शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

हायवेवरील दारूबंदीमुळे ड्रंक अँड ड्राइव्हमध्ये 40 टक्के घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 17:51 IST

हायवेवरील दारूबंदीच्या या निर्णयानंतर दारू पिऊन गाडी चालविण्याने होणाऱ्या अपघातांच्या संख्येत घट झाल्याची माहिती समोर येते आहे.

ठळक मुद्दे हायवेवरील दारूबंदीच्या या निर्णयानंतर दारू पिऊन गाडी चालविण्याने होणाऱ्या अपघातांच्या संख्येत घट झाल्याची माहिती समोर येते आहे.1 एप्रिल ते 30 जूनच्या दरम्यान दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ४० टक्क्यांनी घटल्याचं समोर आलं आहे यावर्षीच्या एप्रिल ते जून या कालावधीत दारूच्या नशेत गाडी चालविणाऱ्यांची संख्या 40 टक्क्याने घटल्यामुळे अपघाती मृत्यू तसंच जखमींचा आकडासुद्धा 11 ते 14 टक्क्यांनी घटला आहे

मुंबई, दि. 31- हायवेपासून 500 मीटरपर्यंत दारूबंदी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे परिणाम दिसायला लागले आहेत. हायवेवरील दारूबंदीच्या या निर्णयानंतर दारू पिऊन गाडी चालविण्याने होणाऱ्या अपघातांच्या संख्येत घट झाल्याची माहिती समोर येते आहे. 1 एप्रिल ते 30 जूनच्या दरम्यान दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 40 टक्क्यांनी घटल्याचं समोर आलं आहे. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे. यावर्षीच्या एप्रिल ते जून या कालावधीत दारूच्या नशेत गाडी चालविणाऱ्यांची संख्या 40 टक्क्याने घटल्यामुळे अपघाती मृत्यू तसंच जखमींचा आकडासुद्धा 11 ते 14 टक्क्यांनी घटला आहे.  राज्य पोलिसांनी जमा केलेल्या माहितीनुसार हायवेवर होणाऱ्या किरकोळ अपघातांची संख्याही 21 टक्क्यांनी घटली आहे.

'हायवेवरील दारूबंदीचाच हा परिणाम आहे, असा आताच निष्कर्ष काढणं योग्य होणार नाही. पण हायेवरील दारूबंदीचा हा सकारात्मक परिणाम झाला आहे. यासाठी पोलिसांनीही मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली आहे. हॉटेलांमध्ये अल्को-बुथ्स उभारून गाडी चालवण्याआधी चालकांची रक्तातली अल्कोहोल पातळी पाहण्याच्या मोहिमेचाही फायदा झाला आहे, असं वाहतूक विभागाचे पोलीस सहआयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे. 

राज्य पोलीस विभागातील अधिकारी ज्यांनी रस्त्यावरील अपघात आणि दारू पिऊन गाडी चालवणं यासगळ्याचा अभ्यास केला आहे, त्यांच्या माहितीनुसार अपघातांची आणि जखमींची संख्या घटणं हे फक्त दारूबंदीमुळे झालेलं नाही. 'अपघातांच्या आकडेवारीचे बारकाईने निरीक्षण केलं तर घटलेली संख्या राज्याच्या शहरातली तसंच निमशहरातली आहे. तिथे राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग कमी आहेत. त्यामुळे दारुबंदीचाच हा परिणाम आहे, असं म्हणता येणार नाही. शिवाय या मार्गांवरील ढाब्यांवर अजूनही दारू मिळते,' असं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. 

उत्पादन शुल्क विभागातील सुत्रांच्या माहितीनुसार, हायवेवरील दारूबंदीमुळे बेकायदा दारू पुरवणाऱ्यांच्या ठिकाणांवर धाडी टाकल्या तर दारू पिऊन गाडी चालविणाऱ्यांची संख्या तसंच अपघातांची संख्या आणखी घटेल.शासनाच्यावतीने १ एप्रिलपासून हायवेवर असलेल्या ५०० मीटरच्या आतमधील रेस्टॉरंट, ढाबा, बीअर बार, बीअर शॉप यांना सील ठोकण्यात आलं आहे.