शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

मुजोर रिक्षाचालकांविरोधात डोंबिवलीकरांचा व्हॉट्सअॅप ग्रुप

By admin | Updated: July 6, 2017 18:30 IST

जवळचे भाडे नाकारणे, मनात येइल तेव्हाच रस्त्यावर गाड्या धावणे, यासह प्रवाशांशी उद्धट वर्तन करणे, मनमानी भाडी आकारणे अशा काही रिक्षाचालकांच्या उद्दाम

- अनिकेत घमंडी/ऑनलाइन लोकमत
 
डोंबिवली, दि. 06 - जवळचे भाडे नाकारणे, मनात येइल तेव्हाच रस्त्यावर गाड्या धावणे, यासह प्रवाशांशी उद्धट वर्तन करणे, मनमानी भाडी आकारणे अशा काही रिक्षाचालकांच्या उद्दाम पणाला डोंबिवलीकर वैतागले आहेत. अशा मनमानी कारभार करणा-या रिक्षाचालकांची मुजोरी मोडीत काढण्यासाठी नागरिकांनी एकत्र येत व्हाट्सअ‍ॅप ग्रुप स्थापन केला आहे. त्यावर कोणाला रिक्षा चालकाचा कटू-चांगला अनुभव आल्यास तातडीने तो शेअर करावा, संबंधितांचा तात्काळ योग्य तो समाचार घेण्यात येणार असल्याचा निर्धार करण्यात आला आहे.
दोन दिवसांपासून या गृपी चर्चा सुरु झाली आणि बुधवारी संध्याकाळपर्यंत सुमारे अडीचशेहून अधिक सदस्यांनी हा ग्रुप स्विकारत आपापली मते स्पष्ट केली. ज्या सदस्यांनी एकत्र येत हा ग्रुप स्थापन केला, त्यांनी तातडीने एक बैठक लावावी असे आवाहन करण्यात आले. त्यात केवळ रिक्षाचालकच नव्हे तर मुजारी करणारे कोणीही वाहनचालक असो त्यांची मुजोरी मोडीत काढण्यात यावी याबद्दल सगळयांचे एकमत झाले. एवढेच नव्हे तर वाहन चालकांची कार्यशाळा घ्यावी, त्यांना रस्ता वाहतूकीचे नियम सांगावेत तसेच वाहतूक नियंत्रण आणि आरटीओ अधिका-यांशी चर्चा करणे आदी उपक्रम सातत्याने घेण्यात यावेत यावर सगळयांचे एकमत झाले. तसेच जो कोणी वाहनचालक चांगले काम करेल त्यांचा योग्य तो सन्मान करण्यात यावा, चांगुलपणा आणि सामाजिक बांधिलकी या निमित्ताने वाढीस लागावी हा प्रमुख प्रयत्न असेल अशीही सकारात्मक चर्चा ग्रुपवर करण्यात आली. नियमानूसार रिक्षा चालवणे, तीन सीट घेण्यात याव्यात, मीटर पद्धत सुरु करा आदी मत देखिल मांडण्यात आली.
 
- विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय पाठींब्या शिवाय हा चमू स्थापन करण्यात आला आहे. तो अबाधित रहावा असे सर्वानूमते ठरवण्यात आले आहे. त्यात आरटीओ, ट्रॅफिकसह रिक्षा चालक-मालक युनयिन पदाधिका-यांचाही समावेश करण्यात आला असून हळुहळू त्याची व्याप्ती वाढवण्याचे आवाहन एकमेकांना करण्यात येत आहे. त्यातून जनजागृती होईल, आणि जो कोणी उपद्रवी असेल त्याला वेळीच चाप बसेल असा प्रयत्न असल्याचे ठरवण्यात आले.
 
ग्रुपवर लोकमतची चर्चा : बुधवारच्या लोकमतमधील हॅलो ठाणे मध्ये केडीएमटी प्रवाशांच्या मदतीला अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्याची चर्चा दिवसभर ग्रुपवर सुरु होती. नागरिकांनी केवळ बसनेच प्रवास करावा, रिक्षाने प्रवास करु नये असे आवाहन देखिल करण्यात आले. अनेक सदस्यांनी त्यास पाठींबा बसने प्रवास कराच. त्याशिवाय रिक्षाचालकांचा मनमानी कारभार कमी होणार नाही असे परखड मत व्यक्त करण्यात आले.