शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

इतकी भाबडी अपेक्षा ठेवतील वाटलं नव्हतं; राज ठाकरेंच्या पत्रावर देवेंद्र फडणवीस म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 10:23 IST

हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर राजद्रोहाचा खटला भरण्यापर्यंत राज्य सरकारनं मर्यादा सोडल्या आहेत अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवावे या मागणीसाठी वादंग निर्माण झाल्याचं चित्र आहे. राज ठाकरेंनी इशारा दिल्यानंतर मनसेच्या हजारो कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक नोटीस पाठवून कारवाई करण्यात आली. अनेकांना तडीपार करण्यात आले. त्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(Uddhav Thackeray) पत्र पाठवून सत्तेचं ताम्रपट कुणीही घेऊन आलं नाही अशा शब्दात इशारा दिला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या पत्रावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले की, या सरकारकडून राज ठाकरेंनी वेगळी अपेक्षाच ठेवू नये, इतकी भाबडी अपेक्षा राज ठाकरे ठेवतील असं वाटलं नव्हतं. हे सरकार अक्षरश: लागूनचालन करतंय, हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर राजद्रोहाचा खटला भरण्यापर्यंत मर्यादा सोडल्या आहेत. १२ दिवस खासदार-आमदारांना जेलमध्ये ठेवतात त्या सरकारकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. या सरकारविरोधात आम्ही लढतोय. त्यांनीही लढलं पाहिजे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत उत्तर प्रदेशात राज ठाकरेंना होणाऱ्या विरोधावर त्यांनी भाष्य केले आहे. रामाच्या शरणात जो जात असेल त्याला जाऊ दिले पाहिजे. कुणालाही रोखण्याची गरज नाही असं त्यांनी सांगितले आहे. तसेच मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. शहरात प्रत्येक राज्याचे भवन आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशने एखादं कार्यालय काढलं म्हणून घाबरण्याची गरज नाही. मुंबई आणि महाराष्ट्र पॉवरफूल आहे. मंत्र्यांचा वर्क फ्रॉम जेल सुरू आहे. महाराष्ट्रात अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यामुळे त्याचा फटका राज्याला बसत आहे असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

शरद पवारांनी बहुमूल्य सल्ला उद्धव ठाकरेंना द्यावा

शरद पवारांनी(Sharad Pawar) महाराष्ट्राच्या प्रश्नाकडे अधिक लक्ष दिले तर चांगले होईल. महाराष्ट्रातील शेतकरी, आदिवासी, विद्यार्थी, महिला, बारा-बलुतेदारांच्या प्रश्नांकडे ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार यांनी लक्ष दिले तर ते अधिक बरे होईल.त्यांच्या ‘बहुमूल्य’ सल्ल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला नितांत गरज आहे. देशात मोदी सरकार खूप चांगले काम करत आहे. लोकांचा मोदी सरकारवर विश्वास आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMNSमनसे