शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

Corona Virus : दिलासादायक स्थिती, गेल्या सात महिन्यांत राज्यातील मासिक मृत्यूंमध्ये कमालीची घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 07:54 IST

Corona Virus : राज्यात एप्रिल महिन्यात २९ हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली होती, मात्र आता १ ते २७ आक्टोबर या काळात हाच मृत्यूंचा आकडा ७३६ वर आला आहे.

मुंबई : कोरोनाच्या दोन लाटांच्या तडाख्यानंतर आता राज्यासह मुंबईतील कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांचा आकडा २० हजारांच्या खाली आहे. मागील सात महिन्यातील राज्यातील मासिक मृत्यूंमध्येही मोठी घट झाली असून हे प्रमाण आता हजारांच्या आत आल्याची दिलासादायक स्थिती आहे.राज्यात एप्रिल महिन्यात २९ हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली होती, मात्र आता १ ते २७ आक्टोबर या काळात हाच मृत्यूंचा आकडा ७३६ वर आला आहे. तसेच, एप्रिल महिन्यात १.६५ टक्के मृत्युदराची नोंद झाली होती, हे प्रमाणही आता कमी झाले असून सध्याचा मासिक मृत्युदर १.३९ टक्के आहे. राज्यातील रुग्णसंख्येचा आलेखही महिन्यागणिक उतरता असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या कोरोनाविषयक अहवालातून समोर आली आहे. राज्यात एप्रिल २०२१ मध्ये १,७८,४०६ रुग्णांचे निदान झाले होते, १ ते २७ ऑक्टोबर या काळात हे प्रमाण ५३,०५६ वर आले आहे. याविषयी राज्याच्या आरोग्य विभागाचे साथ सर्वेक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, दैनंदिन बाधितांचे प्रमाणही जवळपास दोन टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. प्रतिदिन जवळपास दीड लाख चाचण्या केल्या जात असून यात १५०० ते १८०० रुग्णांचे नव्याने निदान होत आहे. ही गेल्या वर्षी मे नंतरची सर्वात कमी रुग्णसंख्या असून संसर्गाचा प्रसार मागच्या काही दिवसांपासून नक्कीच कमी झाला आहे. परंतु जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बाधितांचे प्रमाण हे पाच टक्क्यांहून कमी असणे म्हणजे साथ नियंत्रणाखाली आहे, असे म्हणतात. 

राज्यात लसीकरणात पाच जिल्हे आघाडीवरराज्याने नुकताच नऊ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे, तर दुसरीकडे दोन्ही लस घेतलेल्या लाभार्थींच्या संख्येनेही तीन कोटींचा पल्ला गाठला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत राज्यात पाच जिल्हे आघाडीवर असून, या पाच जिल्ह्यात सुमारे एकूण ४५ टक्के लसीकरण पार पडले आहे. यात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

राज्यात एकूण सहा कोटी ६१ लाख ३३ हजार ८८६ लाभार्थींनी लसीचा पहिला डोस घेतला असून, तीन कोटी एक लाख ४९ हजार ६६५ लाभार्थींनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. देशपातळीवर लसीकरणात उत्तर प्रदेश आघाडीवर असून, त्याखालोखाल राज्याने स्थान मिळविले आहे. राज्यात जून महिन्यात सरासरी तीन लाख ३२ हजार १४४ दैनंदिन मात्रा देण्यात आल्या, तर हे प्रमाण जुलै महिन्यात तीन लाख ९१ हजार ७१४ इतके होते. 

आगस्ट महिन्यात चार लाख ६७ हजार २२२, सप्टेंबर महिन्यात सात लाख ६० हजार ९५५ आणि १ ते २६ ऑक्टोबरदरम्यान ५ लाख ५३ हजार ३८४ दैनंदिन मात्रा दिल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात १८ पेक्षा अधिक वयाच्या लोकसंख्येपैकी कमीत कमी एक डोस दिला गेलेल्या लाभार्थींचे प्रमाण ७२.३३ टक्के आहे, तर १८ - ४४ वयोगटातील लोकसंख्येपैकी कमीत कमी एक डोस दिलेल्या नागरिकांचे प्रमाण ६३.६५ टक्के आहे. याखेरीज, ४५हून अधिक वय असणाऱ्या कमीत कमी एक डोस दिलेल्या नागरिकांचे प्रमाण ७६.४६ टक्के आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस