शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

इतकी भाबडी अपेक्षा ठेवतील वाटलं नव्हतं; राज ठाकरेंच्या पत्रावर देवेंद्र फडणवीस म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 10:23 IST

हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर राजद्रोहाचा खटला भरण्यापर्यंत राज्य सरकारनं मर्यादा सोडल्या आहेत अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवावे या मागणीसाठी वादंग निर्माण झाल्याचं चित्र आहे. राज ठाकरेंनी इशारा दिल्यानंतर मनसेच्या हजारो कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक नोटीस पाठवून कारवाई करण्यात आली. अनेकांना तडीपार करण्यात आले. त्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(Uddhav Thackeray) पत्र पाठवून सत्तेचं ताम्रपट कुणीही घेऊन आलं नाही अशा शब्दात इशारा दिला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या पत्रावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले की, या सरकारकडून राज ठाकरेंनी वेगळी अपेक्षाच ठेवू नये, इतकी भाबडी अपेक्षा राज ठाकरे ठेवतील असं वाटलं नव्हतं. हे सरकार अक्षरश: लागूनचालन करतंय, हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर राजद्रोहाचा खटला भरण्यापर्यंत मर्यादा सोडल्या आहेत. १२ दिवस खासदार-आमदारांना जेलमध्ये ठेवतात त्या सरकारकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. या सरकारविरोधात आम्ही लढतोय. त्यांनीही लढलं पाहिजे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत उत्तर प्रदेशात राज ठाकरेंना होणाऱ्या विरोधावर त्यांनी भाष्य केले आहे. रामाच्या शरणात जो जात असेल त्याला जाऊ दिले पाहिजे. कुणालाही रोखण्याची गरज नाही असं त्यांनी सांगितले आहे. तसेच मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. शहरात प्रत्येक राज्याचे भवन आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशने एखादं कार्यालय काढलं म्हणून घाबरण्याची गरज नाही. मुंबई आणि महाराष्ट्र पॉवरफूल आहे. मंत्र्यांचा वर्क फ्रॉम जेल सुरू आहे. महाराष्ट्रात अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यामुळे त्याचा फटका राज्याला बसत आहे असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

शरद पवारांनी बहुमूल्य सल्ला उद्धव ठाकरेंना द्यावा

शरद पवारांनी(Sharad Pawar) महाराष्ट्राच्या प्रश्नाकडे अधिक लक्ष दिले तर चांगले होईल. महाराष्ट्रातील शेतकरी, आदिवासी, विद्यार्थी, महिला, बारा-बलुतेदारांच्या प्रश्नांकडे ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार यांनी लक्ष दिले तर ते अधिक बरे होईल.त्यांच्या ‘बहुमूल्य’ सल्ल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला नितांत गरज आहे. देशात मोदी सरकार खूप चांगले काम करत आहे. लोकांचा मोदी सरकारवर विश्वास आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMNSमनसे