शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

"किल्ल्यावर दारू पिणं अत्यंत निंदनीय"; पन्हाळ्यावरील दारूपार्टीबाबत संभाजीराजे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 14:35 IST

Sambhaji Raje : पन्हाळगडावर असलेल्या झुणका भाकर केंद्रामध्ये काही पर्यटकांनी दारू पार्टी केली. ही घटना समोर येताच खळबळ उडाली. यावर आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले पन्हाळगडावर पर्यटकांची ओली पार्टी रंगल्याची घटना समोर आली. या पार्टीचा एक व्हिडीओही सध्या समोर आला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर शिवभक्तांमधून संताप व्यक्त केला जात आहे. शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्यानs किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी असते. पन्हाळगडावर असलेल्या झुणका भाकर केंद्रामध्ये काही पर्यटकांनी दारू पार्टी केली. याचा एक व्हिडीओही समोर आला. ही घटना समोर येताच खळबळ उडाली. यावर आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

"कुठल्याही किल्ल्यावर दारू पिणं हे अत्यंत निंदनीय आहे. यासाठी एका सिस्टीमची गरज आहे" असं म्हटलं आहे. संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे यांची दिल्लीमध्ये भेट झाली. दिल्लीमधील महाराष्ट्र सदनात या दोघांमध्ये गळाभेट झाली. राज्यातील गडकिल्ल्यांसंदर्भात संभाजीराजे हे देवेंद्र फडणवीसांकडे गेले होते. "गड-किल्ल्यांचे प्रश्न मी त्यांच्यासमोर मांडले. कुठल्याही किल्ल्यावर दारू पिणं हे निंदनीय आहे. यासाठी एका सिस्टीमची गरज आहे. मी उद्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे आणि त्या चर्चेनंतर पुढील रुपरेषा ठरेल" असं संभाजीराजे छत्रपती यांनी पन्हाळा किल्ल्यावरील व्हिडीओबाबत म्हटलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

काही दिवसांपूर्वी पन्हाळा गडाची तटबंदी काही बुरुज ढासळले असून अनेक ठिकाणी भेगा पडत आहेत. त्यामुळे पन्हाळगडाकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनबाबत शिवप्रेमी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय पुरातत्व विभागाला पत्र लिहून लक्ष देण्याची विनंती केली होती. 

महाराष्ट्रातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक असलेल्या आणि करवीर छत्रपतींची राजधानी म्हणून ओळखला जाणारा किल्ले पन्हाळगड अखेरची घटका मोजत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. किल्ल्याची तटबंदी काही बुरुज ढासळले असून अनेक ठिकाणी भेगा पडत आहेत. संततधार पावसाने पन्हाळा किल्ल्याच्या चार दरवाजाला लागून असलेल्या ऐतिहासिक भिंतीचा काही भाग कोसळला आहे. मागीलवर्षीही याच जागेजवळ भिंतीचा काही भाग कोसळला होता, मात्र निधीअभावी दुरुस्तीची कामे झाली नाहीत. 

महाराष्ट्रातील शिवरायांनी बांधलेल्या अनेक किल्ल्यांची सातत्याने पडझड होत आहे. मात्र पुरातत्व विभाग, महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने शिवभक्त हे चांगलेच नाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या अनेक किल्ल्यांची सातत्यानं पडझड होत आहे. मात्र त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्यानं शिवभक्तांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.  

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूरFortगड