शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
6
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
7
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
8
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
9
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
10
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
11
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
12
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
13
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
14
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
15
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
16
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
17
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
18
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
19
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
20
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 

वन रँक वन पेन्शनवर तोडगा काढा - उद्धव ठाकरे

By admin | Published: August 17, 2015 9:59 AM

निवृत्त जवानांना पोलिसांचा लाठीमार सोसावा लागतो, हे क्लेशदायक असून मोदी सरकारने वन रँक वन पेन्शनच्या प्रश्नावर तातडीने निकाल काढावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १७ - पाकिस्तानच्या गोळ्या झेलणा-या भारतीय सैन्यातील निवृत्त जवानांना आता स्वराज्यातील पोलिसांचा लाठीमार सोसावा लागतो, हे क्लेशदायक असून मोदी सरकारने वन रँक वन पेन्शनच्या प्रश्नावर तातडीने निकाल काढावा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 
वन रँक वन पेन्शनच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यात मोदी सरकार अद्याप अपयशी ठरले असून या प्रश्नावरुन निवृत्त जवानांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला फटकारले आहे. ज्यांनी स्वातंत्र राखण्यासाठी बलिदान दिले त्यांना स्वातंत्र्या दिनीच पोलिसांकडून धक्काबुक्की होणे अयोग्य आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.  होता. रामेदवबाबा यांच्यावरील पोलिस कारवाईविरोधात मनमोहन सिंग सरकारला आरोपीच्या पिंज-यात उभे करणारे आता सत्तेवर असून आता त्यांचेच दांडे जवानांना सोसावे लागते ही दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. खासदार, आमदार त्यांचे वेतन भत्ते वाढवून घेतात, सरकारी कर्मचारीही महागाई भत्ता वाढवून घेतात, पण कठीण परिस्थितीतही देशाचे रक्षण करणा-या जवानांच्या मागण्यांवर विचार करण्याऐवजी चालढकल केली जाते अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मोदी सरकारला निवडून आणण्यात माजी जवानांनीही मोलाची भूमिका बजावली होती, निवडणुकीपूर्वी वन रँक वन पेन्शनवर तोडगा काढू असे आश्वासन मोदींनी दिले होते, आता हे आश्वासन तातडीने पूर्ण करावे अशी मागणीही त्यांनी केली.