शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
3
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
4
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
5
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
6
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
7
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
8
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
9
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
10
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
11
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
12
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
13
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
14
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
15
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
16
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
17
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
18
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
19
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
20
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

"राजकारण संपलं वाटतानाच देवेंद्र फडणवीसांचा एक फोन अन् केंद्रात मंत्रिपद मिळालं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 10:32 IST

गोपीनाथ मुंडे यांचा मत्यू झाल्यानंतर आपले राजकारण संपले असे वाटत असतांनाच २०१७-१८ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष केले.

नाशिक - स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी मला राजकारणात आणले, त्यांच्या मृत्यूनंतर आपले राजकारण संपले असे वाटत असतांना एके दिवशी देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला आणि त्यांनी बायोडाटा मागितला. दुसऱ्या दिवशी राज्यसभेसाठी अर्ज भरायचा असल्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निरोप त्यांनी दिला. राज्यसभेत बिनविरोध निवडून आलो आणि केंद्रीय मंत्री म्हणून वर्णी लागली, असा प्रवास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी उलगडला. त्यावेळी मंत्रीपदासाठी चर्चेत असलेल्या खासदार प्रीतम मुंडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या.

नाशिकमध्ये आयोजित वंजारी युवा सन्मान सोहळ्याप्रसंगी डॉ. कराड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला उजाळा दिला. असोसिएशन ऑफ वुई प्रोफेशनल्स तर्फे आयोजित राज्यस्तरीय वंजारी युवा सन्मान पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने ते बोलत होते. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी आपणाला राजकारणात आणले. १९९७ मध्ये त्यांनीच उपमहापौर केले, १९९९ मध्ये महापौरही केले. २००६ साली पुन्हा संभाजीनगरचा महापौर झालो.

दुर्दैवाने, गोपीनाथ मुंडे यांचा मत्यू झाल्यानंतर आपले राजकारण संपले असे वाटत असतांनाच २०१७-१८ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष केले. कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेले हे पद असल्याने आता यापेक्षा मोठे पद मिळणार नाही, असे वाटत होते. परंतु २०१९ मध्ये फडणवीस यांनी पुन्हा फोन करून बायोडाटा मागवून घेतला. तो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठविला. त्यानंतर दिल्लीतून बोलावणे आले आणि राज्यसभा आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपद मिळाले, असा प्रवास कराड यांनी उलगडला.

स्मार्ट मेहनत आणि प्रामाणिक कामाबरोबरच जिद्द ठेवली तर यश नक्कीच मिळते असे सांगताना कराड यांनी समाजाचा अभिमान प्रत्येकाला असलाच पाहिजे. यश मिळाल्यानंतर मागे वळून पहावे आणि जनमाणसात राहिले पाहिजे, असा सल्ला त्यांनी उपस्थित तरुणांना दिला.

डिजिटल करन्सीला प्राधान्यकार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलतांना डॉ. कराड यांनी केंद्राच्या धोरणानुसार डिजिटल करन्सीला प्राधान्य दिले जात असल्याचे सांगितले. डिजिटल' करन्सीमुळे सुरक्षितता वाढून आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकार कमी होतीलच, शिवाय नोटांच्या छपाईवरील खर्च कमी होणार असल्याचे सांगितले. नोट प्रे कामगारांची नाराजी असेल तर त्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBhagwat Karadडॉ. भागवतAmit Shahअमित शाह