शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: ''मसुदा नको, पत्र असेल तरच चर्चेला या''; संजय राऊत यांनी ठेवली गडकरींसमोर अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 15:56 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : गडकरी यांनी सकाळीच गरज पडली तर मी मध्यस्थी करण्यासाठी तयार असल्याचे वक्तव्य केले होते.

मुंबई : मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेने भाजपाला खिंडीत पकडले आहे. यामुळे निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 15 दिवस उलटत आले तरीही युतीला सरकार स्थापन करण्यास अपयश आले आहे. यातच भाजपा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावरील चर्चेची अट ठेवत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी फोन करावा, असे सांगितल्याने भाजपाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी मुंबईत दाखल झाले आहेत. 

गडकरी यांनी सकाळीच गरज पडली तर मी मध्यस्थी करण्यासाठी तयार असल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर ते नागपुरहून मुंबईला आले आहेत. यामुळे गडकरी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाणार असल्याचे स्पष्ट होत असतानाच शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गडकरींसमोर मोठी अट ठेवली आहे. 

भाजपा- शिवसेना युतीचे सरकार बनण्यासाठी भाजपाने 50-50 टक्के सत्तेत वाटा देण्याची तयारी दर्शविली आहे. याचा मसुदाही तयार करण्यात आला आहे. हा मसुदा घेऊन नको तर मुख्यमंत्री पदाबाबतचे अधिकृत पत्र असेल तरच गडकरींनी चर्चेला यावे असा इशारा राऊत यांनी गडकरींना दिला आहे. आम्हाला मुख्यमंत्री पदाचे पत्र हवे, असे राऊत यांनी सांगितले आहे.  यामुळे गडकरी नेमके काय घेऊन ठाकरेंशी चर्चा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 दरम्यान, संजय राऊत हे तातडीने राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला आले असून गेल्या आठवडाभरात त्यांनी तिसऱ्यांदा पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट दिली आहे. यामुळे एकीकडे भाजपाचे नेते ठाकरेंकडे जाण्याच्या तयारीत असताना राऊत यांनी पवारांचे निवासस्थान गाठल्याने चर्चेला उधान आले आहे. यातच काही वेळापूर्वी रामदास आठवलेंनी पवार यांची भेट घेतली आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNitin Gadkariनितीन गडकरीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019