शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

Corona Virus : दिलासादायक स्थिती, गेल्या सात महिन्यांत राज्यातील मासिक मृत्यूंमध्ये कमालीची घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 07:54 IST

Corona Virus : राज्यात एप्रिल महिन्यात २९ हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली होती, मात्र आता १ ते २७ आक्टोबर या काळात हाच मृत्यूंचा आकडा ७३६ वर आला आहे.

मुंबई : कोरोनाच्या दोन लाटांच्या तडाख्यानंतर आता राज्यासह मुंबईतील कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांचा आकडा २० हजारांच्या खाली आहे. मागील सात महिन्यातील राज्यातील मासिक मृत्यूंमध्येही मोठी घट झाली असून हे प्रमाण आता हजारांच्या आत आल्याची दिलासादायक स्थिती आहे.राज्यात एप्रिल महिन्यात २९ हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली होती, मात्र आता १ ते २७ आक्टोबर या काळात हाच मृत्यूंचा आकडा ७३६ वर आला आहे. तसेच, एप्रिल महिन्यात १.६५ टक्के मृत्युदराची नोंद झाली होती, हे प्रमाणही आता कमी झाले असून सध्याचा मासिक मृत्युदर १.३९ टक्के आहे. राज्यातील रुग्णसंख्येचा आलेखही महिन्यागणिक उतरता असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या कोरोनाविषयक अहवालातून समोर आली आहे. राज्यात एप्रिल २०२१ मध्ये १,७८,४०६ रुग्णांचे निदान झाले होते, १ ते २७ ऑक्टोबर या काळात हे प्रमाण ५३,०५६ वर आले आहे. याविषयी राज्याच्या आरोग्य विभागाचे साथ सर्वेक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, दैनंदिन बाधितांचे प्रमाणही जवळपास दोन टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. प्रतिदिन जवळपास दीड लाख चाचण्या केल्या जात असून यात १५०० ते १८०० रुग्णांचे नव्याने निदान होत आहे. ही गेल्या वर्षी मे नंतरची सर्वात कमी रुग्णसंख्या असून संसर्गाचा प्रसार मागच्या काही दिवसांपासून नक्कीच कमी झाला आहे. परंतु जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बाधितांचे प्रमाण हे पाच टक्क्यांहून कमी असणे म्हणजे साथ नियंत्रणाखाली आहे, असे म्हणतात. 

राज्यात लसीकरणात पाच जिल्हे आघाडीवरराज्याने नुकताच नऊ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे, तर दुसरीकडे दोन्ही लस घेतलेल्या लाभार्थींच्या संख्येनेही तीन कोटींचा पल्ला गाठला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत राज्यात पाच जिल्हे आघाडीवर असून, या पाच जिल्ह्यात सुमारे एकूण ४५ टक्के लसीकरण पार पडले आहे. यात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

राज्यात एकूण सहा कोटी ६१ लाख ३३ हजार ८८६ लाभार्थींनी लसीचा पहिला डोस घेतला असून, तीन कोटी एक लाख ४९ हजार ६६५ लाभार्थींनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. देशपातळीवर लसीकरणात उत्तर प्रदेश आघाडीवर असून, त्याखालोखाल राज्याने स्थान मिळविले आहे. राज्यात जून महिन्यात सरासरी तीन लाख ३२ हजार १४४ दैनंदिन मात्रा देण्यात आल्या, तर हे प्रमाण जुलै महिन्यात तीन लाख ९१ हजार ७१४ इतके होते. 

आगस्ट महिन्यात चार लाख ६७ हजार २२२, सप्टेंबर महिन्यात सात लाख ६० हजार ९५५ आणि १ ते २६ ऑक्टोबरदरम्यान ५ लाख ५३ हजार ३८४ दैनंदिन मात्रा दिल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात १८ पेक्षा अधिक वयाच्या लोकसंख्येपैकी कमीत कमी एक डोस दिला गेलेल्या लाभार्थींचे प्रमाण ७२.३३ टक्के आहे, तर १८ - ४४ वयोगटातील लोकसंख्येपैकी कमीत कमी एक डोस दिलेल्या नागरिकांचे प्रमाण ६३.६५ टक्के आहे. याखेरीज, ४५हून अधिक वय असणाऱ्या कमीत कमी एक डोस दिलेल्या नागरिकांचे प्रमाण ७६.४६ टक्के आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस