शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

 ३३ कोटी वृक्षलागवडीचे ड्रोन शूटिंग, स्पॉट फोटोग्रॉफी, १ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 17:28 IST

राज्य शासनाने यंदा ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्टपूर्तीसाठी कृती आराखडा तयार केला आहे. तब्बल तीन महिन्यांपर्यंत ही मोहीम चालणार असून, यावेळी वृक्षलागवड मोहिमेचे ड्रोन शूटिंग, स्पॉट फोटोग्राफी केली जाणार आहे.

- गणेश वासनिक अमरावती - राज्य शासनाने यंदा ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्टपूर्तीसाठी कृती आराखडा तयार केला आहे. तब्बल तीन महिन्यांपर्यंत ही मोहीम चालणार असून, यावेळी वृक्षलागवड मोहिमेचे ड्रोन शूटिंग, स्पॉट फोटोग्राफी केली जाणार आहे. ही सर्व माहिती वेबसाईटवर अपलोड करणे अनिवार्य आहे.१ जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ या काळात ३३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमाचा बिगूल वाजला. ही वृक्षलागवड जनचळवळ होण्याच्या अनुषंगाने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रयत्न सुरू आहे. प्रधान मुख्य वनसचिव विकास खारगे यांनी राज्यात सर्वच विभागात बैठका घेऊन वृक्षलागवडीचे नियोजन चालविले आहे. वनविभाग, सामाजिक वनिकरण आणि इतर शासकीय, प्रशासकीय ४६ यंत्रणांच्या सहकार्याने ३३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्णत्वास जाणार आहे. त्याकरिता ३३ जिल्हानिहाय वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक यांच्याकडे या मोहिमेची विशेषत्ववाने धुरा सोपविली आहे. रोपे जगविणे, रोपांची आॅनलाईन मागणी नोंदविणे, यंत्रणेला रोपे पुरविणे, वृक्षलागवडीसाठी जागेची तरतूद करणे आदी बाबी पूर्ण कराव्या लागणार आहेत. यावेळी रेशीम उद्योग विभागाच्या जागेवर वृक्षलागवडीचे नियोजन केले आहे.  आमदार, खासदारांवर रोपे जगविण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाने ३३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमात सहभागी व्हावे, यासाठी वनविभागाने जोरदार तयारी चालविली आहे. दुष्काळी भागात यापूर्वीच्या १३ कोटी वृक्ष लागवडीत झाडे जगविण्याची जबाबदारी आमदार, खासदारांवर सोपविली जाणार आहे. येत्या उन्हाळ्यात वृक्ष जगविणे मोठे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील वृक्षलागवडीतील रोपे, वृक्षांना पाणी स्त्रोत कायम ठेवण्यासाठी आमदार, खासदारांना निधी द्यावा लागणार आहे. तसे बंधन शासनाने घातले आहे.   राज्यात असे असेल वृक्षलागवडीचे 'टार्गेट'अमरावती-४२,३६,९००, अकोला-२८,९६,५००, वाशिम-२२,८३,५००, यवतमाळ-५८,६४,८५०, बुलडाणा-३९,९८,१५०, नाशिक-६४,९६,०५०, अहमदनगर-५५,६३,८५०, धुळे-२४,७६,१००, जळगाव-५३,४३,१००, नंदूरबार- २४,४४,७००, रत्नागिरी-३७,६२,९००, सिंधुदुर्ग- २३,५८,९००, रायगड-४१,४३,३००, पालघर-२८,२०,९५०, मुंबई सिटी-१,३६,२००, पुणे- ७६,०२,८००, सोलापूर-५४,३२,३५०, सातारा-६३,७६,७५०, सांगली-४५,०१,३५०, कोल्हापूर-५१,४०,४००, औरंगाबाद-५७,९५,४५०, जालना-६४,८४,४५०, बीड-५७,६०,३५०, परभणी-६४,८५,७५०, हिंगोली-३१,०८,७००, लातूर-६,२२,८५०, नांदेड-५८,५४,४००, नागपूर-५०,९६,३००, वर्धा- ५७,६२,२००, गोंदिया-३१,८१,२५०, चंद्रपूर-५७,०२,३५०, गडचिरोली-२१,८५,९००, भंडारा- २४,४३,८०० असा 'टार्गेट' देण्यात आला आहे.       ३३ कोटी वृक्षलागवडीच्या अनुषंगाने तयारी आरंभली आहे. दुष्काळी भागात वृक्ष जगविणे मोठे आव्हान आहे. तथापि, खासदार, आमदारांना रोपे आणि वृक्षांना पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी निधीची मागणी वजा विनंती केली जाईल.  - प्रवीण चव्हाण,   मुख्य वनसंरक्षक, अमरावती वनवृत्त (प्रादेशिक)

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार