शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

इतकी भाबडी अपेक्षा ठेवतील वाटलं नव्हतं; राज ठाकरेंच्या पत्रावर देवेंद्र फडणवीस म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 10:23 IST

हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर राजद्रोहाचा खटला भरण्यापर्यंत राज्य सरकारनं मर्यादा सोडल्या आहेत अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवावे या मागणीसाठी वादंग निर्माण झाल्याचं चित्र आहे. राज ठाकरेंनी इशारा दिल्यानंतर मनसेच्या हजारो कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक नोटीस पाठवून कारवाई करण्यात आली. अनेकांना तडीपार करण्यात आले. त्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(Uddhav Thackeray) पत्र पाठवून सत्तेचं ताम्रपट कुणीही घेऊन आलं नाही अशा शब्दात इशारा दिला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या पत्रावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले की, या सरकारकडून राज ठाकरेंनी वेगळी अपेक्षाच ठेवू नये, इतकी भाबडी अपेक्षा राज ठाकरे ठेवतील असं वाटलं नव्हतं. हे सरकार अक्षरश: लागूनचालन करतंय, हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर राजद्रोहाचा खटला भरण्यापर्यंत मर्यादा सोडल्या आहेत. १२ दिवस खासदार-आमदारांना जेलमध्ये ठेवतात त्या सरकारकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. या सरकारविरोधात आम्ही लढतोय. त्यांनीही लढलं पाहिजे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत उत्तर प्रदेशात राज ठाकरेंना होणाऱ्या विरोधावर त्यांनी भाष्य केले आहे. रामाच्या शरणात जो जात असेल त्याला जाऊ दिले पाहिजे. कुणालाही रोखण्याची गरज नाही असं त्यांनी सांगितले आहे. तसेच मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. शहरात प्रत्येक राज्याचे भवन आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशने एखादं कार्यालय काढलं म्हणून घाबरण्याची गरज नाही. मुंबई आणि महाराष्ट्र पॉवरफूल आहे. मंत्र्यांचा वर्क फ्रॉम जेल सुरू आहे. महाराष्ट्रात अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यामुळे त्याचा फटका राज्याला बसत आहे असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

शरद पवारांनी बहुमूल्य सल्ला उद्धव ठाकरेंना द्यावा

शरद पवारांनी(Sharad Pawar) महाराष्ट्राच्या प्रश्नाकडे अधिक लक्ष दिले तर चांगले होईल. महाराष्ट्रातील शेतकरी, आदिवासी, विद्यार्थी, महिला, बारा-बलुतेदारांच्या प्रश्नांकडे ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार यांनी लक्ष दिले तर ते अधिक बरे होईल.त्यांच्या ‘बहुमूल्य’ सल्ल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला नितांत गरज आहे. देशात मोदी सरकार खूप चांगले काम करत आहे. लोकांचा मोदी सरकारवर विश्वास आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMNSमनसे