शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राष्ट्रवादीत डॉ. अमोल कोल्हेंना बढती मिळणार; अजित पवारांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 10:43 IST

आमदार, खासदाराने दारोदारी फिरून पान टपऱ्यांवर बसून गप्पा मारायच्या का, असा सवालही अजित पवार यांनी केली. दिल्लीत ते त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत, अशा शब्दांत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.

मुंबई - शिरुर मतदार संघातील नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयासाठी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांनी अथक प्रयत्न केले. परंतु, या दोघांवर पोलिसांकडून अटक होण्याचे संकट असताना खासदार कोल्हे यांनी अद्याप मौन बाळगले आहे. यावरून शिरुर मतदार संघातील मोहिते पाटील आणि बांदल यांचे कार्यकर्ते संतापले होते. परंतु, या संतापलेल्या कार्यकर्त्यांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योग्य संदेश दिला असून डॉ. अमोल कोल्हे चांगलं काम करत असल्याचे म्हटले.

खासदार कोल्हे यांनी मोहिते पाटील आणि बांदल यांच्या अटकेच्या कारवाईवर अद्याप प्रतिक्रिया दिली नाही. तर पक्षाने देखील याकडे फारसे लक्ष दिले नाही. तर खासदार कोल्हे देखील लोकसभा निवडणुकीनंतर मतदार संघात फिरकले नसल्याच्या तक्रारी कार्यकर्ते करत आहेत. यावर अजित पवारांनी कार्यकर्त्यांना चांगलेच सुनावले.

नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे दिल्लीत चांगलं काम करत आहेत. ते केवळ शिरुर किंवा भोसरीपुरते मर्यादित नाहीत. त्यामुळे स्थानिकांनी आरडाओरड करू नका. आमदार, खासदाराने दारोदारी फिरून पान टपऱ्यांवर बसून गप्पा मारायच्या का, असा सवालही अजित पवार यांनी केली. दिल्लीत ते त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत, अशा शब्दांत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. निवडणूक प्रचारात ते शरद पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे यांच्या बरोबरीने काम करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे शिरुरमधून अमोल कोल्हे यांच्याविरुद्धचा सूर आता शमणार हे मात्र निश्चित आहे.