शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
4
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
5
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
6
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
7
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
8
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
9
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
10
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
11
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
12
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
13
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
14
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
15
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
16
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
18
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
19
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
20
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख

इतकी भाबडी अपेक्षा ठेवतील वाटलं नव्हतं; राज ठाकरेंच्या पत्रावर देवेंद्र फडणवीस म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 10:23 IST

हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर राजद्रोहाचा खटला भरण्यापर्यंत राज्य सरकारनं मर्यादा सोडल्या आहेत अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवावे या मागणीसाठी वादंग निर्माण झाल्याचं चित्र आहे. राज ठाकरेंनी इशारा दिल्यानंतर मनसेच्या हजारो कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक नोटीस पाठवून कारवाई करण्यात आली. अनेकांना तडीपार करण्यात आले. त्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(Uddhav Thackeray) पत्र पाठवून सत्तेचं ताम्रपट कुणीही घेऊन आलं नाही अशा शब्दात इशारा दिला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या पत्रावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले की, या सरकारकडून राज ठाकरेंनी वेगळी अपेक्षाच ठेवू नये, इतकी भाबडी अपेक्षा राज ठाकरे ठेवतील असं वाटलं नव्हतं. हे सरकार अक्षरश: लागूनचालन करतंय, हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर राजद्रोहाचा खटला भरण्यापर्यंत मर्यादा सोडल्या आहेत. १२ दिवस खासदार-आमदारांना जेलमध्ये ठेवतात त्या सरकारकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. या सरकारविरोधात आम्ही लढतोय. त्यांनीही लढलं पाहिजे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत उत्तर प्रदेशात राज ठाकरेंना होणाऱ्या विरोधावर त्यांनी भाष्य केले आहे. रामाच्या शरणात जो जात असेल त्याला जाऊ दिले पाहिजे. कुणालाही रोखण्याची गरज नाही असं त्यांनी सांगितले आहे. तसेच मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. शहरात प्रत्येक राज्याचे भवन आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशने एखादं कार्यालय काढलं म्हणून घाबरण्याची गरज नाही. मुंबई आणि महाराष्ट्र पॉवरफूल आहे. मंत्र्यांचा वर्क फ्रॉम जेल सुरू आहे. महाराष्ट्रात अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यामुळे त्याचा फटका राज्याला बसत आहे असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

शरद पवारांनी बहुमूल्य सल्ला उद्धव ठाकरेंना द्यावा

शरद पवारांनी(Sharad Pawar) महाराष्ट्राच्या प्रश्नाकडे अधिक लक्ष दिले तर चांगले होईल. महाराष्ट्रातील शेतकरी, आदिवासी, विद्यार्थी, महिला, बारा-बलुतेदारांच्या प्रश्नांकडे ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार यांनी लक्ष दिले तर ते अधिक बरे होईल.त्यांच्या ‘बहुमूल्य’ सल्ल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला नितांत गरज आहे. देशात मोदी सरकार खूप चांगले काम करत आहे. लोकांचा मोदी सरकारवर विश्वास आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMNSमनसे