शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

Corona Virus : दिलासादायक स्थिती, गेल्या सात महिन्यांत राज्यातील मासिक मृत्यूंमध्ये कमालीची घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 07:54 IST

Corona Virus : राज्यात एप्रिल महिन्यात २९ हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली होती, मात्र आता १ ते २७ आक्टोबर या काळात हाच मृत्यूंचा आकडा ७३६ वर आला आहे.

मुंबई : कोरोनाच्या दोन लाटांच्या तडाख्यानंतर आता राज्यासह मुंबईतील कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांचा आकडा २० हजारांच्या खाली आहे. मागील सात महिन्यातील राज्यातील मासिक मृत्यूंमध्येही मोठी घट झाली असून हे प्रमाण आता हजारांच्या आत आल्याची दिलासादायक स्थिती आहे.राज्यात एप्रिल महिन्यात २९ हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली होती, मात्र आता १ ते २७ आक्टोबर या काळात हाच मृत्यूंचा आकडा ७३६ वर आला आहे. तसेच, एप्रिल महिन्यात १.६५ टक्के मृत्युदराची नोंद झाली होती, हे प्रमाणही आता कमी झाले असून सध्याचा मासिक मृत्युदर १.३९ टक्के आहे. राज्यातील रुग्णसंख्येचा आलेखही महिन्यागणिक उतरता असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या कोरोनाविषयक अहवालातून समोर आली आहे. राज्यात एप्रिल २०२१ मध्ये १,७८,४०६ रुग्णांचे निदान झाले होते, १ ते २७ ऑक्टोबर या काळात हे प्रमाण ५३,०५६ वर आले आहे. याविषयी राज्याच्या आरोग्य विभागाचे साथ सर्वेक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, दैनंदिन बाधितांचे प्रमाणही जवळपास दोन टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. प्रतिदिन जवळपास दीड लाख चाचण्या केल्या जात असून यात १५०० ते १८०० रुग्णांचे नव्याने निदान होत आहे. ही गेल्या वर्षी मे नंतरची सर्वात कमी रुग्णसंख्या असून संसर्गाचा प्रसार मागच्या काही दिवसांपासून नक्कीच कमी झाला आहे. परंतु जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बाधितांचे प्रमाण हे पाच टक्क्यांहून कमी असणे म्हणजे साथ नियंत्रणाखाली आहे, असे म्हणतात. 

राज्यात लसीकरणात पाच जिल्हे आघाडीवरराज्याने नुकताच नऊ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे, तर दुसरीकडे दोन्ही लस घेतलेल्या लाभार्थींच्या संख्येनेही तीन कोटींचा पल्ला गाठला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत राज्यात पाच जिल्हे आघाडीवर असून, या पाच जिल्ह्यात सुमारे एकूण ४५ टक्के लसीकरण पार पडले आहे. यात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

राज्यात एकूण सहा कोटी ६१ लाख ३३ हजार ८८६ लाभार्थींनी लसीचा पहिला डोस घेतला असून, तीन कोटी एक लाख ४९ हजार ६६५ लाभार्थींनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. देशपातळीवर लसीकरणात उत्तर प्रदेश आघाडीवर असून, त्याखालोखाल राज्याने स्थान मिळविले आहे. राज्यात जून महिन्यात सरासरी तीन लाख ३२ हजार १४४ दैनंदिन मात्रा देण्यात आल्या, तर हे प्रमाण जुलै महिन्यात तीन लाख ९१ हजार ७१४ इतके होते. 

आगस्ट महिन्यात चार लाख ६७ हजार २२२, सप्टेंबर महिन्यात सात लाख ६० हजार ९५५ आणि १ ते २६ ऑक्टोबरदरम्यान ५ लाख ५३ हजार ३८४ दैनंदिन मात्रा दिल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात १८ पेक्षा अधिक वयाच्या लोकसंख्येपैकी कमीत कमी एक डोस दिला गेलेल्या लाभार्थींचे प्रमाण ७२.३३ टक्के आहे, तर १८ - ४४ वयोगटातील लोकसंख्येपैकी कमीत कमी एक डोस दिलेल्या नागरिकांचे प्रमाण ६३.६५ टक्के आहे. याखेरीज, ४५हून अधिक वय असणाऱ्या कमीत कमी एक डोस दिलेल्या नागरिकांचे प्रमाण ७६.४६ टक्के आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस