शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

'ती वेळ येऊ देऊ नका', संतोष देशमुख प्रकरणावरून जरांगेंचा फडणवीसांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 15:43 IST

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना इशारा दिला आहे. आरोपी सापडत नसल्याबद्दलही जरांगेंनी नाराजी व्यक्त केली. 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली जात असून, यात वाल्मिक कराड यांच्यावरही आरोप केले जात आहे. आरोपींना पकडले जात नसल्याबद्दल मनोज जरांगे यांनी नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. 

परभणी येथील हिंसाचारानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला. पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने हे प्रकरण चांगलेच तापले आहे. मनोज जरांगे यांनी सोमनाथच्या कुटुंबीयांची बुधवारी (२५ डिसेंबर) भेट घेतली. 

माध्यमांशी बोलताना मनोज जरांगेंनी म्हणाले, "तपास जर जनतेने हातात घेतला ना, तर मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना कळेल काय कचका असतो ते... ती वेळ देऊ नका. कारण मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या कॉल्सची माहिती (कोणी कोणाला पाठिंबा दिला आहे. कोणी कोणाला संरक्षण दिलं आहे. कोणत्या मंत्र्यांने, कोणत्या आमदाराने, कोणत्या खासदाराने कोणी काय पाठबळ दिलंय) घ्यायला तुम्हाला २० दिवस लागतात का?", असा सवाल मनोज जरांगेंनी सरकारला केला. 

...तर बंदोबस्त मराठे करतील; मनोज जरांगे

"कुटुंबाची मागणी आहे ना चौकशीची, तर दणादण करायची. का करत नाहीत? त्याचं फळ यांना भोगावं लागेल. कुणाचाही बाप येऊ द्या. मी ते प्रकरण दबू देणार नाही. पूर्ण बाहेर काढणार आहे. तुमच्या चौकशीत जर सापडले नाही किंवा तुम्ही सापडलेले असून जर सोडले, तर बंदोबस्त मराठे करणार", असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. 

"मुख्यमंत्री, गृहमंत्री म्हणून सहज जीव घेणार"

"मी एवढंच सांगतो की, तुम्हाला लागत नसेल, तर जनता तपास लावणार. इतका निर्घृण खून, त्यामुळे सुट्टी नाही. तुम्हाला आरोपी सापडत नाहीत. अरे ते चिलटे आहेत. तुम्हाला ते सापडेनात का? मी जे बोलतो, ते करतो. मी सुट्टी देत नाही. कारण तुम्ही सहज लोकांचे जीव घेत असलात... मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून तुम्ही सहज जीव घेणार... कुठे पैसे देणार, कुठे नोकरी देणार. जीव गेला, न्याय नाही मिळणार कधीच? त्या आरोपीला अटक नाही होणार? कुटुंबाने ज्यांची जाहीरपणे नावे घेतली आहेत, ते तुरुंगातच पाहिजेत. मग कोणी असोत. कोणत्याही पदावर असोत. शासकीय पदावर असो, मंत्रि‍पदावर असो. तो गेलाच पाहिजे, हे मुख्यमंत्र्यांचे काम आहे. नाही गेलं, याचा परिणाम तुम्हाला राज्यात भोगावा लागेल. मी तर सोडणारच नाही", असे मनोज जरांगे म्हणाले.

टॅग्स :BeedबीडManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCrime Newsगुन्हेगारी