शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

 ३३ कोटी वृक्षलागवडीचे ड्रोन शूटिंग, स्पॉट फोटोग्रॉफी, १ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 17:28 IST

राज्य शासनाने यंदा ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्टपूर्तीसाठी कृती आराखडा तयार केला आहे. तब्बल तीन महिन्यांपर्यंत ही मोहीम चालणार असून, यावेळी वृक्षलागवड मोहिमेचे ड्रोन शूटिंग, स्पॉट फोटोग्राफी केली जाणार आहे.

- गणेश वासनिक अमरावती - राज्य शासनाने यंदा ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्टपूर्तीसाठी कृती आराखडा तयार केला आहे. तब्बल तीन महिन्यांपर्यंत ही मोहीम चालणार असून, यावेळी वृक्षलागवड मोहिमेचे ड्रोन शूटिंग, स्पॉट फोटोग्राफी केली जाणार आहे. ही सर्व माहिती वेबसाईटवर अपलोड करणे अनिवार्य आहे.१ जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ या काळात ३३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमाचा बिगूल वाजला. ही वृक्षलागवड जनचळवळ होण्याच्या अनुषंगाने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रयत्न सुरू आहे. प्रधान मुख्य वनसचिव विकास खारगे यांनी राज्यात सर्वच विभागात बैठका घेऊन वृक्षलागवडीचे नियोजन चालविले आहे. वनविभाग, सामाजिक वनिकरण आणि इतर शासकीय, प्रशासकीय ४६ यंत्रणांच्या सहकार्याने ३३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्णत्वास जाणार आहे. त्याकरिता ३३ जिल्हानिहाय वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक यांच्याकडे या मोहिमेची विशेषत्ववाने धुरा सोपविली आहे. रोपे जगविणे, रोपांची आॅनलाईन मागणी नोंदविणे, यंत्रणेला रोपे पुरविणे, वृक्षलागवडीसाठी जागेची तरतूद करणे आदी बाबी पूर्ण कराव्या लागणार आहेत. यावेळी रेशीम उद्योग विभागाच्या जागेवर वृक्षलागवडीचे नियोजन केले आहे.  आमदार, खासदारांवर रोपे जगविण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाने ३३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमात सहभागी व्हावे, यासाठी वनविभागाने जोरदार तयारी चालविली आहे. दुष्काळी भागात यापूर्वीच्या १३ कोटी वृक्ष लागवडीत झाडे जगविण्याची जबाबदारी आमदार, खासदारांवर सोपविली जाणार आहे. येत्या उन्हाळ्यात वृक्ष जगविणे मोठे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील वृक्षलागवडीतील रोपे, वृक्षांना पाणी स्त्रोत कायम ठेवण्यासाठी आमदार, खासदारांना निधी द्यावा लागणार आहे. तसे बंधन शासनाने घातले आहे.   राज्यात असे असेल वृक्षलागवडीचे 'टार्गेट'अमरावती-४२,३६,९००, अकोला-२८,९६,५००, वाशिम-२२,८३,५००, यवतमाळ-५८,६४,८५०, बुलडाणा-३९,९८,१५०, नाशिक-६४,९६,०५०, अहमदनगर-५५,६३,८५०, धुळे-२४,७६,१००, जळगाव-५३,४३,१००, नंदूरबार- २४,४४,७००, रत्नागिरी-३७,६२,९००, सिंधुदुर्ग- २३,५८,९००, रायगड-४१,४३,३००, पालघर-२८,२०,९५०, मुंबई सिटी-१,३६,२००, पुणे- ७६,०२,८००, सोलापूर-५४,३२,३५०, सातारा-६३,७६,७५०, सांगली-४५,०१,३५०, कोल्हापूर-५१,४०,४००, औरंगाबाद-५७,९५,४५०, जालना-६४,८४,४५०, बीड-५७,६०,३५०, परभणी-६४,८५,७५०, हिंगोली-३१,०८,७००, लातूर-६,२२,८५०, नांदेड-५८,५४,४००, नागपूर-५०,९६,३००, वर्धा- ५७,६२,२००, गोंदिया-३१,८१,२५०, चंद्रपूर-५७,०२,३५०, गडचिरोली-२१,८५,९००, भंडारा- २४,४३,८०० असा 'टार्गेट' देण्यात आला आहे.       ३३ कोटी वृक्षलागवडीच्या अनुषंगाने तयारी आरंभली आहे. दुष्काळी भागात वृक्ष जगविणे मोठे आव्हान आहे. तथापि, खासदार, आमदारांना रोपे आणि वृक्षांना पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी निधीची मागणी वजा विनंती केली जाईल.  - प्रवीण चव्हाण,   मुख्य वनसंरक्षक, अमरावती वनवृत्त (प्रादेशिक)

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार