शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

"बॅचलर राहू नका..., घरात बायको असली की माणसाचं डोकं शांत राहतं;" तरुणांना उद्देशून ओवेसी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 14:01 IST

धर्मनिरपेक्षतेपासून मुस्लिमांना काय मिळाले? असा प्रश्नही ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) ओवेसी यांनी विचारला आहे...

एआयएमआयएम (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांना राजकीय धर्मनिरपेक्षतेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच राज्य सरकारवरही जोरदार निशाणा साधला आहे. याच वेळी त्यांनी बॅचलर मुलांसंदर्भातही, असे वक्तव्य केले आहे, की ते सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ते महाराष्ट्राची राजधानी मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.

बॅचलर्ससंदर्भात काय म्हणाले ओवेसी -तरुणांमध्ये जोश निर्माण करताना ओवेसी म्हणाले, लग्न करणार ना, बॅचलर (अविवाहित) राहू नका, बॅचलर फार त्रास देत आहेत. बायको घरात असली की माणसाचे डोकेही शांत राहते. खरे तर, ओवेसी मुस्लीम तरुणांना विचारत होते, की त्यांना त्यांच्या मुलांना अशिक्षित आणि गरीबच ठेवायचे आहे का? ते म्हणाले, 'जे तरुण आता 18-19 वर्षांचे आहेत, त्यांचे लवकरच लग्न होईल, त्यांना मुले होतील. यापुढे ओवेसींनी तरुणांना विचारले की, 'लग्न करणार ना? तुमच्या मुलांना त्यांचे हक्क मिळू नयेत, असे तुम्हाला वाटते का?'

धर्मनिरपेक्षतेपासून मुस्लिमांना काय मिळाले? -धर्मनिरपेक्षतेपासून मुस्लिमांना काय मिळाले? असा प्रश्नही ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) ओवेसी यांनी विचारला. ते म्हणाले, आपल्याला नौकऱ्या आणि शिक्षाणात आरक्षण मिळाले नाही, निर्णय घेण्यात आपला वाटा नव्हता, कुठलाही अधिकार नव्हता, धर्मनिरपेक्षता शब्दाने मुस्लिमांचे नुकसानच झाले आहे. महाराष्ट्रात, केवळ 22 टक्के मुस्लीम प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घेतात तर केवळ 4.9 टक्के मुस्लीम पदवीधर आहेत. तसेच, महाराष्ट्रातील 83 टक्के मुस्लीम भूमिहीन आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे हृदय केवळ मराठा समाजासाठीच  धडकते का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. याच बरोबर त्यांनी मुंबईमध्ये कलम 144 लागू करण्यावरही  नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनMumbaiमुंबईMuslimमुस्लीम