शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
3
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
4
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
5
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
6
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
7
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
8
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
9
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
10
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
11
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
12
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
13
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
14
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
15
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
16
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
17
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
18
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
19
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
20
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला

लोकलच्या फेऱ्या वाढणे स्वप्नच

By admin | Updated: December 27, 2016 02:07 IST

दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या प्रवासी संख्येमुळे लोकलचा प्रवास असह्य होत आहे. त्यामुळे प्रवाशांकडून लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी केली जाते. गेल्या सहा वर्षांत वाढीव लोकल

मुंबई : दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या प्रवासी संख्येमुळे लोकलचा प्रवास असह्य होत आहे. त्यामुळे प्रवाशांकडून लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी केली जाते. गेल्या सहा वर्षांत वाढीव लोकल फेऱ्यांची माहिती घेतल्यास फक्त ८७ फेऱ्याच वाढल्याचे समोर आले आहे. सध्या तरी आणखी लोकल फेऱ्या वाढवणे अशक्य असून त्या वाढवल्यास लोकलच्या वक्तशीरपणावरही परिणाम होण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जाते. त्यामुळे मध्य रेल्वेला प्रवासी भार अधिक सहन करावा लागणार आहे.नऊ डब्यांच्या लोकल १२ व १२ डब्यांच्या लोकल १५ डबा करणे, तसेच ठाणे ते कुर्ला पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण करता अन्य कोणतेही मोठे प्रकल्प मध्य रेल्वेवर झालेले नाहीत. या कामांमुळे लोकलचा प्रवास थोडाफार सुसह्य होईल, अशी आशा होतील. परंतु तसे होताना दिसले नाही. उलट प्रवासी संख्या वाढतच जात असल्याने प्रवास करणेही जिकिरीचे होत आहे. त्यामुळे लोकल सुटण्याच्या वेळेत बदल करणे, थांबे वाढवणे इत्यादी नियोजनही रेल्वेकडून केले जात आहे. यात रेल्वेकडून लोकल फेऱ्या वाढवण्याचे नियोजन मात्र मोठ्या प्रमाणात केले जात नाही.- वाढीव फेऱ्यांच्या तुलनेत प्रवासी संख्या पाहिल्यास वाढीव फेऱ्यांची संख्या अल्पच आहे. २0१0-११ मध्ये दररोज ३८ लाख ३५ हजार प्रवासी लोकलमधून प्रवास करत होते. हाच आकडा आता ४१ लाख ४ हजार एवढा झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सर्वाधिक वाढीव फेऱ्यांचा लाभ हा मध्य रेल्वेच्या मेन लाइनला मिळाला. हार्बर आणि ट्रान्स हार्बर दुर्लक्षितच राहिले.- जास्तीत जास्त लोकल फेऱ्या वाढवणे कठीण असल्याचे मत रेल्वेचे अधिकारी व्यक्त करतात. पश्चिम रेल्वे १,३00 लोकल फेऱ्या चालवत असून मध्य रेल्वे जवळपास १,६६0 पेक्षा जास्त फेऱ्या दिवसभरात चालवते. त्यातच उपनगरीय मार्गांवर मेल-एक्स्प्रेस धावतात. त्यामुळे फेऱ्या वाढवल्यास त्याचे नियोजन करताना बरीच धावपळ रेल्वे प्रशासनाची उडेल. त्याच्या वक्तशीरपणावरही हळूहळू परिणाम होऊ शकतो.- मध्य रेल्वेवर सध्या १२२ लोकलच्या १,६६0 फेऱ्या दिवसभरात होतात. - २0११ मध्ये याच फेऱ्या १ हजार ५७३ एवढ्या होत्या.- २0११ ते २0१६ पर्यंत पाहिल्यास फक्त ८७ फेऱ्याच वाढल्या आहेत.२0१0-११ पासून हार्बर मार्गावर १0 फेऱ्यांची भर पडली.ट्रान्स हार्बर मार्गावर २४ फेऱ्याच वाढल्या.तर मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर सर्वाधिक ५३ फेऱ्याच वाढल्या. मेन लाइनवर वाढलेल्या फेऱ्यांमध्ये कुर्ला ते कल्याण, बदलापूर, आसनगाव, कर्जत, टिटवाळाचा समावेश आहे.प्रवासी व फेऱ्यावर्षफेऱ्याप्रवासी २0१0-१११,७५३३८,३५,३४२२0११-१२१,५७८३९,२५,४७९२0१२-१३१,५९६३९,६३,९७३२0१३-१४१,६१८४0,२३,0१४२0१४-१५१,६४0४0,४९,३१५२0१५-१६१,६६0४0,३५,८४९२0१६-१७१,६६0४१,0४,३२२