्ये पाच जणांचा समावेश होता.यामध्ये राणी कुमोदिनी, आर. के. सिंग, एच. आर. खन्ना, पी. के. मिश्रा, जी. आर. झरगर, जिल्हाधिकारी रणजित कुमार, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, प्रांताधिकारी श्रीमंत पाटोळे, तहसीलदार अंजली मरोड, गटविकास अधिकारी उत्तम वाघमोडे यांचा समावेश होता. या पथकाने खालावलेली पाण्याची पातळी, टँकरचा आढावा, जलयुक्त शिवारातून झालेली कामे यासह गावाच्या चारही शिवारातील दुष्काळाची पाहणी त्यांनी केली. पथकाला माजी आ. महादेवराव पाटील, माजी उपसभापती मल्लिकार्जुन पाटील, सरपंच डॉ. विठ्ठल राठोड व शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा सांगितल्या. भाजपाचे तालुकाध्यक्ष मल्लिनाथ स्वामी, राजशेखर मसुती, आनंद खजुरगीकर यांनी मदतीसाठी निवेदन दिले. इंगळगीमार्गे शिरवळ परत जेऊर या पाहणी दौऱ्यात त्यांना सगळीकडे उजाड माळरानच दिसले. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती व पायपीटही या पथकाने पाहिली. चंद्रकांत पाटील यांच्या जळालेल्या द्राक्ष व इतर बागांची पाहणी करून श्रीमंत झंपा यांच्या मुळासकट जळालेल्या पेरुची बागही त्यांनी पाहिली.

अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील निरीक्षणावरून काहीच सांगू शकत नाही. याचा एकत्रित अहवाल सादर करणार असून, मदतीसाठी आम्ही सकारात्मक आहोत.- राणी कुमोदिनी, प्रमुख, केंद्रीय दुष्काळी पाहणी पथकतालुक्यात कंपार्टमेंट बंडिंग व जलयुक्त शिवाराच्या कामावर भर द्या. पाण्याचा प्रत्येक थेंब अडविला पाहिजे. नुकसानीचा अंदाज घेतला. शेतकऱ्यांना सध्या मदतीची गरज आहे, याची कल्पना आली आहे.- आर. के. सिंग, सदस्य, केंद्रीय दुष्काळी पाहणी पथक